शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

दाओसमधील करारांची चोख अंमलबजावणी करणार - सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:07 IST

पुढील अधिवेशनात महायुती सरकारने गेल्या तीन वर्षांत दाओसमध्ये केलेल्या कराराच्या अंमलबजावणीची माहिती दिली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले.

मुंबई : दाओसमध्ये यंदा झालेल्या करारांमुळे राज्यात १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. मविआ सरकारच्या काळात दावोसमध्ये झालेल्या बहुतांश करारांची अंमलबजावणी झाली नाही. पण, महायुती सरकारने केलेल्या करारांची चोख अंमलबजावणी राज्य सरकार करेल. तसेच पुढील अधिवेशनात महायुती सरकारने गेल्या तीन वर्षांत दाओसमध्ये केलेल्या कराराच्या अंमलबजावणीची माहिती दिली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले.सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. महापालिकांकडून घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:स्सारण प्रकल्प राबवून स्वच्छता राखण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, विरोधक निवडणूक होत नसल्याबद्दल सरकारला दोष देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीकाही सामंत यांनी केली.

एसटीपी प्रकल्पांची कामे प्रगतीपथावरधारावी, मालाड, वर्सोवा, घाटकोपर, भांडुप, वांद्रे आणि वरळी येथे नव्याने एसटीपी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि इतर महापालिकांमध्येही या संदर्भातील कामे प्रगतीपथावर आहेत. 

सिडको आणि म्हाडाची लॉटरी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून, संगणकीय पद्धतीने आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगसह ती पार पाडली जाते. २१,३९९ अर्जदारांमध्ये पारदर्शक सोडतीद्वारे १९,५१८ घरांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतState Governmentराज्य सरकार