शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

स्वतंत्र गृहमंत्र्यासाठी आग्रही असणारे उद्धव ठाकरे गृहखाते नाकारतील का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 12:46 IST

स्वता: केलेली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- मोसीन शेख 

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तूर्त गृहखाते राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात असे झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासोबतच गृहखाते सांभाळू शकतात का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णवेळ गृहमंत्री असायला हवे अशी मागणी खुद्द उद्धव ठाकरे यांनीचं केली होती.

मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्रीपद महत्वाचे समजले जाते. त्यामुळे हे पद आपल्या पदरात पाडण्यासाठी सत्तेत असेलल्या पक्षातील नेत्यांकडून रस्सीखेच होत असल्याचे आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र गेल्यावेळीच्या सरकारमध्ये आत्ताचे असलेले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासोबतच गृहखाते सुद्धा स्वता:कडेच ठेवेले होते. तर आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा गृहखाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर शरद पवार आणि ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय सुद्धा झाला असल्याची माहिती आहे.

मात्र मवाळ स्वभाव असलेले उद्धव ठाकरे हे काटेरी मुकुट समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री पद सांभाळू शकतात का ?असा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे. हे पद सांभाळताना अनकेदा कठोर भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे राज्यातील परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहखाते स्वतंत्र असायला पाहिजे अशी मागणी अनकेदा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गेल्यावेळीच्या सरकारमध्ये असलेल्या उद्धव ठाकरेंनी अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना तत्कालीन मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे राज्यातील विकासकामांमध्ये खूप व्यस्त असतात, तर विकास करताना सर्वसामान्य जनतेच्या आक्रोशाकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे राज्यात गृहखात्याला पूर्णवेळ देणारा गृहमंत्री देण्यात यावा अशी मागणी केली होती. परंतु आता स्वता: केलेली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गृहखाते म्हणजे काटेरी मुकुट

राज्यातील मंत्रीमंडळात मुख्यमंत्रीपदानंतर गृहमंत्रीपद सर्वात महत्वाचे समजले जाते. कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जवाबदारी याच खात्याच्या मंत्र्यांकडे असते. आत्तापर्यंत राज्याने अनेक गृहमंत्री पहिले आहेत. मात्र त्यांना सुद्धा या पदावर असताना अनेक अडचणी व आरोपांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांची छोटीशी चूक सुद्धा विरोधकांसाठी आरोपाचा मुद्दा ठरतो. उत्कृष्ट असे गृहमंत्री समजल्या जाणाऱ्यांपैकी एक असलेले आर.आर.पाटील यांनासुद्धा 26/11 च्या हल्ल्यानंतर आपल्या एका वक्तव्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे काटेरी मुकुट समजल्या जाणारे गृहखाते उद्धव ठाकरे हे सांभाळतील का ? अशी चर्चा पाहायला मिळत आहे.