शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

...तर भाजीपाल्याची वाहतूक थांबवणार; मालवाहतूक संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:56 IST

देशातील मालवाहतूकदारांच्या संपाला ५ दिवस उलटूनही केंद्र सरकारने आंदोलकांना प्रतिसाद दिलेला नाही.

पुणे : देशातील मालवाहतूकदारांच्या संपाला ५ दिवस उलटूनही केंद्र सरकारने आंदोलकांना प्रतिसाद दिलेला नाही. सरकारने मागण्यांबाबत विचार न केल्यास भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंचीवाहतूक थांबविण्याचा इशारा मालवाहतूकदार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसे पत्र केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आले आहे.देशभरातील डिझेलचा दर समान करावा, देशात टोलमुक्ती करावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रिमीयम कमी करावा, जड वाहनांना दोन चालकांचीसक्ती करू नये, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटन वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा, अशाविविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने बेमुदत देशव्यापी चक्का जाम आंदेलनाची हाक दिली आहे.चक्का जाम आंदोलनामुळे उद्योग-व्यवसायांचे दररोज २० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यात ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान केवळ वाहतूक क्षेत्राचे आहे.देशात १ कोटी ट्रकचालक असून, आॅल इंडिया मोटार संघटनेकडे दीड कोटी सभासद आहेत. सरकारकडून मागण्यांचा विचार न झाल्यासपुढील टप्प्यात दूध, पेट्रोल-डिझेल टँकर, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक थांबवावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला आहे.माथाडी कामगारांचा आज बंदट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून बेमुदत बंद व चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. माथाडी कामगारांचे काम व मजुरी ट्रान्सपोर्ट व्यवसायावर अवलंबून आहे.यामुळे वाहतुकदारांच्या बेमुदत बंदला पांठिबा देण्यासाठी व मराठा आंदोलन व आरक्षण मिळावे यासाठी औरगांबाद येथे काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांना जलसमाधी घेऊन प्राणांची आहुती द्यावी लागली.या घटनेच्या निषेधार्थ राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या वतीने बुधवारी (दि. २५) बंद पुकारला आहे.

 

टॅग्स :Strikeसंपvegetableभाज्या