शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

दिराकडून फसवणूक झालेल्या मिताली कांबळेना महिला आयोगाने मिळवून दिला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 17:27 IST

आर्थिक फसवणूक झाल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाद मागायला आलेल्या मिताली कांबळे यांना आयोगाच्या जलद कार्यवाहीने हक्काचे १४ लाख परत मिळाले आहेत.

मुंबई- आर्थिक फसवणूक झाल्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे दाद मागायला आलेल्या मिताली कांबळे यांना आयोगाच्या जलद कार्यवाहीने हक्काचे १४ लाख परत मिळाले आहेत.मुंबईत राहणाऱ्या मिताली महेंद्र कांबळे (वय ५० वर्षे),  त्यांचे पती महेंद्र कांबळे  बेस्ट मध्ये कार्यरत होते. पतीच्या निधनानंतर मिताली आपलं दुःख आवरत आपल्या दोन मुलांकडे पाहत जगत होत्या. पतीच्या जाण्यानंतर हक्काचे पैसे त्यांनी बेस्ट कार्यालयात फेऱ्या मारून मिळवले. जी काही रक्कम मिळाली ती भविष्याच्या तरतुदीसाठी ठेवली. दोन्ही मुलं शिक्षण घेणारी,  त्यांच्या शिक्षणासाठी पतीच्या निधनानंतर काही महिन्यांनी  मिळालेल्या रकमेतून तरतूद करावी म्हणून बँकेत पैसे काढायला गेल्या आणि आपल्या खात्यावर पैसेच नाही हे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्याकडे नावावर असलेल्या चेकबुक मधूनच पैसे काढण्यात आले होते. पतीच्या निधनानंतर मिताली यांच्या दीराने बेस्टमधून लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न करू तसेच भविष्यात सहकार्य करू अस सांगत मिताली आणि स्वतःच्या नावावर संयुक्त खाते बँकेत उघडले होते. आणि त्यातूनच सहीचा, खाते  चालवण्याचा  अधिकार मिळाल्याने मिताली यांच्या नकळत बँकेतील रक्कम परस्पर काढून घेतली. दिराला याबाबत विचारणा  करायला गेलेल्या मिताली यांना आणि त्यांच्या मुलांना हाकलून लावण्यात आले.बेस्ट प्रशासनाने धनादेश पत्नीच्या नावे दिला होता तसेच बँकेचे खाते ही संयुक्त होते त्यामुळे कायदेशीरदृष्टया त्यांना न्याय मिळणे कठीण होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे मिताली यांनी दाद मागितली. दिराने काढून घेतलेली बँकेतील रक्कम खर्च करण्याआधीच याप्रकरणी दखल घेणे गरजेचे होते. त्यामुळे संबंधित नातेवाईकांना तातडीने आयोगात उपस्थित राहण्यास सांगून समज देण्यात आली. आयोगाच्या कारवाईचा धसका घेऊन संबंधित नातेवाईकांनी १५ दिवसात आयोगाच्या कार्यालयातच समुपदेशकांच्या समक्ष मिताली कांबळे यांना त्यांचे १२ लाख धनादेशाद्वारे परत केले असून उर्वरित २ लाख लवकरच परत करणार आहेत.'कायद्याच्या दृष्टीने मी त्यांच्याशी लढू शकले नसते मात्र आयोगातील कर्मचाऱ्यांनी संवेदनशील आणि जलद हा विषय मार्गी लावल्याने न्याय मिळाला, मी ऋणी आहे' अस सांगत मिताली यांनी आयोगाचे आणि अध्यक्षा विजया रहाटकर यांचे आभार मानले आहेत.