शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

15 दिवसाच्या आत एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा-भाईंदर मेट्रोसाठी तरतूद केली नाही तर जनआंदोलन - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 14:51 IST

मुख्यमंत्र्यांनी मीरा भाईंदरच्या जनतेला दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचे आश्वासनदेखील खोटेच ठरले आहे.

मीरारोड - मुख्यमंत्र्यांनी मीरा भाईंदरच्या जनतेला दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचे आश्वासनदेखील खोटेच ठरले आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष असताना एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी आर्थिक तरतूद न करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 15 दिवसात मेट्रोसाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली नाही तर जनआंदोलन उभारू असा इशारा काँग्रेसने दिलाय . 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल सावंत यांनी म्हटले आहे की, पालिका निवडणूक व त्या आधीपासून शहरात सतत येत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनांपैकी एक मेट्रोचे लॉलीपॉप दिले होते. भोळी जनतासुद्धा त्यात रममाण झाली. स्थानिक आमदारांनी जनतेकडून मेट्रोच्या प्रतिकृती स्वीकारल्या, सुखकर रेल्वे प्रवासाची स्वप्ने जनतेला दाखवलीय मेट्रो स्टेशनची नावं देखील नक्की केली. 2019 मध्ये जनतेने मेट्रोत बसायचे इतकी जुमलेबाजी करून भूरळ घातली होती . 

वास्तविक मीरा भाईंदर व पुढे वसई विरार हे मेट्रोने जोडावे अशी मागणी त्यावेळी माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी चालवली होती . तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यानी देखील मीरा-भाईंदर शहराचा मेट्रोमध्ये समावेश केला होता. पण याच भाजपा सरकारने मेट्रो रद्द केली असा आरोप सावंत यांनी केला. 

मेट्रोच्या मागणी साठी काँग्रेस पक्षाने नागरिकांसह शहरात आंदोलन केले. स्वाक्षरी मोहीम राबवली. भाजपा मुख्यमंत्र्यांना मीरा भाईंदरचा मेट्रोमध्ये समावेश करण्यास भाग पाडले. परंतु आता एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तरतूद न करून शहरातील जनतेच्या जखमेवर मुख्यमंत्री व स्थानिक नेत्याने मीठच चोळले आहे. मात्र आता जनता गप्पा बसणार नाही आणि काँग्रेस पक्ष जनते सोबत असेल. अशक्यमय रेल्वे प्रवास, होणारे अपघात, महिला व विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट, शहरातील वाढते प्रवासी, इतर वाहतुकीची अपुरी साधने यांचा विचार करून 15 दिवसाच्या आत एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा-भाईंदर मेट्रो साठी भरीव तरतूद केली नाही तर रस्त्यावर उतरून कॉंग्रेस पक्ष याचा विरोध करेल असा इशारा अनिल सावंत यांनी दिलाय . 

एमएमआरडीच्या अर्थसंकल्पात मीरा भाईंदर मेट्रो साठी आर्थिक तरतूदच केली नसल्याचे वृत्त लोकमतने दिल्या नंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सेना आमदारां सह विधान भवनच्या आवारात आंदोलन केले होते . तर मनसे , नागरिक अधिकार मंच सह काँग्रेसने देखील आंदोलनाचा इशारा दिलाय. मेट्रो वरून सोशल मीडियावर देखील खडाजंगी सुरु आहे .