शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

साहित्य संमेलनात नागरिकत्व दुरुस्ती कायदा गाजणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 6:00 AM

अध्यक्षीय भाषणात संविधान हा मूळ मुद्दा : ठरावही मांडला जाण्याची शक्यता

ठळक मुद्देयंदा संमेलन संत गोरा कुंभार यांच्या पावन भूमीत अर्थात उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारीलासंमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षीय भाषणात संविधान केंद्रस्थानी

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : सध्या देशाामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन रणकंदन माजले आहे. एनआरसी आणि ‘सीएए’मुळे संविधानातील तत्वांची आणि मुल्यांची पायमल्ली होत असल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे. उस्मानाबाद येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही या कायद्याचे पडसाद उमटणार आहेत. संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अध्यक्षीय भाषणात संविधान केंद्रस्थानी ठेवले असून, संमेलनात मांडण्यात येणा-या ठरावातही या मुद्दयाचा समावेश केला जाणार आहे.यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संत गोरा कुंभार यांच्या पावन भूमीत अर्थात उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारीदरम्यान होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेतर्फे संमेलनाचे आयोजन केले आहे. साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषण, परिसंवाद, तसेच संमेलन ठरावांमधून सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब उमटत असते. सध्या देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा तीव्र निषेध केला जात आहे. अनेक राज्यांमध्ये या कायद्याविरोधात आंदोलने, मोर्चे, सभा सुरु असून, काही ठिकाणी कायद्याच्या समर्थनार्थ रॅली निघत आहे.धर्मनिरपेक्षता हा भारतीय राज्यघटनेचा मुलभूत पाया आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे लोकशाहीची मुल्ये दडपली जात असल्याचा आरोप होत आहे. नियोजितअध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये या मुद्दयाचा प्रामुख्याने समावेश केल्याचे संकेत दिले आहेत. साहित्य संस्थांकडून प्रस्ताव आल्यास, अथवा महामंडळ सदस्याने बैठकीत हा मुद्दा उचलून धरल्यास ठरावामध्येही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत ठाम भूमिका घेतली जाणार आहे.फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यापासूनच सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. अमित शहा यांनी मांडलेल्या ‘एक भाषा, एक धर्म’ या संकल्पनेलाही त्यांनी विरोध दर्शवला होता. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर झालाच पाहिजे, असे सांगत ‘एक भाषा, एक धर्म देशात अराजक निर्माण करेल’, असे खडे बोल त्यांनी सुनावले होते. अध्यक्षीय भाषणातही संविधान हेच केंद्रस्थानी असेल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.------------अध्यक्षीय भाषणाची प्रत आयोजक समितीकडे सोपविली आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला मुलभूत अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांची अंमलबजावणी देशात व्हायला हवी. संविधान हा अध्यक्षीय भाषणाचा पाया असेल. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत चिंतन सुरु आहे. साहित्य, संस्कृती, पर्यावरण यांसह भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता याबाबत अध्यक्षीय भाषणात भाष्य असेल.- फादर फ्रान्सिस दिब्रिटो, नियोजितअध्यक्ष, उस्मानाबाद अखिलभारतीयमराठीसाहित्य संमेलन---------------------घटक तसेच संलग्न साहित्य संस्थांना ठराव पाठवण्याबाबतचे निवेदन पाठवण्यात आले आहे. त्यानुसार संस्थांकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतचा ठराव मांडला जाऊ शकतो. महामंडळाच्या बैठकीत ठरावांबाबत चर्चा केली जाईल. महामंडळाचा एखादा सदस्यही याबाबत प्रस्ताव ठेवू शकतो.- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

टॅग्स :PuneपुणेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक