शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: ST कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? ६ वाजता ठाकरे सरकार मोठी घोषणा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:16 IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी ठाकरे सरकारमध्ये जोरात हालचाली सुरु आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी असंही पुढे आले

मुंबई -  गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या आग्रही मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र सध्या हा निर्णय कोर्टात असल्याने विलिनीकरणावर तातडीनं निर्णय घेता येणे शक्य नाही असं राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. समिती जो अहवाल देईल त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी ठाकरे सरकारमध्ये जोरात हालचाली सुरु आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी असंही पुढे आले. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ करू अशी ऑफर सरकारनं कर्मचाऱ्यांना दिली. विलिनीकरण तुर्तास शक्य नाही मात्र तोवर पगारवाढीचा सुवर्णमध्ये राज्य सरकारकडून काढण्यात येत आहे. सह्याद्रीवर आज एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठक घेतली होती.

या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव सरकारने कर्मचाऱ्यांकडे ठेवला आहे. पगारवाढीवर परिवहन मंत्री अनिल परब आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आजतरी तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. जास्तीत जास्त पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. ६ वाजता परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेणार आहे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता असल्याचं सांगितले जात आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे ती मागे घेणार असल्याचंही कळत आहे. काही कर्मचाऱ्यांवर सेवानिवृत्तीची कारवाई केली होती तीदेखील मागे घेणार आहे असंही बैठकीत ठरल्याचं कळत आहे.  

ST च्या खासगीकरणाबाबतही चर्चा

एसटीच्या संपाचा फायदा उचलून खासगी बस चालविणाऱ्यांनी प्रवासी भाड्यात दुप्पटीने वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू केली आहे. एसटी नसल्याने गैरसोय होत असल्याने प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नसल्याने सरकारने खासगीकरणाचा मुद्दा पुढे आणला होता. वाढत्या महागाईच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्याची अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, खासगीकरण करून दरवाढीचा भुर्दंड सोसण्याची वेळ आणू देऊ नका, अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. एरव्ही सुरक्षित प्रवास म्हणून एसटीला विशेष प्राधान्य दिले जाते. परंतु, खासगीकरण करून सेवेत बदल होईल ती चांगल्या पद्धतीने मिळेल का? सर्वसामान्य नागरिक एसटीचा प्रवास करतो त्याप्रमाणे भाडे दर राहतील का? चांगल्या बस उपलब्ध होतील का? असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपAnil Parabअनिल परब