शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

...तर भाजीपाल्याची वाहतूक थांबवणार; मालवाहतूक संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:56 IST

देशातील मालवाहतूकदारांच्या संपाला ५ दिवस उलटूनही केंद्र सरकारने आंदोलकांना प्रतिसाद दिलेला नाही.

पुणे : देशातील मालवाहतूकदारांच्या संपाला ५ दिवस उलटूनही केंद्र सरकारने आंदोलकांना प्रतिसाद दिलेला नाही. सरकारने मागण्यांबाबत विचार न केल्यास भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंचीवाहतूक थांबविण्याचा इशारा मालवाहतूकदार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसे पत्र केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आले आहे.देशभरातील डिझेलचा दर समान करावा, देशात टोलमुक्ती करावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रिमीयम कमी करावा, जड वाहनांना दोन चालकांचीसक्ती करू नये, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटन वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा, अशाविविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने बेमुदत देशव्यापी चक्का जाम आंदेलनाची हाक दिली आहे.चक्का जाम आंदोलनामुळे उद्योग-व्यवसायांचे दररोज २० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यात ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान केवळ वाहतूक क्षेत्राचे आहे.देशात १ कोटी ट्रकचालक असून, आॅल इंडिया मोटार संघटनेकडे दीड कोटी सभासद आहेत. सरकारकडून मागण्यांचा विचार न झाल्यासपुढील टप्प्यात दूध, पेट्रोल-डिझेल टँकर, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक थांबवावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिला आहे.माथाडी कामगारांचा आज बंदट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी चार दिवसांपासून बेमुदत बंद व चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. माथाडी कामगारांचे काम व मजुरी ट्रान्सपोर्ट व्यवसायावर अवलंबून आहे.यामुळे वाहतुकदारांच्या बेमुदत बंदला पांठिबा देण्यासाठी व मराठा आंदोलन व आरक्षण मिळावे यासाठी औरगांबाद येथे काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांना जलसमाधी घेऊन प्राणांची आहुती द्यावी लागली.या घटनेच्या निषेधार्थ राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या वतीने बुधवारी (दि. २५) बंद पुकारला आहे.

 

टॅग्स :Strikeसंपvegetableभाज्या