शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

यंदाही अवकाळीचे संकट !

By admin | Updated: April 23, 2015 02:20 IST

भेंडवळची घटमांडणी; चांगल्या पावसाचे भाकीत.

जयदेव वानखडे/ जळगाव जामोद (बुलडाणा) : सुमारे ३00 वर्षांंची परंपरा असलेल्या विदर्भातील बहूचर्चित भेंडवळ घटमांडणीत यंदाही अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार असून, पावसाळा चांगला राहील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. या हंगामात पावसाचे प्रमाण चांगले असून, पीक परिस्थितीही साधारण चांगली राहील, असे म्हटले आहे. राजकीय भाकीतानुसार, देशाचा राजा कायम राहणार असला तरी, संकटाचा ताण राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या मांडणीचे उद्गाते चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी बुधवारी हे भाकीत वर्तविले. गतवर्षी वर्तविलेला सत्ता बदलाचा अंदाज तंतोतंत ठरला होता. शेतकर्‍यांसोबतच राजकारण्यांची उपस्थिती ही यावेळच्या घटमांडणीचे वैशिष्ट्य होते. राजकारणाचे भाकीत वर्तविण्यासाठी घटातील मातीच्या खड्यामध्ये विडा व त्यावर लाल सुपारी ठेवली जाते. यावेळी विड्यावरील पान सुपारी कायम होती; परंतु पानावर माती दिसून आली. त्यामुळे राजा म्हणजे पंतप्रधान कायम राहील; मात्र आर्थिक आणि संकटाचा ताण राहील. त्यामुळे राजाला चिंता सतावेल. अतवृष्टी, पिकांची नासाडी, अवकाळी पाऊस, त्सुनामी, भूंकप, शंत्रुंची घुसखोरी अशा प्रकारच्या संकटांना पंतप्रधानाला (राजाला) सामोरे जावे लागेल. गतवर्षी घटाचे अवलोकन करताना विड्याच्या पानावरून सुपारी खाली घसरलेली आढळून आली होती. त्यामुळे राजाची गादी कायम राहील; परंतु राजा बदलेल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. अवकाळी पावसाचे संकट यावर्षीही कायम राहणार असून, पावसाळा चांगला राहील. या हंगामात पावसाचे प्रमाण चांगले असून, पीक परिस्थितीही साधारण चांगली राहील. त्यामध्ये कपाशीच्या पीकाबद्दल चांगला अंदाज वर्तविण्यात आला असून, या पिकाला भावातही तेजी मिळेल. ज्वारीचे पीक चांगले येईल; मात्र नासाडी संभवते, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. तुरीचे पीक चांगले राहील. मूग, उडीद, हिवाळी मूग, वाटाणा, गहू, हरभरा आदी पिकांबाबत यावेळी अनिश्‍चितता वर्तविण्यात आली. त्यामध्ये काही भागात चांगली, तर काही भागात साधारण पिके येतील असा अंदाज वर्तविण्यात आला. यंदा खरीप हंगाम हा रब्बी हंगामापेक्षा बरा असेल. अवकाळी पावसामुळे रब्बीची पिके हातातून जातील. त्यातुलनेत खरिपाची पिके बरी येतील, असे भेंडवळच्या मांडणीत म्हटले आहे. पिकावर रोगराईचे प्रमाण वाढेल, पिकांची नासाडी होईल, जलाशये तुडुंब भरलेले असतील, परंतू चारटंचाईचे सावट यावर्षीही जाणवेल, अतवृष्टीने महापूर, त्सुनामी, भूकंप अशी नैसर्गिक संकटे पृथ्वीवर येतील, त्यामध्ये जिवीत हानी होईल, देशावर परकीय शत्रुंच्या कारवाया सुरुच राहतील, मात्र देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असल्याने या संकटाचा मुकाबला करता येईल, असेही भाकीत वर्तविण्यात आले. आर्थिक संकटांमुळे तिजोरीत खणखणाट राहील, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला.