शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

महिला पोलीस कर्मचा-यांकडून आदिवासी महिलांना मारहाण

By admin | Updated: October 13, 2016 23:56 IST

महिला पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून केली जात असून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या सोडणार नसल्याचे भाजपचे शहापूर तालुकाध्यक्ष सुभाष हरड यांनी सांगितले

ऑनलाइन लोकमतशहापूर, दि. 13 - ग्रामपंचायत निवडणूक काळात झालेल्या वादानंतर शहापूर कोर्टात जामीन देण्यासाठी किन्हवली पोलीस ठाण्यात हजर झालेल्या आदिवासी महिला येथीलच काही महिला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीप्रकरणी शहापूर भाजपच्या वतीने गुरुवारी राञी 9 वाजेपासून ठिय्या धरण्यात आला आहे. सदर महिला पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून केली जात असून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या सोडणार नसल्याचे भाजपचे शहापूर तालुकाध्यक्ष सुभाष हरड यांनी सांगितले आहे.

शहापुर तालुक्यातील कानडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक 25 जुलै रोजी पार पडली यावेळी भाजप व सेनेत शीतयुध्द रंगल्याने वाद उफाळून आला होता. याचे पर्यावसान हाणामारीत झाले होते याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात 54 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी 15 महिलांना शहापुर कोर्टात जामीन दयावयाचा असल्याने कानडी येथील गुन्ह्यात असलेल्या 15 महिला किन्हवली पोलीस ठाण्यात हजर झाल्या असताना किन्हवली पोलीस ठाण्यातील काही महिला पोलीस कर्मचा-यांकडून आदिवासी महिलांना चप्पला व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भाजपकडुन गुरुवारी 9 वाजेपासून ठिय्या धरण्यात आला असुन महिला पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडुन केली जात आहे या ठिय्या आंदोलनास भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष शितल तोंडलीकर, जिल्हा सरचीटणीस जयश्री चव्हाण, सुवर्णा ठाकरे, सुरेखा इरनक, जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा दिनकर, महिला तालुकाध्यक्षा मीनाक्षी मडके, अशोक इरनक, दिपक विशे, मुकुंद शिर्के, नरसु गावंडा आदींसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या धरला आहे