शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

कुटुंब कल्याण नसबंदी करण्यात महिला आघाडीवर !

By admin | Updated: August 17, 2016 18:36 IST

नसबंदी आणि दोन अपत्यांच्या जन्मात अंतर राखण्यासाठी शासनाने महिला व पुरुष दोघांसाठी कुटुंब कल्याण नसबंदी कार्यक्रम हाती घेतला.

नितीन गव्हाळे/ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 17 - लोकसंख्या स्थिर करणे, नसबंदी आणि दोन अपत्यांच्या जन्मात अंतर राखण्यासाठी शासनाने महिला व पुरुष दोघांसाठी कुटुंब कल्याण नसबंदी कार्यक्रम हाती घेतला. शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला व पुरुषांना ६00 व २५0 रुपये अनुदान दिले जाते; कुटुंब कल्याण नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यात महिला आघाडीवर आहेत. २0१५ व १६ या वर्षामध्ये राज्यात ३ लाख १८ हजार ८00 महिलांनी कुटुंब कल्याण नियोजनाची शस्त्रक्रिया केली. परंतु याबाबत पुरुषांमध्ये प्रचंड उदासीनता आहे. १ लाख १0 हजारांचं पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. देशातील वाढत्या लोकसंख्येस आळा बसावा आणि मुलाच्या आग्रहापोटी गर्भातील मुलींच्या हत्या होऊ नये, या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया योजना सुरू केली; परंतु या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद पुरुषांकडून मिळत नाही. कुटुंब नियोजनाबाबत महिला मात्र सजग असल्याचे दिसून येते. दोनपेक्षा अधिक मुले असू नयेत, असा महिलांचा आग्रह असतो; परंतु पुरुष त्यासाठी फारसे गंभीर नसतात. मुलाच्या आग्रहापोटी घरातील पाळणा लांबत जातो. मुलगा काय नि मुलगी काय, दोघेही सारखेच; परंतु अनेक कुटुंबांना वंशाचा दिवा हवा असतो. त्याचाही परिणाम कुटुंब नियोजनावर होतो. एका मुला, मुलीवर किंवा दोन मुला, मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी, यासाठी शासनाची योजना आहे. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमातीमधील महिला, पुरुषांना अनुक्रमे ६00 व २५0 रुपयांचा धनादेश देण्यात येतो; परंतु ही रक्कम अल्पशी असल्यामुळे अनेक महिला, पुरुष त्याकडे पाठ फिरवितात. पाहिजे त्या प्रमाणात कुटुंब कल्याण योजनेस प्रतिसाद मिळत नाही. कुटूंब कल्याणवर १४९ कोटींचा खर्च कुटूंब कल्याण नसबंदी कार्यक्रमांवर दरवर्षी शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. गत पाच वर्षांमध्ये आरोग्य विभागाने कुटूंब कल्याण नसबंदी कार्यक्रमावर १४९ कोटी ८८ लाख रूपये खर्च केला. यावर्षी सुद्धा १८ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. कुटुंब कल्याण नसबंदी करण्यासाठी महिलेला आठवडाभर रुग्णालयात भरती व्हावे लागते. शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा टाके काढण्यासाठी रुग्णालयात यावे लागते. त्यातुलनेत पुरुषांना त्रास कमी आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर पुरूष अर्ध्या तासात घरी जाऊ शकतात. असे असतानाही पुरुषांमध्ये कुटुंब नियोजनाविषयी प्रचंड उदासीनता आहे. -डॉ. अविनाश लव्हाळे, आरोग्य उपसंचालक