शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

दिराकडून फसवणूक झालेल्या मिताली कांबळेना महिला आयोगाने मिळवून दिला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 17:27 IST

आर्थिक फसवणूक झाल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाद मागायला आलेल्या मिताली कांबळे यांना आयोगाच्या जलद कार्यवाहीने हक्काचे १४ लाख परत मिळाले आहेत.

मुंबई- आर्थिक फसवणूक झाल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाद मागायला आलेल्या मिताली कांबळे यांना आयोगाच्या जलद कार्यवाहीने हक्काचे १४ लाख परत मिळाले आहेत.मुंबईत राहणाऱ्या मिताली महेंद्र कांबळे (वय ५० वर्षे),  त्यांचे पती महेंद्र कांबळे  बेस्ट मध्ये कार्यरत होते. पतीच्या निधनानंतर मिताली आपलं दुःख आवरत आपल्या दोन मुलांकडे पाहत जगत होत्या. पतीच्या जाण्यानंतर हक्काचे पैसे त्यांनी बेस्ट कार्यालयात फेऱ्या मारून मिळवले. जी काही रक्कम मिळाली ती भविष्याच्या तरतुदीसाठी ठेवली. दोन्ही मुलं शिक्षण घेणारी,  त्यांच्या शिक्षणासाठी पतीच्या निधनानंतर काही महिन्यांनी  मिळालेल्या रकमेतून तरतूद करावी म्हणून बँकेत पैसे काढायला गेल्या आणि आपल्या खात्यावर पैसेच नाही हे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्याकडे नावावर असलेल्या चेकबुक मधूनच पैसे काढण्यात आले होते. पतीच्या निधनानंतर मिताली यांच्या दीराने बेस्टमधून लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करू तसेच भविष्यात सहकार्य करू अस सांगत मिताली आणि स्वतःच्या नावावर संयुक्त खाते बँकेत उघडले होते. आणि त्यातूनच सहीचा, खाते  चालवण्याचा  अधिकार मिळाल्याने मिताली यांच्या नकळत बँकेतील रक्कम परस्पर काढून घेतली. दिराला याबाबत विचारणा  करायला गेलेल्या मिताली यांना आणि त्यांच्या मुलांना हाकलून लावण्यात आले.बेस्ट प्रशासनाने धनादेश पत्नीच्या नावे दिला होता तसेच बँकेचे खाते ही संयुक्त होते त्यामुळे कायदेशीरदृष्टया त्यांना न्याय मिळणे कठीण होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे मिताली यांनी दाद मागितली. दिराने काढून घेतलेली बँकेतील रक्कम खर्च करण्याआधीच याप्रकरणी दखल घेणे गरजेचे होते. त्यामुळे संबंधित नातेवाईकांना तातडीने आयोगात उपस्थित राहण्यास सांगून समज देण्यात आली. आयोगाच्या कारवाईचा धसका घेऊन संबंधित नातेवाईकांनी १५ दिवसात आयोगाच्या कार्यालयातच समुपदेशकांच्या समक्ष मिताली कांबळे यांना त्यांचे १२ लाख धनादेशाद्वारे परत केले असून उर्वरित २ लाख लवकरच परत करणार आहेत.'कायद्याच्या दृष्टीने मी त्यांच्याशी लढू शकले नसते मात्र आयोगातील कर्मचाऱ्यांनी संवेदनशील आणि जलद हा विषय मार्गी लावल्याने न्याय मिळाला, मी ऋणी आहे' अस सांगत मिताली यांनी आयोगाचे आणि अध्यक्षा विजया रहाटकर यांचे आभार मानले आहेत.