शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

बंडखोर १५ आमदारांना केंद्राची वाय प्लस सुरक्षा, कुटुंबीयांना संरक्षण द्या - राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 06:13 IST

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी कुटुंबांना दिलेली सुरक्षा राज्याच्या गृह विभागाकडून बेकायदा काढून घेतल्याचे सांगत कुटुंबांना संरक्षण देण्यास सांगितले आहे. काही राजकीय नेत्यांकडून आमदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेखही पत्रात आहे.

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची घरे, कार्यालयांवर हल्ले होत असतानाच त्यातील १५ आमदारांच्या कुटुंबीयांना केंद्राच्या अखत्यारितील वाय प्लस सुरक्षेसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे संरक्षण दिले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण द्या, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी कुटुंबांना दिलेली सुरक्षा राज्याच्या गृह विभागाकडून बेकायदा काढून घेतल्याचे सांगत कुटुंबांना संरक्षण देण्यास सांगितले आहे. काही राजकीय नेत्यांकडून आमदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा उल्लेखही पत्रात आहे.सीआरपीएफची सुरक्षा पुरविलेल्या १५ जणांमध्ये मंत्री संदीपान भुमरे, दादा भुसे, माजी मंत्री आ.संजय राठोड, आ. रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जयस्वाल, दिलीप लांडे, बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.

कोरोना निगेटिव्ह येताच राज्यपाल ॲक्टिव्ह-  येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. -  राज्यपाल गेले चारपाच दिवस कोरोनाग्रस्त होते व खासगी इस्पितळात उपचार घेत होते. आज ते परत येताच ॲक्टिव्ह झाले. -  आमदारांच्या सुरक्षेचा विषय त्यांनी हाती घेतला. राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्षाचे अनेक प्रसंग घडले आहेत.

आमदार मुंबईत आल्यावरही मिळणार केंद्राची सुरक्षागुवाहाटीतील बंडखोर आमदार मुंबईत येतील तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठीदेखील केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तैनात करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विमानतळावर ते उतरल्यापासून ज्या हॉटेलवर त्यांचा मुक्काम असेल तिथे, ते विधानभवनात जातानादेखील सीआरपीएफ जवानांचा गराडा असेल. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस