शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

यशवंतराव चव्हाण दोनदा मेरिटमध्ये; नाथ पै पहिले तर अजित पवार शेवटचे मेरिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 02:30 IST

नाथ पै हे मेरिटसह लोकसभेत जाणारे पहिले खासदार तर १९९१ च्या निवडणुकीत बारामतीमध्ये ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार (काँग्रेस) शेवटचे खासदार ठरले.

- प्रेमदास राठोडआजवरच्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात बाजी मारून एकूण ७४६ जण लोकसभेत पोहोचले. यापैकी फक्त १४ उमेदवार ७५ टक्क्क््यांहून जास्त मते घेऊन मेरिटमध्ये पास झाले. १४ मधील १० जणांना १९७१ च्या निवडणुकीत हे यश मिळाले. यशवंतराव चव्हाण हे दोनदा (सातारा १९७१ व १९७७) असे यश मिळवणारे एकमेव नेते ठरले. पीएसपीचे नाथ पै (राजापूर १९५७) वगळता मेरिटमध्ये आलेले बाकी सर्व १३ काँग्रेसचे होते. नाथ पै हे मेरिटसह लोकसभेत जाणारे पहिले खासदार तर १९९१ च्या निवडणुकीत बारामतीमध्ये ७५.०४ टक्के मतांसह बाजी मारलेले अजित पवार (काँग्रेस) शेवटचे खासदार ठरले. १९९१ नंतर महाराष्ट्रात कोणालाही एवढे मोठे यश मिळालेले नाही.साताऱ्याने तब्बल तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मेरिटसह उमेदवाराला पास केले. शेजारच्या कराडने दोनदा उमेदवाराला मेरिटसह लोकसभेत पाठविले. अमरावती, बारामती, भंडारा, खामगाव, खेड, मालेगाव, राजापूर, रामटेक, सांगली आणि वर्धा या १० दहा मतदारसंघांनी एकेकदा मेरिटसह उमेदवारांना लोकसभेत पाठविण्याचा विक्रम केला आहे.१९७१ मध्ये कराडमधून विजयी झालेले दाजीसाहेब चव्हाण यांना ८६.१६ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी इतर सर्व ६ जणांची अनामत जप्त झाली होती. दाजीसाहेबांचा हा रेकॉर्ड आजही कायम आहे. त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई यांना येथेच १९८४ मध्ये ८३.०९ टक्के मते मिळाली होती. दाजीसाहेब व प्रमिलाबाई यांचे सुपूत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी १९९१ ते ९८ तीन सार्वत्रिक निवडणुका जिंकून येथे हॅट्ट्रिक केली. पण त्यांना ६२ टक्क्क््यांपेक्षा जास्त मते मिळू शकली नाहीत.७५ टक्क्क््यांहून जास्त मतांसह लोकसभेत गेलेले इतर नेतेअमृत गणपत सोनार (१९७१ रामटेक, प्राप्त मते ८३.०२ टक्के), प्रतापराव भोसले (१९८९ सातारा, ८१.९४ टक्के), अर्जुनराव कस्तुरे (१९७१ खामगाव, ८०.६५ टक्के), नाथ पै (१९५७ राजापूर, ८०.६५ टक्के), गणपती गोटखिंडे (१९७१ सांगली, ७८.१७ टक्के), कृष्णराव देशमुख (१९७१ अमरावती, ७७.६१ टक्के), विश्वंभरदास दुबे (१९७१ भंडारा, ७६.५८ टक्के), जे.जी. कदम (१९७१ वर्धा, ७५.७३ टक्के), अनंतराव पाटील (१९७१ खेड, ७५.५४ टक्के), झामरू कहांडोळे (१९७१ मालेगाव, ७५.१९ टक्के) आणि अजित पवार (१९९१ बारामती, ७५.०४ टक्के) गेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे गोपाळ शेट्टी राज्यातून सर्वाधिक ७०.१५ टक्के मतांसह बाजी मारली. त्यापूर्वी २००९ मध्ये सर्वाधिक ६६.४६ टक्के मते सुप्रिया सुळे यांना मिळाली. शरद पवार यांना २०१४ (७१.०३ टक्के) व १९९८ (६५.८१ टक्के) या दोन निवडणुकांत राज्यातून सर्वाधिक मते मिळाली होती. या तिघांनाही ७५ टक्क्क््यांचा टप्पा मात्र गाठता आला नाही. गोपाळ शेट्टी व सुप्रिया सुळे यंदाही निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक