शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

वाऱ्याची दिशा बदलली, मुंबईचा पारा ३५ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 05:56 IST

उत्तरेसह दक्षिणेकडून वाहणारे वारे म्हणजेच वाºयाची बदललेली दिशा आणि आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ या प्रमुख कारणांमुळे मुंबईच्या हवामानात बदल नोंदविण्यात येत आहेत.

मुंबई - उत्तरेसह दक्षिणेकडून वाहणारे वारे म्हणजेच वाºयाची बदललेली दिशा आणि आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ या प्रमुख कारणांमुळे मुंबईच्या हवामानात बदल नोंदविण्यात येत आहेत. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, किमान तापमान १९ तर कमाल तापमान ३५ अंशांवर गेले आहे. परिणामी मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. उत्तरोत्तर यात आणखी वाढ नोंदविण्यात येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.५ अंश नोंदविण्यात आले आहे. सोमवारसह मंगळवार काहीसा ‘ताप’दायक ठरला असून, मुंबईची आर्द्रता ९४ टक्के नोंदविण्यात आली आहे. मंगळवारचे वातावरण किंचित उष्ण असल्याचे जाणवले. त्यामुळे उकाड्यास सुरुवात झाल्याच्या प्रतिक्रिया मुंबईकरांनी नोंदविल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे रात्री किंचितसा गारवा जाणवत असला तरीदेखील दिवसाचे ऊन मुंबईकरांना त्रासदायक ठरत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई परिसरात मंगळवारी तापमान ३३.३ अंश इतके नोंदवण्यात आले.नागपूरमध्ये सर्वाधिक गारठाभारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे ११.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ६ ते ७ फेब्रुवारी दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.बदलत्या वातावरणाचा परिणामवाºयाची दिशा बदलली आहे. आता उत्तरेसह दक्षिणेकडून वारे वाहू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या आर्द्रतेमध्ये वाढ नोंदविण्यात येत आहे. वातावरणातील या प्रमुख बदलामुळे मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र