शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

हे यश कॉपीमुक्त अभियानाचे!

By admin | Updated: June 18, 2014 04:25 IST

आज दहावीचा निकाल लागला. इतिहासात पहिल्यांदाच ८८.३२ टक्के एवढा जबरदस्त निकाल या वर्षी लागला. त्यातही सतत तिसऱ्या वर्षी कोकण विभागाने आघाडी घेत ९५.५७ टक्क्यांपर्यंत झेप घेतली

राजेंद्र दर्डा, (शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य)आज दहावीचा निकाल लागला. इतिहासात पहिल्यांदाच ८८.३२ टक्के एवढा जबरदस्त निकाल या वर्षी लागला. त्यातही सतत तिसऱ्या वर्षी कोकण विभागाने आघाडी घेत ९५.५७ टक्क्यांपर्यंत झेप घेतली. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल तब्बल ९६.४५ टक्के लागला आहे. राज्यातील रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, अहमदनगर, बीड व नाशिक या जिल्ह्यांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाच्या समकक्ष झाला आहे. सीबीएसई पॅटर्न व राज्याच्या अभ्यासक्रमामध्ये फारसा फरक राहिलेला नाही, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. गेल्या चार वर्षांपासून राज्यात कॉपीमुक्त अभियान अत्यंत कडकपणे राबविण्यात आले. त्यातून परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यात आला. पण कॉपीमुक्त अभियानाला सुरुवात करताच मार्च २०११चे निकाल कमी लागले होते. त्या निकालावरून ओरडही झाली होती. विशेषत: नागपूर, औरंगाबाद, अमरावती, लातूर या विभागांचे निकाल खूपच कमी लागले होते. आता मात्र चार वर्षांनंतर मार्च २०१४च्या निकालाची तुलना केली तर राज्याचा सर्वसाधारण निकाल सरासरी १७ टक्क्यांनी वाढला आहे. त्यातही औरंगाबाद विभागाच्या निकालात ३२ टक्के, अमरावती विभागाच्या ४१ टक्के, लातूर विभागाच्या निकालात २५ टक्के वाढ झाली आहे हे सांगताना मला आनंद होतो आहे. या निकालाबद्दल एक स्वागतार्ह बदल मी अधोरेखित करू इच्छितो तो हा की, मार्च २०११मध्ये राज्यातील सर्व विभागांत निकालामध्ये मोठी तफावत व असमतोल होता. परंतु या वेळेस १२वीच्या निकालाप्रमाणेच १०वीच्या निकालातही विभागातील असमतोल व निकालातील तफावत खूप कमी झाली आहे. सर्वांनी मिळून राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाचा मोठा फायदा झाला. मुले अभ्यासाकडे वळली. त्यातून गुणवत्तेला चालना मिळाली. शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली. आज रोजी जाहीर झालेला निकाल ८८.३२ टक्के लागला, यातच कॉपीमुक्ती अभियानाचे यश प्रतिबिंबित होते. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के सर्वाधिक असून, नांदेड जिल्ह्याचा निकाल ७४.२९ टक्के हा सर्वांत कमी आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील २०,७३१ माध्यमिक शाळांतून विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. मला याचा आनंद आहे की, त्यापैकी १९ टक्के म्हणजे ३,९४९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ४० टक्के (पान १० वर)