शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 07:47 IST

शैक्षणिक, आरोग्य विषयक समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण करणे. कुपोषण, बालमृत्यू कमी करणे, लिंगभेद व बालविवाह रोखणे, हिंसाचारमुक्त कुटुंब निर्माण करणे हा या आदिशक्ती अभियानाचा उद्देश असेल.

लोकमत न्यूज नेटवर्कचोंडी (जि. अहिल्यानगर) : राज्यात महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीच्या औचित्याने अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या चोंडीत खास मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली.

शैक्षणिक, आरोग्य विषयक समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण करणे. कुपोषण, बालमृत्यू कमी करणे, लिंगभेद व बालविवाह रोखणे, हिंसाचारमुक्त कुटुंब निर्माण करणे हा या आदिशक्ती अभियानाचा उद्देश असेल. या क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार दिले  जातील. त्यासाठी साडेदहा कोटींचा निधी खर्च केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अहिल्यादेवींवर चित्रपटपुण्यश्लोक आहिल्यादेवी यांच्या जीवनावर अद्ययावत तंत्रज्ञान वापरून बहुभाषिक चित्रपट निर्माण करू. या चित्रपटातून त्यांच्या कार्याची प्रभावी मांडणी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नामांकित शाळांमध्ये प्रवेशधनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांत प्रवेश देण्यासाठी राजे यशवंत होळकर यांचे नावे ‘यशवंत विद्यार्थी योजना’ राबविण्यात येणार आहे.  समाजातील दहा हजार विद्यार्थी नामांकित शाळांमध्ये शिकतील.   समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभाग स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना सुरू करणार. मुला-मुलींसाठी दोनशे जागा असतील.  

अहिल्यादेवींच्या नावे वैद्यकीय महाविद्यालयजिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय कॉलेज अशी घोषणा सरकारने केली होती. त्यानुसार अहिल्यानगरला शंभर विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी ४८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बैठकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री, सचिव चार हेलिकॉप्टरमधून चोंडी येथे दाखल झाले.  

३३ कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती...बैठकीला ३३ कॅबिनेट मंत्री, ६ राज्य मंत्री, विविध विभागांचे ४० सचिव उपस्थित होते. अनेक अधिकारी व मंत्री अहिल्यानगर शहरात मुक्कामी होते.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार