शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

विधान परिषदेतील कोंडी सोमवारी सुटणार ?

By admin | Updated: December 12, 2015 00:22 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी विधान परिषदेत गोंधळाचे वातावरण कायम राहिले. सरकारने अगोदर कर्जमाफीची घोषणा करावी

योगेश पांडे, नागपूरशेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी विधान परिषदेत गोंधळाचे वातावरण कायम राहिले. सरकारने अगोदर कर्जमाफीची घोषणा करावी, मगच कामकाज होईल हा विरोधकांचा पवित्रा कायम होता व हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात परिषदेत कुठलेही उल्लेखनीय काम झाले नाही. दरम्यान, सोमवारी परिषदेत निर्माण झालेली कोंडी सुटू शकते. यासंदर्भात स्वत: सभापती पुढाकार घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने सभागृहात शेतकरी कर्जमाफीचीच मागणी उचलून विरोधी पक्षांकडून गोंधळ घालण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात केवळ तीन प्रश्नांवर उपप्रश्न विचारण्याची सदस्यांना संधी मिळाली. तर या काळात एकाही लक्षवेधीवर चर्चा होऊ शकली नाही. शेतकरी कर्जमाफीवर सरकार चर्चेला तयार आहे. त्यामुळे या मुद्यावरून होणारा गदारोळ थांबावा व दुसऱ्या आठवड्यात कामकाज सुरळीत चालावे व पहिल्या आठवड्याचा ‘बॅकलॉग’ भरून निघावा अशी विनंती सत्तापक्षातर्फे सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात सभापती स्वत: पुढाकार घेण्याची शक्यता आहे व सोमवारी त्यांच्या दालनात सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते तसेच इतर पक्षाच्या गटनेत्यांची बैठक होणार असून यात ही कोंडी दूर होईल. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांनादेखील या बैठकीत बोलविण्यात येईल, अशी माहिती एका पक्षाच्या गटनेत्याने गोपनीयतेच्या अटीवर दिली. दरम्यान, शुक्रवारीदेखील विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायमच होता. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, जोगेंद्र कवाडे यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली. यादरम्यान विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज पहिले अर्धा तास, २० मिनिटे, १५ मिनिटे, १ तास असे ४ वेळा तहकूब करण्यात आले. अखेर अशासकीय कामकाज आटोपून सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.