शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही अवकाळीचे संकट !

By admin | Updated: April 23, 2015 02:20 IST

भेंडवळची घटमांडणी; चांगल्या पावसाचे भाकीत.

जयदेव वानखडे/ जळगाव जामोद (बुलडाणा) : सुमारे ३00 वर्षांंची परंपरा असलेल्या विदर्भातील बहूचर्चित भेंडवळ घटमांडणीत यंदाही अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार असून, पावसाळा चांगला राहील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. या हंगामात पावसाचे प्रमाण चांगले असून, पीक परिस्थितीही साधारण चांगली राहील, असे म्हटले आहे. राजकीय भाकीतानुसार, देशाचा राजा कायम राहणार असला तरी, संकटाचा ताण राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या मांडणीचे उद्गाते चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी बुधवारी हे भाकीत वर्तविले. गतवर्षी वर्तविलेला सत्ता बदलाचा अंदाज तंतोतंत ठरला होता. शेतकर्‍यांसोबतच राजकारण्यांची उपस्थिती ही यावेळच्या घटमांडणीचे वैशिष्ट्य होते. राजकारणाचे भाकीत वर्तविण्यासाठी घटातील मातीच्या खड्यामध्ये विडा व त्यावर लाल सुपारी ठेवली जाते. यावेळी विड्यावरील पान सुपारी कायम होती; परंतु पानावर माती दिसून आली. त्यामुळे राजा म्हणजे पंतप्रधान कायम राहील; मात्र आर्थिक आणि संकटाचा ताण राहील. त्यामुळे राजाला चिंता सतावेल. अतवृष्टी, पिकांची नासाडी, अवकाळी पाऊस, त्सुनामी, भूंकप, शंत्रुंची घुसखोरी अशा प्रकारच्या संकटांना पंतप्रधानाला (राजाला) सामोरे जावे लागेल. गतवर्षी घटाचे अवलोकन करताना विड्याच्या पानावरून सुपारी खाली घसरलेली आढळून आली होती. त्यामुळे राजाची गादी कायम राहील; परंतु राजा बदलेल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. अवकाळी पावसाचे संकट यावर्षीही कायम राहणार असून, पावसाळा चांगला राहील. या हंगामात पावसाचे प्रमाण चांगले असून, पीक परिस्थितीही साधारण चांगली राहील. त्यामध्ये कपाशीच्या पीकाबद्दल चांगला अंदाज वर्तविण्यात आला असून, या पिकाला भावातही तेजी मिळेल. ज्वारीचे पीक चांगले येईल; मात्र नासाडी संभवते, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. तुरीचे पीक चांगले राहील. मूग, उडीद, हिवाळी मूग, वाटाणा, गहू, हरभरा आदी पिकांबाबत यावेळी अनिश्‍चितता वर्तविण्यात आली. त्यामध्ये काही भागात चांगली, तर काही भागात साधारण पिके येतील असा अंदाज वर्तविण्यात आला. यंदा खरीप हंगाम हा रब्बी हंगामापेक्षा बरा असेल. अवकाळी पावसामुळे रब्बीची पिके हातातून जातील. त्यातुलनेत खरिपाची पिके बरी येतील, असे भेंडवळच्या मांडणीत म्हटले आहे. पिकावर रोगराईचे प्रमाण वाढेल, पिकांची नासाडी होईल, जलाशये तुडुंब भरलेले असतील, परंतू चारटंचाईचे सावट यावर्षीही जाणवेल, अतवृष्टीने महापूर, त्सुनामी, भूकंप अशी नैसर्गिक संकटे पृथ्वीवर येतील, त्यामध्ये जिवीत हानी होईल, देशावर परकीय शत्रुंच्या कारवाया सुरुच राहतील, मात्र देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असल्याने या संकटाचा मुकाबला करता येईल, असेही भाकीत वर्तविण्यात आले. आर्थिक संकटांमुळे तिजोरीत खणखणाट राहील, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला.