शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गणित संख्यावाचनाचा निर्णय चुकीचा; तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 06:50 IST

भाषेशी तडजोड करणे हा मराठी भाषेवर अन्यायच; भाषा संपविण्याच्या प्रयत्नावर नाराजी

मुंबई : बालभारतीने अभ्यासक्रमात बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, इयत्ता दुसरीच्या गणित विषयाच्या पुस्तकात मोठा बदल केला आहे. संख्येचे वाचन करताना आता तेवीसऐवजी वीस तीन, पंचावन्नऐवजी पन्नास पाच असे वाचण्याच्या सूचना नमूद केल्या आहेत. या बदलांवर शिक्षण व मराठीविषयक तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली असून, मराठी भाषा संपविण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय घेत असल्याचा सूर तज्ज्ञांमध्ये आहे.निर्णयाचा पुनर्विचार होणे गरजेचेगणित हा अवघड विषय आहे, गणिताची भीती विद्यार्थ्यांच्या मनात असते. उलट अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना गणित विषय आणखी अवघड जाणार आहे. असा निर्णय होणे हे अत्यंत खेदजनक आहे. शिक्षण क्षेत्रात इतके महत्त्वाचे बदल होत असताना, ज्याप्रमाणे शिक्षणतज्ज्ञांचा विचार लक्षात घेतला जातो, त्याप्रमाणे लहानग्यांच्या मानसशास्त्राच्या विश्लेषणासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचीही मते विचारात घेतली पाहिजेत. आधीच आपली शिक्षणपद्धती फारशी प्रगल्भ नाही, त्यात पुस्तकी अभ्यासाचा ८० टक्के समावेश आहे. त्यामुळे हे बदल स्वीकारणे लहानग्यांना खूप जड जाणार आहे. स्पर्धेच्या युगात मूल मागे पडू नये, म्हणून आधीच लहानग्यांना अभ्यास, शिकवणी आणि छंद-आवडीचे क्लासेस, यामुळे ताण सहन करावा लागतो. याची तीव्रता पालकांपर्यंत पोहोचत नाही. सर्व स्थितीचा विचार करता, या निर्णयाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे.- डॉ.राजश्री लोहिया, मानसोपचारतज्ज्ञमराठी भाषा मारण्याचा कटनवीन बालभारती पुस्तकातील पाढ्यांची भाषा बदलून मराठी भाषा मारण्याचा कट या सरकारचा आहे. भाषेचे इंग्रजीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे मराठी भाषेवर आलेले भयंकर संकट आहे. मराठी भाषेचा पाढा बदलून टाकायचा आणि मराठी संस्कृती मारून टाकायची, असा विचार असल्याचे दिसून येत आहे. ही कल्पना कुणाच्या डोक्यात आली, याचा शोध घ्यायचा आहे. अनेक भाषातज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली; परंतु हे नवीन शास्त्र हे कोणत्याच मराठी संस्कृतीत बसत नाही. शिक्षणामध्ये जे विनोद झाले, त्याचे नवीन आव्हान आता नव्या शिक्षणमंत्र्यावर आहे. पाढा बदलायचा म्हणजे मराठी संस्कृती मारायची, असे होते. सगळे बदलायचे आहे तर मराठी फेकून द्या, असेच यांचे धोरण आहे. बालभारतीची नवीन कितीही पुस्तके असली, तरी ती फेकून द्यावी, कितीही खर्च झाला, तरी चालेल कारण संख्यांचे उच्चार बदलणे हे चुकीचे आहे.- कपिल पाटील, आमदारयशापयश लगेचच ठरवणे अयोग्यमागील वर्षी इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके बदलली होती. त्यातील गणिताच्या पाठ्यपुस्तकात २१ पासून (पान नं ४९ ते ५७) ९९ पर्यंतच्या अंक ओळख करून देताना तीन पद्धतींचा वापर केला आहे. मागील वर्षी या नवीन पद्धतीची ओळख दिली असताना, कोणतीही चर्चा अथवा गदारोळ झाल्याचे आठवत नाही. यंदा इयत्ता दुसरीचीही पाठ्यपुस्तके बदलली आहेत. गणिताच्या पाठ्यपुस्तकातील पान नं १० वर ‘संख्या वाचू- लिहू या’ यात २१ ते १०० संख्यांचे अक्षरी लेखन दिले आहे. त्यात दोन प्रकारचे संख्यावाचन दिले आहे. यंदा झालेला बदल हा एकाएकी झालेला नसून मागील वर्षी झालेल्या बदलावर आधारित आहे. या पद्धतीला होणाऱ्या विरोधाचे आणखी एक महत्त्वाचे कारण दिले जाते की, व्यवहारात किंवा समाज जीवनात इतर लोक प्रचलित पद्धतीचाच वापर करतील, तर या नवीन पद्धतीने शिकणारी मुले गोंधळात पडतील. विद्यार्थ्यांना या पद्धतीने संख्यांची ओळख होणे व ती पक्की करणे हाच उद्देश दिसून येतो. त्यांनी व्यवहारातही याच पद्धतीचा अवलंब करावा, असे अपेक्षित नाही. या नवीन पद्धतीचे यशापयश लगेचच ठरविणे योग्य होणार नाही, त्यासाठी हे शैक्षणिक वर्ष पार पडणे आवश्यक आहे. त्यानंतरच विद्यार्थी व शिक्षकांच्या अनुभवावरून हा निर्णय योग्य की अयोग्य, ते सांगणे उचित ठरेल.- नितीन खंडाळे, शिक्षकउच्चार बदलण्याची गरज नाहीसंबंधित अधिकाऱ्यांनी बुद्धी, मन आणि मत याचा निर्णय घेताना अजिबात विचार केलेला नाही. मुळात अशा पद्धतीने कोणतीही भाषा शिकविली जात नाही. मूळ स्वरूप शिकविताना बदलता येत नाही. शिक्षणाचा मूळ उद्देशच असा आहे की, त्या-त्या काळात, त्या-त्या स्वरूपात विषयांचे शिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी उच्चार बदलण्याची काहीच आवश्यकता नसते. परकीय भाषा शिकताना आपल्याला जमत नसेल, तर आपण त्याचे स्वरूप बदलतो का, तर असे करत नाही. त्याप्रमाणेच, आपल्या भाषांमध्ये तडजोड करणे हे अस्मिता शिल्लक असलेल्या देशाला शोभनीय नाही. शिक्षणाचा खेळखंडोबा करणारा अत्यंत चुकीचा निर्णय आहे.- चंद्रशेखर टिळक, अर्थतज्ज्ञदिलेले कारण फारच तकलादूजोडाक्षरे उच्चारणे विद्यार्थ्यांना जमत नाही, हे बदलासाठी दिलेले कारण फारच तकलादू आहे. संख्या वाचनातील जोडाक्षरांचे प्रमाण शालेय अभ्यासक्रमातील व पाठ्यपुस्तकातील एकूण जोडाक्षरांच्या तुलनेत लाखात एक या प्रमाणाहून कमी आहे. सुचविलेली नवी पद्धत अधिक गुंतागुंतीची, अवघड व अधिक वेळखाऊ आहे. या संख्येचे वाचन पुढील वरच्या इयत्तेतील मुलांनी कसे करावे, याबाबात गणित अभ्यास मंडळाचे काय मत आहे? संख्या वाचन न करता अन्य पद्धतीने करावे, असा निर्णय घेण्याचा सल्ला देण्याबाबतचे अधिकार गणित अभ्यास मंडळाला आहेत का? याचा प्राथमिक आढावा घेतला असता, उपरोक्त गणित अभ्यास मंडळाला असा अधिकार दिलेला नसावा, असे अनेक शासकीय अधिकाºयांचे मत आहे. भाषातज्ज्ञांशी असा औपचारिक विचारविनिमय न करताच इतका मूलभूत बदल केला असेल, तर तो बदल तातडीने स्थगित कारावा आणि या संबंधीचा आशय पाठ्यपुस्तकातून वगळण्याचे परिपत्रक (शुद्धिपत्रक) तातडीने काढावे, अशी मागणीही शासनाकडे केली आहे.- रमेश पानसे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञबदलामुळे नेमके काय साध्य होणार?बालभारतीच्या वतीने दुसºया इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला. या अभ्यासक्रमात जोडाक्षरे उच्चार करण्यास कठीण असतात, म्हणून त्याची उच्चार पद्धतीच बदलून टाकली आहे. एकवीस, बावीस या उच्चाराऐवजी आता वीस एक, वीस दोन असा शब्दप्रयोग करण्यास सांगितले आहे. मुळात भाषेत जोडाक्षरांना फारच महत्त्व आहे. जोडाक्षरे, स्पष्ट उच्चारण, शब्दांचे चढ-उतार ही भाषेची मूलभूत अंगे शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर शिकविली जातात. दुसरीच्या वर्गातच भाषेची भीती मुलांमध्ये निर्माण केली, तर तो शुद्ध भाषा शिकायला तयारच होणार नाही. गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या अभ्यास पद्धतीत बदल करण्यास काहीच हरकत नाही. शिक्षणात व शिक्षण पद्धतीत बदल हाझालाच पाहिजे, परंतु हा बदल सकारात्मक अपेक्षित आहे. बालभारतीने दुसरी इयत्तेत केलेल्या बदलामुळे नेमके काय साध्य होणार आहे? असा प्रश्न शिक्षक व पालकांना पडला आहे. आकडेमोड करताना व पाढे पाठ करताना जुनी पद्धत अयोग्य होती का? बालभारतीच्या वतीने करण्यात आलेले बदल गणितीय पद्धतीचा विचार केला असता, भाषिक विचार हा संभ्रमात टाकणारा प्रश्न ठरतो. मुळात लहाणपणी मूल कोणतीही भाषा लवकर आत्मसात करतो. श्रवण, वाचन, भाषण, आकलन या चार भाषिक अंगाच्या विकासासाठी भाषा तज्ज्ञांनी या बदलांवर विचार करणे आवश्यक आहे.- उदय नरे, माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई

टॅग्स :Educationशिक्षण