शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus : राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 15:28 IST

पुढच्याला ठेच, मागचा सावध या म्हणीप्रमाणे आपल्यालाही काळजी घेणं आवश्यक असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

चीनसह आशियाच्या एका मोठ्या भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा पसरण्यास सुरूवात झाली आहे. चीनमध्ये गेल्या दोन वर्षांत जेवढे रुग्ण सापडले नव्हते, तेवढे दररोज सापडू लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे जगात पुन्हा कोरोना डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली असून मोठी झळ बसलेल्या भारताने कोरोना प्रतिबंधक उपायांची तयारी सुरु केली आहे. तर यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. 

"चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. दक्षिण कोरियामध्ये बेड्स उपलब्ध होत नाहीयेत, रस्त्याच्या दुतर्फाही रुग्णांना ठेवलं जात आहे अशी परिस्थिती पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर पुढच्याला ठेच, मागचा सावध या म्हणीप्रमाणे आपल्यालाही काळजी घेणं आवश्यक आहे. केंद्र शासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे. राज्य शासन केंद्राच्या अनुषंगानं कारवाई करेल," असं राजेश टोपे म्हणाले. चौथ्या लाटेबद्दल बोलताना त्यांनी आपल्याला काळजी घेत राहिलं पाहिजे, असं सांगितलं. 

"युरोप, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आपणही त्यामुळे बेजबाबदारपणे वागणं योग्य नाही, अशा आशयाचं पत्र केंद्रानं राज्याला पाठवलं आहे. ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलं असून त्या पत्राच्या अनुषंगानं योग्य ती कारवाई करण्यात येईल," असंही ते म्हणाले.

राज्यांना सतर्कतेचे आदेशकेंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोना लाटेवरून राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य, आरोग्य सचिवांना पत्र लिहून पंचसूत्रीचे काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे. या साऱ्यांना पत्राद्वारे सावध करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या चिंताजनक नाही, याचा विचार करून कोणत्याही राज्यातील प्रशासनाने बेफिकीर राहू नये. यामध्ये चाचणी, शोध, उपचार, लसीकरण आणि कोरोना प्रोटोकॉल यांचा पंचसूत्रीचा समावेश करण्यात आलाय.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपे