शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Yashomati Thakur: "शरद पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर...",यशोमती ठाकूर यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 21:57 IST

Yashomati Thakur: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

अमरावती: महाराष्ट्राच्या महिला व बाल विकासमंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले आहे. "शरद पवार आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते, तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं," असे मोठे वक्तव्य ठाकूर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

आज अमरावतीमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 57वी पुण्यतिथी पार पडली. यावेळी अमरावतीमधील छत्रपती शिवाजी महारज प्रेक्षागृहाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडामंत्री सुनिल केदार, खासदार नवनीत राणा उपस्थित होत्या. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाल्या की, "शरद पवार साहेब चार वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण आज काळाची गरज आहे. पवारसाहेब आपल्या सोबत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतात. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार, हा अस्थिर होणार नाही."

तुम्ही आमच्यासोबत, हे आमचे भाग्य...त्या पुढे म्हणाल्या, ''काल शरद पवार यांच्या घरावर इतका मोठा हल्ला झाला, प्रत्येकजण मला विचारत होते की साहेब येणार आहेत का? पण साहेब तुम्ही आलात, तुमच्या हिमतीची दादच दिली पाहिजे. आमच्यापेक्षा चारपट वयाचे तुम्ही आहात, पण तुम्ही थकत कसे नाहीत. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे. जसे भाऊसाहेब झटत होते, त्याच प्रकारे तुम्ही आज आमच्या समवेत उपस्थित आहात, हे आमचे भाग्य आहे.''

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरSharad Pawarशरद पवारAmravatiअमरावती