शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

15 दिवसाच्या आत एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा-भाईंदर मेट्रोसाठी तरतूद केली नाही तर जनआंदोलन - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 14:51 IST

मुख्यमंत्र्यांनी मीरा भाईंदरच्या जनतेला दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचे आश्वासनदेखील खोटेच ठरले आहे.

मीरारोड - मुख्यमंत्र्यांनी मीरा भाईंदरच्या जनतेला दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचे आश्वासनदेखील खोटेच ठरले आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष असताना एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी आर्थिक तरतूद न करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 15 दिवसात मेट्रोसाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली नाही तर जनआंदोलन उभारू असा इशारा काँग्रेसने दिलाय . 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल सावंत यांनी म्हटले आहे की, पालिका निवडणूक व त्या आधीपासून शहरात सतत येत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनांपैकी एक मेट्रोचे लॉलीपॉप दिले होते. भोळी जनतासुद्धा त्यात रममाण झाली. स्थानिक आमदारांनी जनतेकडून मेट्रोच्या प्रतिकृती स्वीकारल्या, सुखकर रेल्वे प्रवासाची स्वप्ने जनतेला दाखवलीय मेट्रो स्टेशनची नावं देखील नक्की केली. 2019 मध्ये जनतेने मेट्रोत बसायचे इतकी जुमलेबाजी करून भूरळ घातली होती . 

वास्तविक मीरा भाईंदर व पुढे वसई विरार हे मेट्रोने जोडावे अशी मागणी त्यावेळी माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी चालवली होती . तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यानी देखील मीरा-भाईंदर शहराचा मेट्रोमध्ये समावेश केला होता. पण याच भाजपा सरकारने मेट्रो रद्द केली असा आरोप सावंत यांनी केला. 

मेट्रोच्या मागणी साठी काँग्रेस पक्षाने नागरिकांसह शहरात आंदोलन केले. स्वाक्षरी मोहीम राबवली. भाजपा मुख्यमंत्र्यांना मीरा भाईंदरचा मेट्रोमध्ये समावेश करण्यास भाग पाडले. परंतु आता एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तरतूद न करून शहरातील जनतेच्या जखमेवर मुख्यमंत्री व स्थानिक नेत्याने मीठच चोळले आहे. मात्र आता जनता गप्पा बसणार नाही आणि काँग्रेस पक्ष जनते सोबत असेल. अशक्यमय रेल्वे प्रवास, होणारे अपघात, महिला व विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट, शहरातील वाढते प्रवासी, इतर वाहतुकीची अपुरी साधने यांचा विचार करून 15 दिवसाच्या आत एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा-भाईंदर मेट्रो साठी भरीव तरतूद केली नाही तर रस्त्यावर उतरून कॉंग्रेस पक्ष याचा विरोध करेल असा इशारा अनिल सावंत यांनी दिलाय . 

एमएमआरडीच्या अर्थसंकल्पात मीरा भाईंदर मेट्रो साठी आर्थिक तरतूदच केली नसल्याचे वृत्त लोकमतने दिल्या नंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सेना आमदारां सह विधान भवनच्या आवारात आंदोलन केले होते . तर मनसे , नागरिक अधिकार मंच सह काँग्रेसने देखील आंदोलनाचा इशारा दिलाय. मेट्रो वरून सोशल मीडियावर देखील खडाजंगी सुरु आहे .