शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागासाठी ‘टँक वॅगन’ सोडणार का?

By admin | Updated: March 2, 2016 03:35 IST

दूध किंवा तेलाने भरलेल्या टँक वॅगनप्रमाणे दुष्काळी भागात पाण्याचे टँक वॅगन नेणे शक्य आहे का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे करत

मुंबई: दूध किंवा तेलाने भरलेल्या टँक वॅगनप्रमाणे दुष्काळी भागात पाण्याचे टँक वॅगन नेणे शक्य आहे का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे करत याबाबत पुढील सुनावणीवेळी उत्तर देण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागाबरोबरच शहरातही पाण्याची कमतरता जाणवत असल्याने जूनपर्यंत या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना व नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले. बीड व मराठवाडा याठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने ‘स्यू-मोटो’ दाखल करून घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या वेळी खंडपीठाने लातूर, उस्मानाबदमध्ये पाणीटंचाई असल्याने रुग्णालये शस्त्रक्रिया पुढे ढकलत असल्याने याबद्दल सरकार काय पावले उचलणार, अशी विचारणा केली होती. त्यावर मंगळवारच्या सुनावणीवेळी मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी जिल्हाधिकारी व मुख्य अधिकाऱ्यांना रुग्णालयासाठी पुरेसे पाणी टँकरद्वारे पुरवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली.यावेळी खंडपीठाने लातूर व उस्मानाबाद येथे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने याठिकाणी पाण्याचे टँक वेगन सोडणे शक्य आहे का? अशी विचारणा करत सरकारला याबाबत १७ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)दुष्काळी स्थितीसाठी आपत्कालीन योजना तयार कराभविष्यात दुष्काळी परिस्थितीला हाताळण्यासाठी ‘आपत्कालीन योजना’ तयार ठेवण्याचे निर्देश दिले. ‘परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच तुम्ही (सरकार) योजना तयार ठेवा. जूनपर्यंत पाण्याची कमतरता तीव्र जाणवेल. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखव्यात,’ अशी सूचनाही खंडपीठाने केली.केंद्र सरकारच्या योजनांची यादी सादर कराकेंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती सादर करा, असे निर्देश खंडपीठाने केंद्र सरकारला दिले. आत्तापर्यंत कोणत्या योजना राबवण्यात आल्यात आणि यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या नवीन योजना आखण्यात आल्या आहेत, याची यादी खंडपीठाने केंद्र सरकारला १७ मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश देत, या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.पालकमंत्री, राज्यमंत्र्यांचेदुष्काळी दौरेपालकमंत्री व राज्यमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यांची पाहणी करून, त्या ठिकाणी प्रत्यक्षात सरकारी योजना पोहचतात की नाही, याची माहिती घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तीन दिवस दौरा केल्यानंतर पालकमंत्री आणि राज्यमंत्री संबंधित जिल्ह्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करतील. हा दौरा ३ मार्चपासून सुरू होणार आहे.विवाह व मोठे सोहळे टाळा - हायकोर्टाची सूचनाराज्यात पाण्याची भीषण टंचाई असल्याने विवाह व अन्य मोठे सोहळे, ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे आवश्यक आहे, असे सोहळे यंदा न करता, पुढच्या वर्षी करण्याचे आवाहन लोकांना करा, अशी सूचना खंडपीठाने केली.