शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
4
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
5
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
6
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
7
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
8
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
9
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
10
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
11
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
12
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
13
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
14
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
15
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
16
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
17
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
18
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
19
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
20
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

शिवसेना-मनसेशिवाय होणार आघाडी; प्रकाश​​​​​​​ आंबेडकरांशी चर्चा करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 01:44 IST

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेला शुक्रवारी सुरूवात झाली. आघाडीत समविचारी पक्षांना सामावून घेण्याबाबतही चर्चा झाली. मात्र, मनसे अथवा शिवसेनेला सोबत घेता येणार नाही.

मुंबई : आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेला शुक्रवारी सुरूवात झाली. आघाडीत समविचारी पक्षांना सामावून घेण्याबाबतही चर्चा झाली. मात्र, मनसे अथवा शिवसेनेला सोबत घेता येणार नाही. शिवाय, या पक्षांचा समावेशाबाबत कोणताही प्रस्तावच अद्याप आला नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.जागावाटपाबात दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची शुक्रवारी धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, दिलीप वळसे-पाटील, शरद रणपिसे आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. दोन्ही पक्षांनी जिल्हानिहाय राजकीय स्थितीचा आढावा घेतला. दुष्काळ, वीजेचा तुटवडा अशा राज्यातील प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीत ३१ आॅक्टोबरपूर्वी जागा वाटप पूर्ण करण्याची मागणी केली होती. याबाबत विचारता लवकरात लवकर चर्चा पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. लवकरच ही प्रक्रीया पूर्ण होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.ते फक्त पुस्तकाचे निमंत्रणउद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांची भेट ही फक्त पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील उपस्थितीसाठी होती. या भेटीत राजकारण शोधू नका, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. आघाडीत त्यांनी यावे, यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आणि माणिकराव ठाकरे त्यांची भेट घेणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.अबू आझमी काँग्रेस नेत्यांच्या भेटीलासमाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आज काँग्रेस नेत्यांची भेट घेत महाआघाडीबाबत चर्चा केली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जागावाटपाच्या चर्चे आधीच आझमी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण