शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘शब्दप्रभूं’ची अमोघ वाणी ग्रंथरूपात उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 11:30 IST

मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात, वक्तृत्वात आणि जीवनविषयक तत्वज्ञानात असल्याने ''त्यांना'' मोठा श्रोतृवर्ग मिळाला.

ठळक मुद्देअक्षरब्रह्म प्रकाशनाच्या वतीने ही पुस्तके प्रकाशित केली जाणार जीवनचरित्र, साहित्य, सामाजिक, विज्ञान आणि धर्म आणि आई विषयांचा या ग्रंथात समावेश

पुणे:   ‘ बंधू भगिनींनो’ अशा प्रारंभापासून अंतापर्यंत रसिकमनाला खिळवून ठेवणारी ‘शब्दप्रभू’ प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची अमोघ वाणीतील  व्याख्यानं म्हणजे श्रोतृवर्गासाठी जणू पर्वणीच. त्यांची व्याख्यानं न ऐकलेला व्यक्ती अवघ्या महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. चार तपाहून अधिक काळ आपल्या ओघवत्या शैली आणि विचारसंपन्न अशा वक्तृत्वाद्वारे समाजमन समृद्ध करणाऱ्या या तत्वचिंतकाची व्याख्यानं आता प्राचार्य प्रेमी आणि साहित्यरसिकांसाठी लवकरच ग्रंथरूपात उपलब्ध होणार आहेत. या माध्यमातून प्राचार्यांच्या श्रवणीय व्याख्यानांचा हा अक्षररूपी ठेवा कायमस्वरूपी पुस्तकदालनात संग्रही करून ठेवता येणार आहे.     अक्षरब्रह्म प्रकाशनाच्या वतीने ही पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना  प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे चरित्रकार आणि या प्रकल्पाचे संपादक प्रा मिलिंद जोशी  म्हणाले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे वक्तृत्व हा मराठी वक्तृत्चाचा मानबिंदू आहे.  महाराष्ट्राची श्रवण संस्कृती समृद्ध करण्यात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे मोठे योगदान आहे.  त्यांचे संपूर्ण जीवन ही स्फूर्ती गाथा आहे. मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात, वक्तृत्वात आणि जीवनविषयक तत्वज्ञानात असल्याने त्यांना मोठा श्रोतृवर्ग मिळाला. त्यांच्या हयातीत त्यांच्या व्याख्यानाच्या कॅसेट ,सीडीज निघाल्या होत्या. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आजही मिळतो आहे. यु ट़यूब वर त्यांची व्याख्याने ऐकणाऱ्या  तरुणाईची संख्या मोठी आहे. परदेशातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.  जसे बोलणे तसे लिहिणे आणि जसे लिहिणे तसे बोलणे या मुळे प्राचार्यांच्या लेखनाचा चाहता वर्ग ही खूप मोठा आहे.  या साऱ्यांकडून तसेच  संशोधक,अभ्यासक,आणि स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी यांच्याकडून भोसले यांची व्याख्याने ग्रंथ रुपात यावीत अशी मागणी सातत्याने सुरू होती.  तिचा विचार करून हा प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले.          विविध विषयांचे अफाट वैविध्य, संदर्भांची श्रीमंती,  प्राचार्यांचे तत्त्वचिंतन आणि अवघड विषय सोपे करून सांगण्याची त्यांची हातोटी या मुळे अनेकविध विषयांवरची त्यांची व्याख्याने हा मराठी माणसांसाठीचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे.  तो अक्षररुपात जतन करणेही तितकेच महत्वाचे आहे.  म्हणून हा प्रकल्प हाती घेतला आहे. ‘बंधू भगिनींनो’ हेच नाव या ग्रंथालाही देण्यात येणार असून, थोरांची जीवनचरित्र, शिक्षण, साहित्य, सामाजिक,यासारख्या विषयांबरोबर विज्ञान आणि धर्म आणि आई या गाजलेल्या विषयांचा या ग्रंथात समावेश असेल. येत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी हे ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध होतील, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य