शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचं ठरलं, काँग्रेसचीही साथ; आता शिवसेना काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 19:44 IST

काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका निश्चित; शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. ईडीनं पहाटे मलिक यांना घरातून ताब्यात घेतलं. आठ तास त्यांची चौकशी झाली. त्यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. 

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं दोघांमध्ये चर्चा झाली. आता वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्यासोबत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातदेखील वर्षावर पोहोचले आहेत. वर्षावर रवाना होण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून येणारा दबाव, त्यांच्या कारवाया यावर बैठकीत चर्चा झाली. शेवटपर्यंत एकत्र राहून लढा द्यायचा, अशी भूमिका दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी घेतली. यानंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

तत्पूर्वी संध्याकाळी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात बैठक झाली. मंत्रालयात झालेल्या बैठकीला दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे उपस्थित होते. मलिक यांच्याविरोधात झालेली कारवाई चुकीची असल्यानं राजीनाम्याचा प्रश्नच येत नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnawab malikनवाब मलिकUddhav Thackerayउद्धव ठाकरे