शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
"आमचे मंत्री गुगली टाकण्यात मास्टर..."; शिंदेसेनेच्या आमदाराचा घरचा आहेर, विधानसभेत काय घडलं?
3
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
4
हायवेवर कारमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याची CCTV फुटेजमधून बनवली व्हिडीओ क्लिप, त्यानंतर...  
5
२०२६ मध्ये इलॉन मस्क यांच्या कंपनीचा आयपीओ येणार; रेकॉर्ड ब्रेकिंग असणार किंमत
6
‎११ जहाल माओवाद्यांचे शस्त्रांसह आत्मसमर्पण, महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र, ८२ लाखांचे होते इनाम ‎ ‎ ‎
7
पुतीन येऊन जाताच अमेरिकेने भारतावर राग काढला; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द
8
Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया
9
Suryakumar Yadav : सूर्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम; असा पराक्रम करून दाखवणारा ठरला जगातील पहिला कर्णधार
10
थायलंड-कंबोडिया संघर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची उडी, भारत-पाकिस्तानचा उल्लेख; म्हणाले, "आम्ही ताकदीबरोबर..."
11
डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
12
गुगलचा 'हा' मेसेज दिसताच समजून जा तुमचं 'Gmail' आलंय धोक्यात! वेळ न घालवता करा 'हे' उपाय
13
२०२५ मध्ये अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले पाकिस्तानी...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली...
14
"साहेब, मी कचोरी विकून कुटुंबाचं पोट...", १५०० कोटींची फसवणूक करणाऱ्या सोनीची नवी 'चाल'
15
'किंग'मध्ये लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...
16
Microsoft भारतात १७.५ बिलियन डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक करणार, ठरणार आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी इनव्हेस्टमेंट
17
डेटिंग साईटवर परदेशी तरुणीच्या प्रेमात पडला, भरपूर पैसा खर्च केला अन् अचानक 'ती' दिसली समोर! नंतर जे झालं..
18
वार्षिक राशीभविष्य २०२६: संपत्ती, करिअर आणि कौटुंबिक जीवनात कोणत्या राशींना मिळणार मोठे यश?
19
Accident: वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन पुढं निघाले, पण वाटेतच...; भीषण अपघातात ३ ठार, २८ जखमी
20
१ महिन्यापूर्वी बनला वडील, पैसे कमवायला गोव्यात आला; नाइट ड्युटीच्या पहिल्याच दिवशी जीव गमावला
Daily Top 2Weekly Top 5

‘सात सक्कं त्रेचाळीस’ कादंबरीवरील टीका चुकीची

By admin | Updated: September 16, 2014 01:13 IST

‘सात सक्कं त्रेचाळीस’ हा उद्ध्वस्त करणारा अनुभव आहे. त्या काळात या कादंबरीवर झालेली टीका चुकीची होती. या कादंबरीत जगण्याचे पेच मांडले आहेत,

मुंबई : ‘सात सक्कं त्रेचाळीस’ हा उद्ध्वस्त करणारा अनुभव आहे. त्या काळात या कादंबरीवर झालेली टीका चुकीची होती. या कादंबरीत जगण्याचे पेच मांडले आहेत, एका वेगळ्या विषण्णता अवस्थेत सतत ‘माणूसपण’ शोधण्याचा अनुभव या कादंबरीत असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या आणि समीक्षक पुष्पा भावे यांनी मांडले.
शब्द प्रकाशन आयोजित किरण नगरकर लिखित ‘सात सक्कं त्रेचाळीस’ कादंबरीचे पुन:प्रकाशन सोमवारी रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून भावे बोलत होत्या. या वेळी लेखक किरण नगरकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, चित्रकार प्रभाकर कोलते, समीक्षक नितीन रेंढे, पत्रकार जयंत पवार आदी मान्यवरांनी कादंबरीविषयी आपले विचार व्यक्त केले.
भावे म्हणाल्या, या कादंबरीचे समीक्षण केलेल्या पहिल्या तीन समीक्षकांपैकी मी एक आहे. या कादंबरीची भाषा ही अनुभव घेण्याची वेगळी पद्धत आहे. या कादंबरीच्या निमित्ताने सांगायचे म्हणजे, त्या काळात या कादंबरीमुळे वा्मयीन वादविवाद होताना दिसले; परंतु आता तसे चित्र नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मात्र तरीही चाळीस वर्षानंतरही मराठी भाषेतही नेकीने अनुभव देणारी ही कादंबरी असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रकार म्हणून मुखपृष्ठ रेखाटलेले हे पहिले आणि शेवटचे पुस्तक असे सांगून चित्रकार प्रभाकर कोलते यांनी या कादंबरीच्या मुखपृष्ठाची कथा उलगडली. कलेच्या क्षेत्रतला ‘अॅब्स्ट्रॅक्ट’पणा मी या कादंबरीत अनुभवला, असे कोलते यांनी सांगितले. तर ही कादंबरी म्हणजे किरणचे स्वगत असून ती वाचकांना भावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
1967 ते 1974च्या कालखंडात या कादंबरीच्या लेखनाची प्रक्रिया सुरू होती, मात्र 1974 साली कादंबरी प्रकाशित झाली त्या वेळी त्या कादंबरीचे समीक्षण करताना ज्या विचारसरणीचा प्रभाव होता, त्याविषयीचा अनुभव ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी उपस्थितांसमोर मांडला. 
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वादळ, व्हिएतनामचा संघर्ष, चीनची सांस्कृतिक क्रांती या सर्वाचा विचारांवर होणारा प्रभाव आणि कादंबरीतील मुंबई आणि तिचे वर्णन याचा प्रभाव त्या वेळेच्या कादंबरीच्या समीक्षणातून दिसून आल्याचे केतकर यांनी सांगितले. आता मात्र ही कादंबरी म्हणजे भविष्य काळातील परात्मतेची नांदी असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले. (प्रतिनिधी)