शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

जागतिक चिमणी दिन : काँक्रीटच्या जंगलामुळे मुंबईतून चिमणी उडाली भुर्रऽऽऽ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 07:05 IST

बदलत्या परिस्थितीशी चिमण्यांना जुळवून घ्यावे लागत असले तरी त्याचा फटका त्यांच्या जीवनशैलीला बसत आहे. 

सचिन लुंगसे - मुंबई : मुंबई शहरात सिमेंट-काँक्रीटचे जंगल वाढत असल्याने पर्यावरणाला हानी पोहोचत आहे.  या पर्यावरणाचा एक भाग असलेली चिऊताई मुंबईचे उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरांत स्थलांतरित हाेत आहे, असे निरीक्षण निसर्ग अभ्यासकांनी नोंदविले आहे.  भायखळा येथील राणीची बाग, धारावी येथील निसर्गउद्यान, बीकेसी येथील मिठी नदीचा परिसर, आरे कॉलनी, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर तसेच भांडुपसह लगतच्या परिसरातील हिरवळ आणि तिवरांच्या परिसरांत चिमण्या आढळून येत असल्या तरी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. पर्यावरणाची हानी होत असून, त्याचा फटका पक्ष्यांनाही बसत आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई झपाट्याने बदलली आहे. बदलत्या परिस्थितीशी चिमण्यांना जुळवून घ्यावे लागत असले तरी त्याचा फटका त्यांच्या जीवनशैलीला बसत आहे. मुंबईतील चिमण्यांचे स्थलांतर थांबवायचे असेल  तर त्यांना आवश्यक अधिवास तयार करण्याची गरज आहे. अधिकाधिक हिरवळ तयार करण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. शिवाय आपण राहतो त्या ठिकाणी चिमण्यांसाठी अन्न देणे, त्यांना पाणी देणे, त्यांच्यासाठी कृत्रिम घरटी बनविणे, आदी उपाय करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून असे उपाय केले जात आहेत. मात्र हे प्रमाण तुलनेने कमी आहे. ज्या पद्धतीने पर्यावरणाचा विनाश होत आहे, त्याच्या दुप्पट वेगाने पर्यावरण संवर्धनासाठी काम झाले पाहिजे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

‘चिमण्यांनी मुंबई साेडली, असे म्हणता येणार नाही’मुंबई शहरात सुरू असलेले खोदकाम, इतर अनेक बांधकामे, प्रकल्प कामे आणि सातत्याने होणारा आवाज अशा अनेक कारणांमुळे चिमण्या शहरातून उपनगरांत स्थलांतरित होत आहेत किंवा येथील त्यांचे प्रमाण कमी होत आहे. जेथे हिरवळ किंवा झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत, तिकडे चिमण्या वास्तव्यास प्राधान्य देत आहेत. पण याचा अर्थ चिमण्यांनी मुंबई सोडली, असा होत नाही. त्या स्थलांतरित होत आहेत, असे आपण म्हणू शकतो.  - विजय अवसरे, निसर्ग अभ्यासक

या चिमण्यांनो, परत फिरा...चिमण्यांनी मुंबईत पुन्हा यावे यासाठी त्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देणे, घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी, घराभोवती छोटी झाडेझुडपे लावणे, दाणा-पाणी ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई