शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

15 दिवसाच्या आत एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा-भाईंदर मेट्रोसाठी तरतूद केली नाही तर जनआंदोलन - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 14:51 IST

मुख्यमंत्र्यांनी मीरा भाईंदरच्या जनतेला दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचे आश्वासनदेखील खोटेच ठरले आहे.

मीरारोड - मुख्यमंत्र्यांनी मीरा भाईंदरच्या जनतेला दिलेल्या अनेक आश्वासनांपैकी मेट्रोचे आश्वासनदेखील खोटेच ठरले आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष असताना एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी आर्थिक तरतूद न करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 15 दिवसात मेट्रोसाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केली नाही तर जनआंदोलन उभारू असा इशारा काँग्रेसने दिलाय . 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल सावंत यांनी म्हटले आहे की, पालिका निवडणूक व त्या आधीपासून शहरात सतत येत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनांपैकी एक मेट्रोचे लॉलीपॉप दिले होते. भोळी जनतासुद्धा त्यात रममाण झाली. स्थानिक आमदारांनी जनतेकडून मेट्रोच्या प्रतिकृती स्वीकारल्या, सुखकर रेल्वे प्रवासाची स्वप्ने जनतेला दाखवलीय मेट्रो स्टेशनची नावं देखील नक्की केली. 2019 मध्ये जनतेने मेट्रोत बसायचे इतकी जुमलेबाजी करून भूरळ घातली होती . 

वास्तविक मीरा भाईंदर व पुढे वसई विरार हे मेट्रोने जोडावे अशी मागणी त्यावेळी माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी चालवली होती . तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यानी देखील मीरा-भाईंदर शहराचा मेट्रोमध्ये समावेश केला होता. पण याच भाजपा सरकारने मेट्रो रद्द केली असा आरोप सावंत यांनी केला. 

मेट्रोच्या मागणी साठी काँग्रेस पक्षाने नागरिकांसह शहरात आंदोलन केले. स्वाक्षरी मोहीम राबवली. भाजपा मुख्यमंत्र्यांना मीरा भाईंदरचा मेट्रोमध्ये समावेश करण्यास भाग पाडले. परंतु आता एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तरतूद न करून शहरातील जनतेच्या जखमेवर मुख्यमंत्री व स्थानिक नेत्याने मीठच चोळले आहे. मात्र आता जनता गप्पा बसणार नाही आणि काँग्रेस पक्ष जनते सोबत असेल. अशक्यमय रेल्वे प्रवास, होणारे अपघात, महिला व विद्यार्थ्यांची होणारी ससेहोलपट, शहरातील वाढते प्रवासी, इतर वाहतुकीची अपुरी साधने यांचा विचार करून 15 दिवसाच्या आत एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मीरा-भाईंदर मेट्रो साठी भरीव तरतूद केली नाही तर रस्त्यावर उतरून कॉंग्रेस पक्ष याचा विरोध करेल असा इशारा अनिल सावंत यांनी दिलाय . 

एमएमआरडीच्या अर्थसंकल्पात मीरा भाईंदर मेट्रो साठी आर्थिक तरतूदच केली नसल्याचे वृत्त लोकमतने दिल्या नंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सेना आमदारां सह विधान भवनच्या आवारात आंदोलन केले होते . तर मनसे , नागरिक अधिकार मंच सह काँग्रेसने देखील आंदोलनाचा इशारा दिलाय. मेट्रो वरून सोशल मीडियावर देखील खडाजंगी सुरु आहे .