शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

भाजप सरकार आल्याशिवाय दिल्लीत जाणार नाही - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 05:06 IST

विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचा वर्धापनदिनानिमित्त मेळावा झाला, त्यात फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत महाराष्ट्रात भाजपचे सरकार पुन्हा येत नाही तोपर्यंत मी दिल्लीत जाणार नाही, असा निर्धार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्याचे सरकार हाराकिरी करून आलेले आहे, असे ते म्हणाले.

विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचा वर्धापनदिनानिमित्त मेळावा झाला, त्यात फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तीन चाकी रिक्षाप्रमाणे हे सरकार आहे. रिक्षाची चाके एकाच दिशेने जातात. मात्र, याची चाके तिन्ही बाजुला विरुद्ध दिशेने जात आहेत. आम्ही कोणाचा विश्वासघात केलेला नाही. उलट आताचे ठाकरे सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे. ते फार काळ टीकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. आताच्या सरकारने एकच काम केले. ते म्हणजे आम्ही जे चांगले निर्णय घेत विकासकामांसाठी गती वाढवली होती. ते त्यांनी थांबविण्याचे काम केले. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. आमच्यापेक्षा यांच्या अटी जाचक आहेत. त्यामुळे काहीच शेतकºयांना याचा लाभ मिळेल, असे ते म्हणाले.आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. आम्ही प्रगतीच्या दिशेने जात होते. आता हे सरकार प्रगती नाही तर स्थगिती सरकार आहे, अशीही टीका त्यांनी केली. एवढेच नाही तर शिवस्मारकाचे काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवले आहे, असाही आरोप त्यांनी केला. लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर आम्हीही रस्त्यावर उतरवू. आम्ही संघर्षातून पुढे आलो आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विनायक मेटे आदींची भाषणे झाली. आमदार भारती लव्हेकर, आमदार भीमरावकेराम, तानाजीराव शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र