शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

‘शब्दप्रभूं’ची अमोघ वाणी ग्रंथरूपात उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 11:30 IST

मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात, वक्तृत्वात आणि जीवनविषयक तत्वज्ञानात असल्याने ''त्यांना'' मोठा श्रोतृवर्ग मिळाला.

ठळक मुद्देअक्षरब्रह्म प्रकाशनाच्या वतीने ही पुस्तके प्रकाशित केली जाणार जीवनचरित्र, साहित्य, सामाजिक, विज्ञान आणि धर्म आणि आई विषयांचा या ग्रंथात समावेश

पुणे:   ‘ बंधू भगिनींनो’ अशा प्रारंभापासून अंतापर्यंत रसिकमनाला खिळवून ठेवणारी ‘शब्दप्रभू’ प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची अमोघ वाणीतील  व्याख्यानं म्हणजे श्रोतृवर्गासाठी जणू पर्वणीच. त्यांची व्याख्यानं न ऐकलेला व्यक्ती अवघ्या महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. चार तपाहून अधिक काळ आपल्या ओघवत्या शैली आणि विचारसंपन्न अशा वक्तृत्वाद्वारे समाजमन समृद्ध करणाऱ्या या तत्वचिंतकाची व्याख्यानं आता प्राचार्य प्रेमी आणि साहित्यरसिकांसाठी लवकरच ग्रंथरूपात उपलब्ध होणार आहेत. या माध्यमातून प्राचार्यांच्या श्रवणीय व्याख्यानांचा हा अक्षररूपी ठेवा कायमस्वरूपी पुस्तकदालनात संग्रही करून ठेवता येणार आहे.     अक्षरब्रह्म प्रकाशनाच्या वतीने ही पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना  प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे चरित्रकार आणि या प्रकल्पाचे संपादक प्रा मिलिंद जोशी  म्हणाले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे वक्तृत्व हा मराठी वक्तृत्चाचा मानबिंदू आहे.  महाराष्ट्राची श्रवण संस्कृती समृद्ध करण्यात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे मोठे योगदान आहे.  त्यांचे संपूर्ण जीवन ही स्फूर्ती गाथा आहे. मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात, वक्तृत्वात आणि जीवनविषयक तत्वज्ञानात असल्याने त्यांना मोठा श्रोतृवर्ग मिळाला. त्यांच्या हयातीत त्यांच्या व्याख्यानाच्या कॅसेट ,सीडीज निघाल्या होत्या. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आजही मिळतो आहे. यु ट़यूब वर त्यांची व्याख्याने ऐकणाऱ्या  तरुणाईची संख्या मोठी आहे. परदेशातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.  जसे बोलणे तसे लिहिणे आणि जसे लिहिणे तसे बोलणे या मुळे प्राचार्यांच्या लेखनाचा चाहता वर्ग ही खूप मोठा आहे.  या साऱ्यांकडून तसेच  संशोधक,अभ्यासक,आणि स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी यांच्याकडून भोसले यांची व्याख्याने ग्रंथ रुपात यावीत अशी मागणी सातत्याने सुरू होती.  तिचा विचार करून हा प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले.          विविध विषयांचे अफाट वैविध्य, संदर्भांची श्रीमंती,  प्राचार्यांचे तत्त्वचिंतन आणि अवघड विषय सोपे करून सांगण्याची त्यांची हातोटी या मुळे अनेकविध विषयांवरची त्यांची व्याख्याने हा मराठी माणसांसाठीचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे.  तो अक्षररुपात जतन करणेही तितकेच महत्वाचे आहे.  म्हणून हा प्रकल्प हाती घेतला आहे. ‘बंधू भगिनींनो’ हेच नाव या ग्रंथालाही देण्यात येणार असून, थोरांची जीवनचरित्र, शिक्षण, साहित्य, सामाजिक,यासारख्या विषयांबरोबर विज्ञान आणि धर्म आणि आई या गाजलेल्या विषयांचा या ग्रंथात समावेश असेल. येत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी हे ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध होतील, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य