शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

हे यश कॉपीमुक्त अभियानाचे!

By admin | Updated: June 18, 2014 04:25 IST

आज दहावीचा निकाल लागला. इतिहासात पहिल्यांदाच ८८.३२ टक्के एवढा जबरदस्त निकाल या वर्षी लागला. त्यातही सतत तिसऱ्या वर्षी कोकण विभागाने आघाडी घेत ९५.५७ टक्क्यांपर्यंत झेप घेतली

राजेंद्र दर्डा, (शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य)आज दहावीचा निकाल लागला. इतिहासात पहिल्यांदाच ८८.३२ टक्के एवढा जबरदस्त निकाल या वर्षी लागला. त्यातही सतत तिसऱ्या वर्षी कोकण विभागाने आघाडी घेत ९५.५७ टक्क्यांपर्यंत झेप घेतली. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल तब्बल ९६.४५ टक्के लागला आहे. राज्यातील रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, अहमदनगर, बीड व नाशिक या जिल्ह्यांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाच्या समकक्ष झाला आहे. सीबीएसई पॅटर्न व राज्याच्या अभ्यासक्रमामध्ये फारसा फरक राहिलेला नाही, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. गेल्या चार वर्षांपासून राज्यात कॉपीमुक्त अभियान अत्यंत कडकपणे राबविण्यात आले. त्यातून परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यात आला. पण कॉपीमुक्त अभियानाला सुरुवात करताच मार्च २०११चे निकाल कमी लागले होते. त्या निकालावरून ओरडही झाली होती. विशेषत: नागपूर, औरंगाबाद, अमरावती, लातूर या विभागांचे निकाल खूपच कमी लागले होते. आता मात्र चार वर्षांनंतर मार्च २०१४च्या निकालाची तुलना केली तर राज्याचा सर्वसाधारण निकाल सरासरी १७ टक्क्यांनी वाढला आहे. त्यातही औरंगाबाद विभागाच्या निकालात ३२ टक्के, अमरावती विभागाच्या ४१ टक्के, लातूर विभागाच्या निकालात २५ टक्के वाढ झाली आहे हे सांगताना मला आनंद होतो आहे. या निकालाबद्दल एक स्वागतार्ह बदल मी अधोरेखित करू इच्छितो तो हा की, मार्च २०११मध्ये राज्यातील सर्व विभागांत निकालामध्ये मोठी तफावत व असमतोल होता. परंतु या वेळेस १२वीच्या निकालाप्रमाणेच १०वीच्या निकालातही विभागातील असमतोल व निकालातील तफावत खूप कमी झाली आहे. सर्वांनी मिळून राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाचा मोठा फायदा झाला. मुले अभ्यासाकडे वळली. त्यातून गुणवत्तेला चालना मिळाली. शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली. आज रोजी जाहीर झालेला निकाल ८८.३२ टक्के लागला, यातच कॉपीमुक्ती अभियानाचे यश प्रतिबिंबित होते. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के सर्वाधिक असून, नांदेड जिल्ह्याचा निकाल ७४.२९ टक्के हा सर्वांत कमी आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील २०,७३१ माध्यमिक शाळांतून विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. मला याचा आनंद आहे की, त्यापैकी १९ टक्के म्हणजे ३,९४९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ४० टक्के (पान १० वर)