शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाऱ्याची दिशा बदलली, मुंबईचा पारा ३५ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 05:56 IST

उत्तरेसह दक्षिणेकडून वाहणारे वारे म्हणजेच वाºयाची बदललेली दिशा आणि आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ या प्रमुख कारणांमुळे मुंबईच्या हवामानात बदल नोंदविण्यात येत आहेत.

मुंबई - उत्तरेसह दक्षिणेकडून वाहणारे वारे म्हणजेच वाºयाची बदललेली दिशा आणि आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात आलेली वाढ या प्रमुख कारणांमुळे मुंबईच्या हवामानात बदल नोंदविण्यात येत आहेत. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, किमान तापमान १९ तर कमाल तापमान ३५ अंशांवर गेले आहे. परिणामी मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. उत्तरोत्तर यात आणखी वाढ नोंदविण्यात येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३५.५ अंश नोंदविण्यात आले आहे. सोमवारसह मंगळवार काहीसा ‘ताप’दायक ठरला असून, मुंबईची आर्द्रता ९४ टक्के नोंदविण्यात आली आहे. मंगळवारचे वातावरण किंचित उष्ण असल्याचे जाणवले. त्यामुळे उकाड्यास सुरुवात झाल्याच्या प्रतिक्रिया मुंबईकरांनी नोंदविल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे रात्री किंचितसा गारवा जाणवत असला तरीदेखील दिवसाचे ऊन मुंबईकरांना त्रासदायक ठरत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, मुंबई परिसरात मंगळवारी तापमान ३३.३ अंश इतके नोंदवण्यात आले.नागपूरमध्ये सर्वाधिक गारठाभारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे ११.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ६ ते ७ फेब्रुवारी दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.बदलत्या वातावरणाचा परिणामवाºयाची दिशा बदलली आहे. आता उत्तरेसह दक्षिणेकडून वारे वाहू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या आर्द्रतेमध्ये वाढ नोंदविण्यात येत आहे. वातावरणातील या प्रमुख बदलामुळे मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र