शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

माकडांच्या नसबंदीने आंबा बागांचे नुकसान थांबेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2023 08:56 IST

प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. 

योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक

कोकणात आंबा, नारळी-पोफळीच्या, केळीच्या बागा, भात, कडधान्ये आदींचे माकडांच्या उच्छादामुळे नुकसान होते. माकडांच्या टोळ्याच्या टोळ्या शेतात येतात आणि धुडगूस घालतात. केळी खातात. नारळ पाडतात. शेतीचे काही वेळा भयंकर नुकसान होते. जंगलात खाद्य मिळत नसल्याने माकडे नागरी वस्तीत येतात. कधी कधी तर ते थेट अलिबागपर्यंत येतात. माकडांचा बंदोबस्त करण्याचे अनेक उपाय सुरू असताना आता थेट माकडांची नसबंदी करून त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे वन विभागाने ठरविले आहे. त्यातून शेतीचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. 

हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला परवानगी मिळाली आहे, आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना असल्याचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई कशी देता येईल, यावरही चर्चा झाली. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला तर कोकणातील बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात गेल्या वर्षांत माकडांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खोपोली, कर्जत, उरण, पनवेलचा भाग सोडला तर अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धनस म्हसळा या भागांत माकडांचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो. माकडांचा उपद्रव कमी करण्यासाठी कृषी विभागाने काही उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यास चांगले यशही मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना योजनेत सहभागी करून मुख्याध्यापकांच्या मदतीने सीडबॉल तयार केले जातात. पावसाळ्यात जंगलात फळझाडे लावली जातात. 

जंगलात माकडांना खाद्य मिळाले तर ते नागरी वस्तीत येणार नाहीत, हा त्यामागचा उद्देश आहे. त्याप्रमाणे बागांमध्ये वनस्पतींच्या अर्कापासून बनविलेले बायोलॉजिकल पेस्टिसाईड फवारले जाते. त्याच्या उग्र वासाने माकडे त्या भागात येत नाही. अधूनमधून चार-पाच वेळा त्याची फवारणी केल्यानंतर माकडांना तो वास सहन होत नाही. त्यामुळे ते त्या भागात येत नाही, असा कृषी विभागाचा अनुभव आहे. हा प्रयोग आता मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्याची प्रात्यक्षिके करून दाखविली जात आहेत. 

यंदाच्या हंगामात या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे माकडांचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल. माकडांच्या त्रासामुळे अनेक बागायतदारांनी केळी, आंबे, कडधान्यांचे पीक घेणे बंद केले आहे. काही भागात फक्त सुपारी आणि नारळाचे उत्पादन घेतले जाते. बागायतदारांच्या मते नसबंदी करणे हा उच्छाद थांबविण्याचा मार्ग नाही. जंगलतोड थांबविली पाहिजे. वनविभागावर त्याची जबाबदारी आहे. त्यांनी आदिवासींनी विश्वासात घेऊन जंगलांचे संवर्धन केले पाहिजे. त्यांनी योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडली तर माकडे जंगलातच राहतील. 

टॅग्स :MangoआंबाMonkeyमाकड