शहरं
Join us  
Trending Stories
1
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
2
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
3
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
4
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
6
श्रावनात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
7
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
8
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
9
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
10
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल
11
आधी भारताविरोधात गरळ ओकली; आता PM मोदींच्या स्वागतासाठी मंत्रिमंडळासह मुइझ्झू हजर
12
Mumbai: भाडेकरूने घरमालकालाच कार खाली चिरडण्याचा केला प्रयत्न, मुंबईतील घटना
13
'तो' अखेरचा व्हिडिओ कॉल, त्यानंतर मृत्यूची बातमी आली; महिला इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू
14
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
15
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
16
अनिल अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी रांगा; सर्वांनाच लागलं लोअर सर्किट, गुंतवणूकदारांत भीती
17
"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा
18
पहिला श्रावण शुक्रवार: वसुमान योगात 'या' राशींवर होणार लक्ष्मीकृपेची बरसात!
19
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
20
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण

स्वतंत्र गृहमंत्र्यासाठी आग्रही असणारे उद्धव ठाकरे गृहखाते नाकारतील का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 12:46 IST

स्वता: केलेली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- मोसीन शेख 

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तूर्त गृहखाते राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात असे झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासोबतच गृहखाते सांभाळू शकतात का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णवेळ गृहमंत्री असायला हवे अशी मागणी खुद्द उद्धव ठाकरे यांनीचं केली होती.

मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्रीपद महत्वाचे समजले जाते. त्यामुळे हे पद आपल्या पदरात पाडण्यासाठी सत्तेत असेलल्या पक्षातील नेत्यांकडून रस्सीखेच होत असल्याचे आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र गेल्यावेळीच्या सरकारमध्ये आत्ताचे असलेले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासोबतच गृहखाते सुद्धा स्वता:कडेच ठेवेले होते. तर आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा गृहखाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर शरद पवार आणि ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय सुद्धा झाला असल्याची माहिती आहे.

मात्र मवाळ स्वभाव असलेले उद्धव ठाकरे हे काटेरी मुकुट समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री पद सांभाळू शकतात का ?असा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे. हे पद सांभाळताना अनकेदा कठोर भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे राज्यातील परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहखाते स्वतंत्र असायला पाहिजे अशी मागणी अनकेदा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गेल्यावेळीच्या सरकारमध्ये असलेल्या उद्धव ठाकरेंनी अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना तत्कालीन मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे राज्यातील विकासकामांमध्ये खूप व्यस्त असतात, तर विकास करताना सर्वसामान्य जनतेच्या आक्रोशाकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे राज्यात गृहखात्याला पूर्णवेळ देणारा गृहमंत्री देण्यात यावा अशी मागणी केली होती. परंतु आता स्वता: केलेली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गृहखाते म्हणजे काटेरी मुकुट

राज्यातील मंत्रीमंडळात मुख्यमंत्रीपदानंतर गृहमंत्रीपद सर्वात महत्वाचे समजले जाते. कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जवाबदारी याच खात्याच्या मंत्र्यांकडे असते. आत्तापर्यंत राज्याने अनेक गृहमंत्री पहिले आहेत. मात्र त्यांना सुद्धा या पदावर असताना अनेक अडचणी व आरोपांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांची छोटीशी चूक सुद्धा विरोधकांसाठी आरोपाचा मुद्दा ठरतो. उत्कृष्ट असे गृहमंत्री समजल्या जाणाऱ्यांपैकी एक असलेले आर.आर.पाटील यांनासुद्धा 26/11 च्या हल्ल्यानंतर आपल्या एका वक्तव्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे काटेरी मुकुट समजल्या जाणारे गृहखाते उद्धव ठाकरे हे सांभाळतील का ? अशी चर्चा पाहायला मिळत आहे.