शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

१२० महिला चित्रकारांनी साकारले जगातले सर्वात मोठे वारली चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 07:09 IST

जी-२० मध्ये पालघरच्या ‘द धवलेरी ग्रुप’च्या सहा चित्रकारांचीही कलाकारी

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : जी-२० परिषदेनिमित्त औरंगाबाद महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या सहकार्याने ४५६ फूट लांब आणि ७ फूट उंच अशा ३२०० चौरस मीटरच्या भिंतीवर ‘वर्ल्ड लार्जेस्ट वारली पेंटिंग’ चितारण्यात आली आहे. त्याकरिता पालघर जिल्ह्यातील आदिवासी वारली महिला ‘द धवलेरी ग्रुप’च्या सहा चित्रकार औरंगाबाद येथे गेल्या होत्या. शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी या शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते महावीर चौक रस्त्यावरील एसटी कार्यशाळेच्या भिंतीवर १२० महिला चित्रकारांनी जगातील सर्वांत मोठे वारली चित्र सहा तासांत काढून विश्वविक्रमाला गवसणी घातली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

पालघर येथील आदिवासी वारली महिला ‘द धवलेरी ग्रुप’च्या कीर्ती नीलेश वरठा यांना १५ फेब्रुवारी रोजी एका एनजीओच्या माध्यमातून दूरध्वनीवरून या संकल्पनेची माहिती देण्यात आली, मात्र वारली पेंटिंग ही आमची ऑथेन्टिक असून त्याचे जीआय रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगून तुम्ही ती पेंटिंग या पद्धतीने काढू शकत नसल्याचे कीर्ती यांनी समजावले. वारली पेंटिंगचा व्यापार किंवा क्रेडिट तुम्ही घेऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या ग्रुपच्या मार्गदर्शन व सहकार्याने ही कलाकृती पूर्ण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. कीर्ती यांनी तो मान्य करून वारली पेंटिंग असलेली छायाचित्रे आयोजकांना पाठवली, मात्र ही पेंटिंग या ग्रुपच्या सूचनेनुसार काढावी, अशी अट घातली. 

ती मान्य झाल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील कीर्ती वरठा (पालघर माहीम), पूनम कोल (डहाणू वाकी), राजेश्री गोलीम (पालघर  नीहे), तारा बोंबाडे (पालघर आदिवासी नाका), तनया उराडे (केळवा रोठे), शालिनी कासट (पालघर) या सहा महिला वारली चित्रकार औरंगाबादला दाखल झाल्या. १७ फेब्रुवारीला स्थानिक १२० मुलींसह सकाळी १० वाजता या ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली चित्र काढण्यास प्रारंभ झाला. या पेंटिंगमध्ये वारली महिलेचे लग्नापासून ते मृत्यूपर्यंतचे पारंपरिक पद्धतीने दैनंदिन जीवन दाखविण्यात आले आहे. 

आदिवासींचे संपूर्ण जीवनआदिवासी समाजाचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते, समाजाचे पारंपरिक नृत्य, राहणीमान, सण-उत्सव, जल-जंगल-जमिनीशी जुळलेली नाळ इ. लहानसहान बाबींना चित्रात स्थान देण्यात आले आहे. ही पेंटिंग नसून वारली लिपी असल्याचे या महिला वारली चित्रकारांनी उपस्थितांना सांगितले. आदिवासींची जीवनपद्धती सर्वांनी अंगिकारल्यास पर्यावरणाचा जटील प्रश्न मार्गी लागू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या समाजाच्या पारंपरिक कलेचा विश्वविक्रम नोंदला गेला, त्याला आपला हातभार लागल्याने या सहाही महिला चित्रकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.