शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 12:42 IST

राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सतर्क आहे. गृह विभाग प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या विधानानं राज्यात राजकीय वातावरण पेटलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर(Raj Thackeray) समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. मात्र आता राज्य सरकार या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत असून राज्याचे पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. त्यानुसार येत्या १-२ दिवसांत भोंग्यांबाबत नियमावली जारी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले की, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांची बैठक होणार आहे. या बैठकीत भोंग्यांबाबत निर्णय घेतला जाईल. येत्या १-२ दिवसांत भोंग्यांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली जाईल. त्यानुसार पुढील अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर ही नियमावली जारी केली जाईल असं त्यांनी सांगितले.

तसेच राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सतर्क आहे. गृह विभाग प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कुणीही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सोशल मीडियावर पसरणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत धार्मिक भावना दुखावणाऱ्या एकूण ३ हजाराहून अधिक पोस्ट डिलीट केल्या गेल्या आहेत. जर कुठल्याही प्रकारे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाई करणार असंही दिलीप वळसे पाटलांनी सांगितले आहे.

नाशिक पोलीस आयुक्तांनी जारी केली नोटीस

नाशिक पोलिसांनी भोंग्यांबाबत नोटीस जारी केले आहे. नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडेय म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी आदेश जारी केले आहे. सर्व धार्मिकस्थळावरील भोंगे, स्पीकरची परवानगी घेणं बंधनकारक आहे. ३ मेनंतर बेकायदेशीर भोंगे हटवण्यात येतील. जर कुणाला हनुमान चालीसा पठण करायचं असेल तर ते मशिदीपासून १०० मीटर अंतरावर आणि दोन्ही एकाचवेळी वाजवू नये. अजानपूर्वी किंवा नंतर १५ मिनिटांनी हनुमान चालीसा लावली तरी हरकत नाही. कुणीही बेकायदेशीर भोंगे लावले तर ४ मेपासून त्यांच्यावर कठोर कारवाई करून भोंगे जप्त करण्यात येतील त्याचसोबत दोषींवर ४ महिने ते १ वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते असंही सांगितले आहे.

मोहित कंबोज यांनी केले स्वागत

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निर्णयाचं स्वागत करत भाजपा नेते मोहिक कंबोज म्हणाले की, ८० टक्के लाऊडस्पीकर हे मदरशांवर लावलेले आहेत २० टक्के लाऊड स्पीकर हे मशिदीवर आहेत. त्यामुळे मदरशांवरील लाऊडस्पीकर हे काढून टाकले पाहिजेत आणि जी मशिद अनधिकृत आहेत त्या मशिदीला लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाऊ नये. सर्व लोकांनी एकत्रित येऊन ही सामाजिक चळवळ सुरु केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे जे काही नियम आहेत ते नियम सरकारने योग्य रीतीने राबवावे आणि मशिदीवरील अनधिकृत भोंगे हे उतरवावे आणि याची सुरुवात मुंबईतून होईल. मुंबईमधून सर्व देशाला दिशा मिळेल असंही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलRaj Thackerayराज ठाकरे