शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यशोमती ठाकूर यांच्या हॅटट्रिकची प्रतीक्षा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 13:18 IST

यशोमती ठाकूर विदर्भातील एकमेव महिला आमदार असून लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केलेल्या कामामुळे यशोमती ठाकूर यांचे पक्षातील स्थान आणखी भक्कम झाले आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघातून भाजपचे आव्हान मोडून काढण्यात आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना यश आले. नवनीत राणा यांच्या यशात त्यांचे पती रवी राणा आणि तिवसा मतदार संघाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांची भूमिका लक्षवेधी ठरली. ठाकूर यांनी राणा यांच्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. त्यामुळे राणा यांचा विजय काही प्रमाणात सुकर झाला. त्याचाच लाभ आता ठाकूर यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकूर आता हॅटट्रिकची प्रतीक्षा असल्याचे मतदार संघात बोलले जात आहे.

२०१४ विधानसभा निवडणुकीत तिवसा मतदार संघातून यशोमती ठाकूर यांच्यासमोर फारसचे आव्हान नव्हते. भाजपचा मोठा कार्यकर्ता वर्ग आणि सुप्त शिवसैनिक असले तरी २०१४ मध्ये यशोमती ठाकूर यांच्याकडे आपली लेक म्हणून पाहण्यात आले होते. यशोमती ठाकूर विदर्भातील एकमेव महिला आमदार असून लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केलेल्या कामामुळे यशोमती ठाकूर यांचे पक्षातील स्थान आणखी भक्कम झाले आहे.

दुसरीकडे नवनीत राणा यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील स्थानिक प्रश्नांवर भर देण्यास सुरूवात केली आहे. नुकताच त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. नवनीत राणा यांच्या विजयातील ठाकूर यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. त्यामुळे सहाजिकच नवनीत राणा देखील ठाकूर यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहेत.

तिवसा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा मुद्दा केंद्रस्थानी होती. अर्थात विधानसभा निवडणुकीत देखील शेतकरी प्रश्न गाजणार हे स्पष्टच आहे. रवी राणा यांच्या येथील संघटनामुळे यशोमती यांचा मार्ग सुकर होण्याची शक्यता असली तरी, भाजप-शिवसेनेच्या चालीवर बरच काही अवलंबून राहणार आहे.