शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

ST Strike: ST कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? ६ वाजता ठाकरे सरकार मोठी घोषणा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:16 IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी ठाकरे सरकारमध्ये जोरात हालचाली सुरु आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी असंही पुढे आले

मुंबई -  गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या आग्रही मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र सध्या हा निर्णय कोर्टात असल्याने विलिनीकरणावर तातडीनं निर्णय घेता येणे शक्य नाही असं राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. समिती जो अहवाल देईल त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी ठाकरे सरकारमध्ये जोरात हालचाली सुरु आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी असंही पुढे आले. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ करू अशी ऑफर सरकारनं कर्मचाऱ्यांना दिली. विलिनीकरण तुर्तास शक्य नाही मात्र तोवर पगारवाढीचा सुवर्णमध्ये राज्य सरकारकडून काढण्यात येत आहे. सह्याद्रीवर आज एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठक घेतली होती.

या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव सरकारने कर्मचाऱ्यांकडे ठेवला आहे. पगारवाढीवर परिवहन मंत्री अनिल परब आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आजतरी तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. जास्तीत जास्त पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. ६ वाजता परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेणार आहे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता असल्याचं सांगितले जात आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे ती मागे घेणार असल्याचंही कळत आहे. काही कर्मचाऱ्यांवर सेवानिवृत्तीची कारवाई केली होती तीदेखील मागे घेणार आहे असंही बैठकीत ठरल्याचं कळत आहे.  

ST च्या खासगीकरणाबाबतही चर्चा

एसटीच्या संपाचा फायदा उचलून खासगी बस चालविणाऱ्यांनी प्रवासी भाड्यात दुप्पटीने वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू केली आहे. एसटी नसल्याने गैरसोय होत असल्याने प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नसल्याने सरकारने खासगीकरणाचा मुद्दा पुढे आणला होता. वाढत्या महागाईच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्याची अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, खासगीकरण करून दरवाढीचा भुर्दंड सोसण्याची वेळ आणू देऊ नका, अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. एरव्ही सुरक्षित प्रवास म्हणून एसटीला विशेष प्राधान्य दिले जाते. परंतु, खासगीकरण करून सेवेत बदल होईल ती चांगल्या पद्धतीने मिळेल का? सर्वसामान्य नागरिक एसटीचा प्रवास करतो त्याप्रमाणे भाडे दर राहतील का? चांगल्या बस उपलब्ध होतील का? असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपAnil Parabअनिल परब