शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे सूर बदलले? पंतप्रधान शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू म्हटले पण...
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
4
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
5
कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
6
Virender Sehwag Birthday: 'नजफगडचा नवाब' 47 वर्षांचा! वीरेंद्र सेहवागचे 4 महारेकॉर्ड्स, जे आजपर्यंत कुणीच तोडू शकलं नाही!
7
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
8
अभिनेता अंकुर वाढवे दुसऱ्यांदा झाला बाबा; फोटो पोस्ट करत म्हणाला, "यावेळी मुलगा..."
9
"अणुयुद्ध झाले असते, मी २००% टॅरिफ लावण्याची धमकी दिली म्हणून..."; भारत-पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले ट्रम्प?
10
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
11
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
12
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त आणि विधी
13
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
14
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया
15
Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण
16
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
17
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
18
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
19
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
20
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...

‘सात सक्कं त्रेचाळीस’ कादंबरीवरील टीका चुकीची

By admin | Updated: September 16, 2014 01:13 IST

‘सात सक्कं त्रेचाळीस’ हा उद्ध्वस्त करणारा अनुभव आहे. त्या काळात या कादंबरीवर झालेली टीका चुकीची होती. या कादंबरीत जगण्याचे पेच मांडले आहेत,

मुंबई : ‘सात सक्कं त्रेचाळीस’ हा उद्ध्वस्त करणारा अनुभव आहे. त्या काळात या कादंबरीवर झालेली टीका चुकीची होती. या कादंबरीत जगण्याचे पेच मांडले आहेत, एका वेगळ्या विषण्णता अवस्थेत सतत ‘माणूसपण’ शोधण्याचा अनुभव या कादंबरीत असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या आणि समीक्षक पुष्पा भावे यांनी मांडले.
शब्द प्रकाशन आयोजित किरण नगरकर लिखित ‘सात सक्कं त्रेचाळीस’ कादंबरीचे पुन:प्रकाशन सोमवारी रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून भावे बोलत होत्या. या वेळी लेखक किरण नगरकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, चित्रकार प्रभाकर कोलते, समीक्षक नितीन रेंढे, पत्रकार जयंत पवार आदी मान्यवरांनी कादंबरीविषयी आपले विचार व्यक्त केले.
भावे म्हणाल्या, या कादंबरीचे समीक्षण केलेल्या पहिल्या तीन समीक्षकांपैकी मी एक आहे. या कादंबरीची भाषा ही अनुभव घेण्याची वेगळी पद्धत आहे. या कादंबरीच्या निमित्ताने सांगायचे म्हणजे, त्या काळात या कादंबरीमुळे वा्मयीन वादविवाद होताना दिसले; परंतु आता तसे चित्र नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मात्र तरीही चाळीस वर्षानंतरही मराठी भाषेतही नेकीने अनुभव देणारी ही कादंबरी असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रकार म्हणून मुखपृष्ठ रेखाटलेले हे पहिले आणि शेवटचे पुस्तक असे सांगून चित्रकार प्रभाकर कोलते यांनी या कादंबरीच्या मुखपृष्ठाची कथा उलगडली. कलेच्या क्षेत्रतला ‘अॅब्स्ट्रॅक्ट’पणा मी या कादंबरीत अनुभवला, असे कोलते यांनी सांगितले. तर ही कादंबरी म्हणजे किरणचे स्वगत असून ती वाचकांना भावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
1967 ते 1974च्या कालखंडात या कादंबरीच्या लेखनाची प्रक्रिया सुरू होती, मात्र 1974 साली कादंबरी प्रकाशित झाली त्या वेळी त्या कादंबरीचे समीक्षण करताना ज्या विचारसरणीचा प्रभाव होता, त्याविषयीचा अनुभव ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी उपस्थितांसमोर मांडला. 
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वादळ, व्हिएतनामचा संघर्ष, चीनची सांस्कृतिक क्रांती या सर्वाचा विचारांवर होणारा प्रभाव आणि कादंबरीतील मुंबई आणि तिचे वर्णन याचा प्रभाव त्या वेळेच्या कादंबरीच्या समीक्षणातून दिसून आल्याचे केतकर यांनी सांगितले. आता मात्र ही कादंबरी म्हणजे भविष्य काळातील परात्मतेची नांदी असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले. (प्रतिनिधी)