शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर १५ आमदारांना केंद्राची वाय प्लस सुरक्षा, कुटुंबीयांना संरक्षण द्या - राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 06:13 IST

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी कुटुंबांना दिलेली सुरक्षा राज्याच्या गृह विभागाकडून बेकायदा काढून घेतल्याचे सांगत कुटुंबांना संरक्षण देण्यास सांगितले आहे. काही राजकीय नेत्यांकडून आमदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेखही पत्रात आहे.

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची घरे, कार्यालयांवर हल्ले होत असतानाच त्यातील १५ आमदारांच्या कुटुंबीयांना केंद्राच्या अखत्यारितील वाय प्लस सुरक्षेसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे संरक्षण दिले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण द्या, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी कुटुंबांना दिलेली सुरक्षा राज्याच्या गृह विभागाकडून बेकायदा काढून घेतल्याचे सांगत कुटुंबांना संरक्षण देण्यास सांगितले आहे. काही राजकीय नेत्यांकडून आमदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेखही पत्रात आहे.सीआरपीएफची सुरक्षा पुरविलेल्या १५ जणांमध्ये मंत्री संदीपान भुमरे, दादा भुसे, माजी मंत्री आ.संजय राठोड, आ. रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जयस्वाल, दिलीप लांडे, बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.

कोरोना निगेटिव्ह येताच राज्यपाल ॲक्टिव्ह-  येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. -  राज्यपाल गेले चारपाच दिवस कोरोनाग्रस्त होते व खासगी इस्पितळात उपचार घेत होते. आज ते परत येताच ॲक्टिव्ह झाले. -  आमदारांच्या सुरक्षेचा विषय त्यांनी हाती घेतला. राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्षाचे अनेक प्रसंग घडले आहेत.

आमदार मुंबईत आल्यावरही मिळणार केंद्राची सुरक्षागुवाहाटीतील बंडखोर आमदार मुंबईत येतील तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठीदेखील केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तैनात करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विमानतळावर ते उतरल्यापासून ज्या हॉटेलवर त्यांचा मुक्काम असेल तिथे, ते विधानभवनात जातानादेखील सीआरपीएफ जवानांचा गराडा असेल. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस