शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचं ठरलं, काँग्रेसचीही साथ; आता शिवसेना काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 19:44 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका निश्चित; शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. ईडीनं पहाटे मलिक यांना घरातून ताब्यात घेतलं. आठ तास त्यांची चौकशी झाली. त्यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. 

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं दोघांमध्ये चर्चा झाली. आता वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्यासोबत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातदेखील वर्षावर पोहोचले आहेत. वर्षावर रवाना होण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून येणारा दबाव, त्यांच्या कारवाया यावर बैठकीत चर्चा झाली. शेवटपर्यंत एकत्र राहून लढा द्यायचा, अशी भूमिका दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी घेतली. यानंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

तत्पूर्वी संध्याकाळी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात बैठक झाली. मंत्रालयात झालेल्या बैठकीला दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे उपस्थित होते. मलिक यांच्याविरोधात झालेली कारवाई चुकीची असल्यानं राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnawab malikनवाब मलिकUddhav Thackerayउद्धव ठाकरे