शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

मुंबई-बडोदा महामार्गाचे काम जानेवारीपासून सुरू

By admin | Updated: September 14, 2016 06:16 IST

मुंबई-बडोदा या ३५० किलोमीटर लांबीच्या आणि १४ हजार कोटी रुपये खर्चाच्या महामार्गाचे काम १ जानेवारी २०१७ पासून सुरू होणार असून २०१९ पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल

मुंबई : मुंबई-बडोदा या ३५० किलोमीटर लांबीच्या आणि १४ हजार कोटी रुपये खर्चाच्या महामार्गाचे काम १ जानेवारी २०१७ पासून सुरू होणार असून २०१९ पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’मध्ये केली. यावेळी त्यांनी देशाच्या विकासाचा ‘रोड’मॅपच सादर केला.उद्योग, राजकारण आणि प्रशासनातील दिग्गजांच्या उपस्थितीत आयोजित या कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्प, त्यातील अडचणी, उपाययोजना आणि भविष्य या विषयावर दिवसभर सखोल चिंतन झाले. महाराष्ट्राची वेगवान प्रगती साधण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेले विविध घटक या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. दिवसभर चाललेल्या कॉन्क्लेव्हचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकमत मीडियाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चिफ आणि राज्याचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा, येस बँकेचे अध्यक्ष संजय पालवे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष राघव चंद्रा, एमईपी इन्फ्रास्ट्रक्चरचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर, जेएसडब्ल्यूचे सीईओ कॅप्टन बीव्हीजेके शर्मा आणि ‘टॉपवर्थ’चे अध्यक्ष अभय लोढा आदी उपस्थित होते. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी कॉन्क्लेव्हच्या आयोजनामागील लोकमतची भूमिका स्पष्ट केली. गडकरी यांचे भाषण म्हणजे स्वप्ननगरीची जणू सोनेरी सफरच! अत्यंत प्रभावीपणे पण तेवढ्याच प्रामाणिकपणे त्यांनी केलेले भाषण सगळ्यांनीच उत्स्फूर्तपणे स्वीकारले. कोणताही कागद हातात न धरता देशभरात कुठे, किती लांबीचे आणि किती खर्चाचे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत, किती प्रकल्प येऊ घातले आहेत याची सगळी आकडेवारी गडकरी यांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे सादर केली. मुंबई-गोवा महामार्गाचे सिमेंट काँक्रिटचे चौपदरीकरण १२ हजार कोटी रुपये खर्चून २०१८ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल.नागपूर-बुटीबोरी ते रत्नागिरी असा विकासाचा महामार्ग १२ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. तुम्ही हे लिहून ठेवा...कोट्यवधींचे रस्ते वाहतुकीपेक्षा जलवाहतुकीचे महत्त्व कितीतरी जास्त असेल हे सांगताना आपल्या खुमासदार शैलीत गडकरी यांनी देशाच्या वाहतूक विकासाचा भव्यदिव्य आराखडा समोर ठेवत उपस्थितांना स्वप्ननगरीत नेऊन ठेवले. त्याचेवळी, मी दिलेला हा शब्द आहे आणि तो मी पूर्ण करणारच हे तुम्ही लिहून ठेवा,असा शब्ददेखील दिला. मुंबई-वडोदा महामार्गाची घोषणा लोकमतच्या व्यासपीठावरुन करताना आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की हा मार्ग पुढे अहमदाबादला जोडला जाईल. राज्याच्या विकासाचे नवे दालन या निमित्ताने उघडले जाईल. आळंदी, पंढरपूर, देहू, गाणगापूर, तुळजापूरसह विविध धार्मिक व पर्यटनस्थळे महामार्गाने जोडण्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. पंढरपूरच्या पालखीच्या मार्गावर वारकऱ्यांसाठी थांबण्याच्या जागा, व इतर सुविधा उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. इंदूर-मनमाड रेल्वेमार्गाचे काम चालू वर्षाअखेर सुरू करण्यात येईल. त्यात ५० टक्के निधी हा रेल्वे खात्याचा तर उर्वरित निधी हा आपल्या विभागाचा असेल, असे गडकरी यांनी जाहीर केले. मनमाड-कसारा मार्गे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत मालाची वाहतूक केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ------------ - ---------- मी दिल्लीत महाराष्ट्राचा अ‍ॅम्बेसडरविकासाबाबत राज्यातील कोणत्याही भागावर अन्याय केला जाणार नाही, असा शब्द देऊन गडकरी म्हणाले की चौफेर विकास हेच माझे आणि मुख्यमंत्र्यांचेदेखील लक्ष्य आहे. मी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा अ‍ॅम्बेसडर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे गडकर म्हणाले. ------------ अच्छे दिन’ आमच्यासाठी ‘गले की हड्डी’!माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी अनिवासी भारतीयांच्या एका परिषदेत ‘अच्छे दिन आने को अभी वक्त लगेगा’ असे विधान केले होते. त्यावर,‘अच्छे दिन आनेवाले है’ असे विधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तेव्हापासून ‘अच्छे दिन’ ही आमच्यासाठी ‘गले की हड्डी’ बनली आहे, अशा शब्दात गडकरी यांनी ‘अच्छे दिन’वरून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपला देश अतृप्त आत्म्यांचा समुद्रच आहे. लोकांकडे सायकल असेल तर त्यांना मोटरसायकल हवी असते आणि ती आली की चारचाकी पाहिजे असते. ‘अच्छे दिन’ हे आपल्या समाधानावर अवलंबून असते, असे ते म्हणाले. --------------- नितीन गडकरींच्या भाषणातून...सध्या ९७ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. ते २ लाख किलोमीटरर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात पावणेतीन लाख किमीपर्यंत जाईल. रस्ते, सागरी वाहतूक, बंदर विकास यावर २५ लाख कोटी रुपये खर्च करणार. रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यास सर्वोच्च प्राधान्य देणार. येत्या तीन वर्षांत रस्ते अपघातांचे प्रमाण किमान निम्म्यावर आणण्याचे लक्ष्य. त्यासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च करणार. सरकार ही द्रौपदीची थाळी आहे. आमच्याकडे निधीची कमतरता नाही. विकासाबाबत राजकीय इच्छाशक्ती व दूरदृष्टी आणि प्रशासनाचे सहकार्य असेल तर गतिमान विकास होईल.