शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

मंत्रिमंडळ विस्तारात जुन्या मंत्र्यांना डच्चू,नव्या चेहऱ्यांना संधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:08 IST

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

ठळक मुद्दे राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मंत्रिमंडळातील जुन्या चेहऱ्यांना डच्चू जेऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं.

मुंबई- राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मंत्रिमंडळातील जुन्या चेहऱ्यांना डच्चू जेऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं. राज्यातील भाजपा सरकारला ३१ ऑक्टोबरला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत बाकी  राहीलेले सगळे प्रकल्प पूर होतील. प्रकल्प पूर्ण करायचं ध्येय गाठायला आम्हाला नक्की यश येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नव्या एनडीएमध्ये नारायण राणे यांना सहभागी करून घेण्याची चिन्हं जास्त आहेत तसंच जुन्या काही मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात काही समस्या निर्माण झाल्याची कबुली दिली तसंच 25 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सगळ्या लाभार्थी शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. आमच्याबरोबर सत्तेत असेलली शिवसेना विरोधाची भूमिका घेते हे दुर्देवी आहे. आम्ही जनहितार्थ घेतलेल्या निर्णयावरही शिवसेनेकडून टीका होते, याचा शिवसेनेला फायदा होणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारपेक्षा आमची कामगिरी उत्तमकाँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असतानाच्या परिस्थितीची आत्ताच्या परिस्थितीशी तुलना केली तर आमची कामगिरी उत्तम आहे. पण अजूनही आम्हाला सुधारणा हव्या आहेत. आम्ही पूर्णपणे पारदर्शी प्रशासन केलं असून उर्वरीत सगळे प्रकल्प 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचं ध्येय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं. 

कोणाला मिळणार नारळ?राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एमपीमिल कंपाऊंडचा एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप आहे. तर एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर आहे. याशिवाय आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही योग्य आणि वेगळं काम केलं नाही. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून तब्बल 600 आदिवासी मुलं दगावली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश आहेत.

त्यामुळे आता कोणत्या मंत्र्यांना मुख्यमंत्री नारळ देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारministerमंत्री