शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

आश्रमशाळांत महिला अधीक्षिका पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 03:24 IST

खालापूर तालुक्यातील डोलवली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तीन दिवसांपूर्वी किरकोळ आजाराने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.

कांता हाबळे,

नेरळ- खालापूर तालुक्यातील डोलवली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तीन दिवसांपूर्वी किरकोळ आजाराने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील महिला अधीक्षिकापद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. तर एकूणच कर्जत तालुक्यातील पाचपैकी चार आश्रमशाळेत महिला अधीक्षिका नसल्याचे उघड झाले आहे. कर्जत तालुक्यात भालीवडी, पिंगळस, पाथरज, कळंब, चाफेवाडी अशा पाच ठिकाणी शासकीय आणि माणगाववाडी येथे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहेत. तालुक्यातील विविध भागांतील आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी याठिकाणी निवासी शिक्षण घेतात. पिंगळस वगळता अन्य चार ठिकाणच्या आश्रमशाळेत बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी पुरु ष अधीक्षक आणि विद्यार्थिनींकडे लक्ष देण्यासाठी महिला अधीक्षिका यांच्या नियुक्त्या आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येतात. मोठ्या प्रमाणात मुली शिक्षण घेत असल्याने कायमस्वरूपी निवासी तत्त्वावर महिला अधीक्षिका यांचे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आश्रमशाळेतील मुलींच्या शारीरिक आरोग्य, शिक्षण,समुपदेशन, शारीरिक अडचणी, यांच्याविषयीची जबाबदारी दिलेली असते. ते पद त्यासाठीच निवासी ठेवण्यात आले असून मुली वयात आल्यानंतर त्यांच्या शरीरातील बदल यांची जाणीव करण्याची जबाबदारी महिला अधीक्षिका या पार पाडतात. परंतु आदिवासी आश्रमशाळेतील महिला अधीक्षिका यांच्या नियुक्तीचा प्रश्न अनेक वर्षे कायम आहे.भालीवडी येथे १00 टक्के मुलींची शासकीय आश्रमशाळा असून तेथील महिला अधीक्षकपद जानेवारी २०१४ पासून रिक्त होते. त्या ठिकाणी कळंब येथील शासकीय आश्रमशाळेतील महिला अधीक्षिका यांना जून २०१६ मध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. चाफेवाडी आश्रमशाळेत अनेक वर्षे महिला अधीक्षिका पद रिक्त असून सध्या स्वयंपाकी महिला हा कार्यभार सांभाळत आहे. या पदासाठी पदवीनंतर एमएसडब्लू ही पदविका असलेल्या उमेदवाराला संधी राज्य सरकार देत असते. मात्र चाफेवाडीत जेमतेम सातवी शिकलेल्या स्वयंपाकी या महिला अधीक्षिका आहेत, हे दुर्दैव आहे. भक्ताची वाडी म्हणजे पिंगळस येथील आदिवासी आश्रमशाळेत देखील महिला अधीक्षिका यांचे पद आलटून पालटून स्थानिक शिक्षिका सांभाळत आहेत.>मनुष्यबळाच्या अभावामुळे दुर्लक्ष आश्रमशाळांच्या दुरवस्था, अपुऱ्या मनुष्यबळाबाबत कर्जत येथील दिशा केंद्राचे कार्यकारी संचालक अशोक जंगले यांनी जून २०१६ मध्ये राज्यपाल विद्यासागर राव यांचे लक्ष वेधले होते. आश्रमशाळेतील महिला अधीक्षिका यांचे रिक्त पदे आणि याठिकाणी नियुक्त असलेले कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याबाबत रायगड जिल्हाधिकारी शीतल तेली यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.>डोलवली येथील किंवा कोणत्याही आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थी किरकोळ आजारी पडला तरी संबंधित सर्व शाळा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून पाल्य आजारी आहे असे कळवून आपली जबाबदारी झटकतात. मग डोलवली येथे मुलगी मृत झाल्यानंतर सांगितले याचा अर्थ पालकांना समजू शकला नाही. त्यामुळे पालक आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षणावर नाराज होत आहेत.- अशोक जंगले, दिशा केंद्र170 मुले-मुली शिकत असलेल्या आश्रमशाळेची जबाबदारी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या शिक्षिकेवर दिली आहे. त्या शिक्षिका निवासी नसल्याने केवळ तात्पुरत्या नियुक्तीवर असतात. पाथरज येथे कायमस्वरूपी महिला अधीक्षिका यांचे पद भरलेले आहे, पण तेथील शिक्षकवर्ग निवासी व्यवस्था असतानाही शहराच्या ठिकाणी राहण्यास प्राधान्य देत असल्याचे उघड झाले आहे. चाफेवाडी या आश्रमशाळेत सर्वच सरकारी नियम धाब्यावर बसवण्यात आले आहे.