शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

माकडांच्या नसबंदीने आंबा बागांचे नुकसान थांबेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2023 08:56 IST

प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. 

योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक

कोकणात आंबा, नारळी-पोफळीच्या, केळीच्या बागा, भात, कडधान्ये आदींचे माकडांच्या उच्छादामुळे नुकसान होते. माकडांच्या टोळ्याच्या टोळ्या शेतात येतात आणि धुडगूस घालतात. केळी खातात. नारळ पाडतात. शेतीचे काही वेळा भयंकर नुकसान होते. जंगलात खाद्य मिळत नसल्याने माकडे नागरी वस्तीत येतात. कधी कधी तर ते थेट अलिबागपर्यंत येतात. माकडांचा बंदोबस्त करण्याचे अनेक उपाय सुरू असताना आता थेट माकडांची नसबंदी करून त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे वन विभागाने ठरविले आहे. त्यातून शेतीचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. 

हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला परवानगी मिळाली आहे, आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना असल्याचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई कशी देता येईल, यावरही चर्चा झाली. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला तर कोकणातील बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात गेल्या वर्षांत माकडांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खोपोली, कर्जत, उरण, पनवेलचा भाग सोडला तर अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धनस म्हसळा या भागांत माकडांचा शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो. माकडांचा उपद्रव कमी करण्यासाठी कृषी विभागाने काही उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यास चांगले यशही मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना योजनेत सहभागी करून मुख्याध्यापकांच्या मदतीने सीडबॉल तयार केले जातात. पावसाळ्यात जंगलात फळझाडे लावली जातात. 

जंगलात माकडांना खाद्य मिळाले तर ते नागरी वस्तीत येणार नाहीत, हा त्यामागचा उद्देश आहे. त्याप्रमाणे बागांमध्ये वनस्पतींच्या अर्कापासून बनविलेले बायोलॉजिकल पेस्टिसाईड फवारले जाते. त्याच्या उग्र वासाने माकडे त्या भागात येत नाही. अधूनमधून चार-पाच वेळा त्याची फवारणी केल्यानंतर माकडांना तो वास सहन होत नाही. त्यामुळे ते त्या भागात येत नाही, असा कृषी विभागाचा अनुभव आहे. हा प्रयोग आता मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्याची प्रात्यक्षिके करून दाखविली जात आहेत. 

यंदाच्या हंगामात या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे माकडांचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल. माकडांच्या त्रासामुळे अनेक बागायतदारांनी केळी, आंबे, कडधान्यांचे पीक घेणे बंद केले आहे. काही भागात फक्त सुपारी आणि नारळाचे उत्पादन घेतले जाते. बागायतदारांच्या मते नसबंदी करणे हा उच्छाद थांबविण्याचा मार्ग नाही. जंगलतोड थांबविली पाहिजे. वनविभागावर त्याची जबाबदारी आहे. त्यांनी आदिवासींनी विश्वासात घेऊन जंगलांचे संवर्धन केले पाहिजे. त्यांनी योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडली तर माकडे जंगलातच राहतील. 

टॅग्स :MangoआंबाMonkeyमाकड