शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना मंदिरात प्रवेश द्यावा लागेल

By admin | Updated: March 31, 2016 03:43 IST

प्रार्थनास्थळामध्ये महिलांच्या प्रवेशास मज्जाव करणारा कोणताही कायदा नाही आणि मंदिरात पुरुषांना प्रवेश दिला जात असेल तर महिलांनाही दिला जायला हवा, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी

मुंबई : प्रार्थनास्थळामध्ये महिलांच्या प्रवेशास मज्जाव करणारा कोणताही कायदा नाही आणि मंदिरात पुरुषांना प्रवेश दिला जात असेल तर महिलांनाही दिला जायला हवा, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केले. त्याचबरोबर कोणालाही मंदिरात प्रवेशबंदी करणाऱ्यास सहा महिने तुरुंगात धाडण्याचा कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीच्या विरोधात अ‍ॅड. नीलिमा वर्तक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विद्या बाळ यांनी केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले.सरकारी वकील अभिनंदन वाग्यानी यांनी माहिती घ्यावी व शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश मिळेल याची खात्री राज्य सरकार देणार का याविषयी येत्या शुक्रवारी (१ एप्रिल) निवेदन करावे, असे निर्देश मुख्य न्यायाधीश न्या. धीरेंद्र वाघेला व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठाने दिले. त्यामुळे आता महिलांना शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेश देण्याचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात आला आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश देण्याची गरज स्पष्ट करताना मुख्य न्यायाधीश सरकारला उद्देशून म्हणाले की, कोणालाही मंदिरांमध्ये प्रवेशबंदी निषिद्ध ठरविणारा ‘महाराष्ट्र हिंदू प्लेस आॅफ वर्शिप (एन्ट्री आॅथोरायझेशन) अ‍ॅक्ट, १९५६’ हा कायदा तुम्हीच केला आहे. या कायद्यानुसार मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्यास सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा आहे. न्यायालयाने असे म्हटले की, तुमचाच कायदा आहे, त्याची अंमलबजावणी करा. या कायद्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन सर्वसामान्य लोकांना त्यातील तरतुदींची माहिती करून द्या.महिलांना प्रार्थनास्थळांमध्ये बंदी घालणारा कायदाच अस्तित्वात नाही. जर पुरुषांना प्रवेश देत असाल तर महिलांनाही प्रवेश द्यायलाच पाहिजे. गाभाऱ्यात जाऊन देवाची पूजा केली जाते. मग महिलांना बाहेर कसे ठेवता? त्यामुळे एखादी महिला गाभाऱ्यात जाऊन पूजा करत असेल तर सरकारने तिला बाहेर काढण्याऐवजी तिला संरक्षण द्यायला हवे, असेही मुख्य न्यायाधीशांनी बजावले. देवाच्या पावित्र्यााविषयी सरकारला चिंता वाटत असेल तर तसे सांगा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.महिलांना शनी शिंगणापूरमध्ये प्रवेश मिळावा यासाठी ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले. त्यानंतर न्यायालयात ही याचिका केली गेली आहे. महिलांची प्रवेशबंदी मनमानी, बेकायदा असून समानतेच्या मूलभूत हक्काची पायमल्ली करणारी आहे, असे याचिकाकर्त्यांचे प्रतिपादन आहे. महिलांना केवळ मंदिरातच नव्हे तर गर्भगृहातही प्रवेश मिळायला हवा, अशी त्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)आंदोलनास बळ मिळाले!उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतामुळे महिलांच्या मंदिरप्रवेशाच्या आंदोलनाला एकप्रकारे बळ मिळाले आहे, असे एक याचिकाकर्र्त्या विद्या बाळ यांनी म्हटले आहे. डॉ. बाळ म्हणाल्या की, महाराष्ट्रात मंदिरातील कोणाचीही प्रवेशबंदी निषिद्ध ठरविणारा कायदा १९५६ पासून आहे. तरीही निरर्थक चर्चा घडत आहेत. नव्याने कायदा करण्यापेक्षा या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. न्यायालयाने याचिका तातडीने सुनावणीस घेतली हे स्वागतार्ह आहे. मुळात कुठल्याही राजकीय पक्षाने धर्मनिरपेक्षता मान्य केलेली नाही. देवस्थानची सावध भूमिकान्यायालयाच्या या मताबाबत शिंगणापुरातून सावध भूमिका व्यक्त करण्यात आली आहे. शनिदेवाच्या मंदिरात महिलांना प्रवेश असून चौथऱ्यावरील प्रवेशाबाबत न्यायालयाने भाष्य केलेले नाही. त्यामुळे सरकार न्यायालयात काय निवेदन करते ते पाहून पुढील दिशा ठरेल, असे देवस्थानचे साहाय्यक कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांनी सांगितले. कोर्टाचा लेखी आदेश पाहिल्याशिवाय याबाबत आपणाला मतप्रदर्शन करता येणार नाही, असे देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांनी सांगितले. शिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब बानकर यांनी स्त्री आणि पुरुष असा कुठलाही भेदभाव येथील मंदिरात नाही, मात्र चौथऱ्याबाबत ग्रामस्थांची वेगळी भूमिका असल्याचे ते म्हणाले. मात्र, शिंगणापूर देवस्थान बचाव कृती समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी विरोधी सूर कायम ठेवला.