शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार आल्याशिवाय दिल्लीत जाणार नाही - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 05:06 IST

विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचा वर्धापनदिनानिमित्त मेळावा झाला, त्यात फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत महाराष्ट्रात भाजपचे सरकार पुन्हा येत नाही तोपर्यंत मी दिल्लीत जाणार नाही, असा निर्धार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्याचे सरकार हाराकिरी करून आलेले आहे, असे ते म्हणाले.

विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचा वर्धापनदिनानिमित्त मेळावा झाला, त्यात फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तीन चाकी रिक्षाप्रमाणे हे सरकार आहे. रिक्षाची चाके एकाच दिशेने जातात. मात्र, याची चाके तिन्ही बाजुला विरुद्ध दिशेने जात आहेत. आम्ही कोणाचा विश्वासघात केलेला नाही. उलट आताचे ठाकरे सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे. ते फार काळ टीकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. आताच्या सरकारने एकच काम केले. ते म्हणजे आम्ही जे चांगले निर्णय घेत विकासकामांसाठी गती वाढवली होती. ते त्यांनी थांबविण्याचे काम केले. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. आमच्यापेक्षा यांच्या अटी जाचक आहेत. त्यामुळे काहीच शेतकºयांना याचा लाभ मिळेल, असे ते म्हणाले.आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. आम्ही प्रगतीच्या दिशेने जात होते. आता हे सरकार प्रगती नाही तर स्थगिती सरकार आहे, अशीही टीका त्यांनी केली. एवढेच नाही तर शिवस्मारकाचे काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवले आहे, असाही आरोप त्यांनी केला. लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर आम्हीही रस्त्यावर उतरवू. आम्ही संघर्षातून पुढे आलो आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विनायक मेटे आदींची भाषणे झाली. आमदार भारती लव्हेकर, आमदार भीमरावकेराम, तानाजीराव शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र