शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण दोनदा मेरिटमध्ये; नाथ पै पहिले तर अजित पवार शेवटचे मेरिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 02:30 IST

नाथ पै हे मेरिटसह लोकसभेत जाणारे पहिले खासदार तर १९९१ च्या निवडणुकीत बारामतीमध्ये ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार (काँग्रेस) शेवटचे खासदार ठरले.

- प्रेमदास राठोडआजवरच्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात बाजी मारून एकूण ७४६ जण लोकसभेत पोहोचले. यापैकी फक्त १४ उमेदवार ७५ टक्क्क््यांहून जास्त मते घेऊन मेरिटमध्ये पास झाले. १४ मधील १० जणांना १९७१ च्या निवडणुकीत हे यश मिळाले. यशवंतराव चव्हाण हे दोनदा (सातारा १९७१ व १९७७) असे यश मिळवणारे एकमेव नेते ठरले. पीएसपीचे नाथ पै (राजापूर १९५७) वगळता मेरिटमध्ये आलेले बाकी सर्व १३ काँग्रेसचे होते. नाथ पै हे मेरिटसह लोकसभेत जाणारे पहिले खासदार तर १९९१ च्या निवडणुकीत बारामतीमध्ये ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार (काँग्रेस) शेवटचे खासदार ठरले. १९९१ नंतर महाराष्ट्रात कोणालाही एवढे मोठे यश मिळालेले नाही.साताऱ्याने तब्बल तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मेरिटसह उमेदवाराला पास केले. शेजारच्या कराडने दोनदा उमेदवाराला मेरिटसह लोकसभेत पाठविले. अमरावती, बारामती, भंडारा, खामगाव, खेड, मालेगाव, राजापूर, रामटेक, सांगली आणि वर्धा या १० दहा मतदारसंघांनी एकेकदा मेरिटसह उमेदवारांना लोकसभेत पाठविण्याचा विक्रम केला आहे.१९७१ मध्ये कराडमधून विजयी झालेले दाजीसाहेब चव्हाण यांना ८६.१६ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी इतर सर्व ६ जणांची अनामत जप्त झाली होती. दाजीसाहेबांचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे. त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई यांना येथेच १९८४ मध्ये ८३.०९ टक्के मते मिळाली होती. दाजीसाहेब व प्रमिलाबाई यांचे सुपूत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी १९९१ ते ९८ तीन सार्वत्रिक निवडणुका जिंकून येथे हॅट्ट्रिक केली. पण त्यांना ६२ टक्क्क््यांपेक्षा जास्त मते मिळू शकली नाहीत.७५ टक्क्क््यांहून जास्त मतांसह लोकसभेत गेलेले इतर नेतेअमृत गणपत सोनार (१९७१ रामटेक, प्राप्त मते ८३.०२ टक्के), प्रतापराव भोसले (१९८९ सातारा, ८१.९४ टक्के), अर्जुनराव कस्तुरे (१९७१ खामगाव, ८०.६५ टक्के), नाथ पै (१९५७ राजापूर, ८०.६५ टक्के), गणपती गोटखिंडे (१९७१ सांगली, ७८.१७ टक्के), कृष्णराव देशमुख (१९७१ अमरावती, ७७.६१ टक्के), विश्वंभरदास दुबे (१९७१ भंडारा, ७६.५८ टक्के), जे.जी. कदम (१९७१ वर्धा, ७५.७३ टक्के), अनंतराव पाटील (१९७१ खेड, ७५.५४ टक्के), झामरू कहांडोळे (१९७१ मालेगाव, ७५.१९ टक्के) आणि अजित पवार (१९९१ बारामती, ७५.०४ टक्के) गेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे गोपाळ शेट्टी राज्यातून सर्वाधिक ७०.१५ टक्के मतांसह बाजी मारली. त्यापूर्वी २००९ मध्ये सर्वाधिक ६६.४६ टक्के मते सुप्रिया सुळे यांना मिळाली. शरद पवार यांना २०१४ (७१.०३ टक्के) व १९९८ (६५.८१ टक्के) या दोन निवडणुकांत राज्यातून सर्वाधिक मते मिळाली होती. या तिघांनाही ७५ टक्क्क््यांचा टप्पा मात्र गाठता आला नाही. गोपाळ शेट्टी व सुप्रिया सुळे यंदाही निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक