शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केंद्राने लस, निधी देऊनही राज्य सरकारचे काम संथच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 08:17 IST

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार; धोका लक्षात घेऊन गती वाढवा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना लस, औषधांसह वाढीव निधीही दिला आहे. त्यामुळे आता राज्याने काम करण्याची गरज आहे. सध्या राज्य सरकारचे काम संथगतीने सुरू आहे. राज्य सरकार काम करत आहे. परंतु, राज्य सरकारने आपल्या कामाची गती वाढवली पाहिजे, असे मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ओमायक्रॉनबाबत मंगळवारी मंत्री भारती पवार यांनी सह्याद्री अतिथिगृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना कळविले होते; पण ते आले नाहीत. अधिकारी आले आणि आम्ही आढावा घेतला, सूचना केल्या. आता राज्यांनी अंमलबजावणी करावी, असे सांगून भारती पवार म्हणाल्या की, सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या त्या राज्यांनी काय निर्णय घ्यावेत, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. 

यासंदर्भात राज्याने वेळीच पावले उचलायला हवी. प्रत्येक राज्यातील स्थितीवर केंद्र सरकारचे लक्ष आहे. प्रादुर्भाव वाढल्यास लॉकडाऊन करण्याचे अधिकार राज्याला दिले आहेत. आताच काळजी घेतली तर प्रसार रोखता येईल. यासाठी केंद्र सरकार सातत्याने नियमावली देत आहे.  केंद्रीय आरोग्य सचिव सर्व राज्यातील आरोग्य सचिवांसोबत  चर्चा करत आहेत, असेदेखील डॉ. भारती पवार म्हणाल्या.

मदत मिळत नसल्यास मंत्र्यांनी लेखी कळवावेकेंद्र सरकारकडून आवश्यक मदत दिली जात नसल्याचे आरोप डॉ. भारती पवार यांनी यावेळी फेटाळून लावले. केंद्र सरकारने राष्ट्रीय आरोग्य योजनेशिवायही निधी मंजूर केला आहे. सर्वच बाबतीत केंद्र सरकारने राज्याला मदत दिलेली आहे. त्यामुळे जर कोणी मंत्री मदत मिळत नसल्याचे विधान करत असतील तर त्यांनी तसे लेखी कळवावे. जेणेकरून आम्ही काय दिले नाही ते तरी आम्हाला कळेल; पण केंद्राने जे दिले त्याचे काय झाले, असाही प्रश्न यानिमित्ताने समोर येतो, असेही पवार यावेळी म्हणाल्या.

राज्यभरात १७० निवासी डॉक्टर कोरोनाबाधितnमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील रुग्णालयांमधील मनुष्यबळाचा तुटवडा भरून काढा, या मागणीसाठी सुरू असलेला सेंट्रल मार्ड या निवासी संघटनेचा संप मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर सोमवारी संपला, मात्र आता मंगळवारी राज्यातील १७० निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सेंट्रल मार्डने दिली आहे.nपालिका रुग्णालयात आणि जम्बो कोरोना केंद्रांमध्ये मिळून ६० आरोग्य कर्मचारी, पॅरा वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. पालिका क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.nनिवासी डॉक्टरांवर कामाचा मोठा ताण आहे. निवासी डॉक्टर मोठ्या संख्येने कॊरोनाग्रस्त होत आहेत. अशा वेळेस त्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्याऐवजी त्यांच्यावरील कामाचा भार, कामाच्या वेळेत बदल करत वाढवण्यात येत असल्याचे म्हणत निवासी डॉक्टरांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या