शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा काळोख दूर करत यंदा आतषबाजीने उजळणार आकाश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 09:09 IST

कोरोना सरतोय, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आता बाजारही फुलू लागलाय... तब्बल दीड वर्षांनी राज्यातील बाजारपेठांत पुन्हा चैतन्य निर्माण होऊ लागलंय... याचाच वेध आजपासून -

-मुकुंद चेडे   वाशी (जि. उस्मानाबाद) : कोविडच्या सावटाखाली गेली दिवाळी अंधारातच साजरी झाली. त्यामुळे महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेरखेड्यातील फटाका उद्योगाला जबर फटका बसला. मात्र, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने येथील उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अगदी अलीकडे अतिवृष्टीचा फटका बसला असला तरी पुन्हा हा उद्योग त्यातून सावरत उभारी घेत आहे.तेरखेडा येथील फटाक्यांना देशभरात मागणी आहे. गतवर्षी कोविडच्या निर्बंधामुळे हा उद्योग काहीसा कोलमडला. मात्र, यावेळी निर्बंधातून सवलत मिळाल्याने पुन्हा येथील उद्योजकांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे. यंदा किमान पाच कोटीपर्यंत उलाढाल होईल, अशी अपेक्षा कारखानदारांना आहे.     ग्रीन फटाका निर्मितीवर भर येथील फटाका उद्योजक हे सुतळीबाॅम्ब, फुलबाजा, लक्ष्मीतोटे, तेरखेडी तोटे, आदल्या, मातीचे नळे या पारंपरिक फटाक्याची निर्मिती करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके तयार करण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे कमी आवाजाचे फटाके तयार करण्यावर भर दिला जात आहे.    रोजगार घटले, भाव वाढला तेरखेड्याच्या फटाका उद्योगातून सुमारे तीन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होत होता. मात्र, उत्पादन घटल्याने यावर अवलंबून असलेले कामगार, सुतार, कुंभार, ऑफसेट प्रिंट यावरही परिणाम झाला आहे.  निजामकाळात झाली सुरुवात  जवळपास १०० वर्षांपूर्वी येथील काही नागरिक निजामाच्या तोफखान्यावर कामाला होते. जेव्हा निजाम राजवट संपून मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला, तेव्हा या नागरिकांनी उदरनिर्वाहासाठी विहीर कामात दारूगोळ्याचा वापर सुरू केला. यातूनच पुढे फटाका निर्मिती उद्योगाने आकार घेतला. आजघडीला सुमारे ३० कारखाने फटाक्याचे उत्पादन करतात. डिझेल दरवाढ व कागद वधारल्यामुळे फटाक्याचे दर वाढले आहेत. उत्पादनातही घट झाली असून, त्याचा परिणाम फटाक्याच्या दरवाढीवर नाईलाजास्तव होत आहे.  - फरीद पठाण, अध्यक्ष, फटाका असोसिएशन       अतिवृष्टीमुळे फटाका निर्मितीत बाधा निर्माण झाली होती. दरवर्षी कोणते ना कोणते संकट या व्यवसायापुढे उभे ठाकत आहे. या व्यवसायास चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनुदान व कर्ज स्वरूपात मदत करणे गरजेचे आहे.   - इलियास दारुवाले, फटाका उद्योजक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDiwaliदिवाळी 2021