शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

...तर काश्मीरचाही लिलाव करतील, "सामना"तून सरकारला झोडलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 07:55 IST

50 हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 -  गेली 10 वर्षे सतत तोट्यात असलेल्या आणि डोक्यावर 52 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर असलेल्या एअर इंडिया या देशाच्या राष्ट्रीय विमान कंपनीच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आपलं मुखपत्र "सामना"तून केंद्र सरकारला चांगलंच झोडलं आहे. 
 
50 हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून राज्यकर्ते कश्मीरचाही लिलाव करतील. त्याचा काही भरवसा नाही, अशा प्रखर शब्दामध्ये सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. एअरइंडियाच्या कर्जाचं पाप हे कॉग्रेसचं असल्याचं सामनात म्हटलं आहे पण त्यासोबतच काँग्रेस राजवटीत हे पाप झाले असेल तर ते धुऊन काढण्याची संधी मोदी सरकारला होती. ते त्यांनी का केले नाही? असा सवालही भाजपाला विचारला आहे. 
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर   
‘महाराजा’ची विक्री!
50 हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून राज्यकर्ते कश्मीरचाही लिलाव करतील. त्याचा काही भरवसा नाही. एअर इंडिया म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक होते. ‘महाराजा’ हे आमच्या वैभवाचे व आदरातिथ्याचे प्रतीक होते. ‘महाराजा’चे आधीच कोसळलेले संस्थान सरकारने खालसा केले आहे.
अखेर एअर इंडिया विकायला काढायचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ही वेळ आधीच्या राज्यकर्त्यांनी आणली हे खरे, पण नवे सरकार येताच परिस्थिती सुधारेल असे वाटले होते. रेल्वेचे आणि एअर इंडियाचे खासगीकरण करणार नाही असे कालपर्यंत सांगितले जात होते, पण एअर इंडियाच्या ‘महाराजा’ला खांदा देण्याचे काम आमच्याच बादशाही सरकारने केले. काँग्रेस राजवटीत हा निर्णय झाला असता तर भारतीय जनता पक्षाने काँग्रेस सरकारचे वस्त्रहरण केले असते. ज्यांना एअर इंडिया चालवता येत नाही ते देश काय चालविणार? असा सवाल केला असता, पण आज हिंदुस्थानची ‘National Carrier’ म्हणून ओळखली जाणारी एअर इंडिया विक्रीस काढण्यात आली आहे. एअर इंडियावर ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. शिवाय ४ हजार कोटींच्या व्याजाचे ओझे आहे. गेल्या दहा वर्षांपासून एअर इंडिया तोटय़ात आहे. त्यामुळे हा पांढरा हत्ती पोसायचा कशाला? असे देशाच्या अर्थमंत्र्यांना वाटते, पण एअर इंडियाची ही अशी घसरगुंडी का व कुणामुळे झाली, ‘महाराजा’स भिकारी करून रस्त्यावर आणणारे गुन्हेगार कोण याबाबत अर्थमंत्री काही बोलणार आहेत की नाही? एकेकाळी एअर इंडिया जगात सर्वोत्तम होती. ‘महाराजा’प्रमाणे एअर इंडियाचा थाटमाट होता, पण राजकारणी व नोकरशहांनी मिळून एअर इंडियाची वाट लावली. उधळपट्टी व गैरव्यवस्थापनामुळे आज ही वेळ आली आहे. विमान वाहतूक क्षेत्रातला एअर इंडियाचा वाटा ३५ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत घसरला याचे कारण फायद्यात चालणारे अनेक ‘मार्ग’ नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने खासगी विमान कंपन्यांना विकले. हा भ्रष्टाचार आहे. काँग्रेस राजवटीत हे पाप झाले असेल तर ते धुऊन काढण्याची संधी मोदी सरकारला होती. ते त्यांनी का केले नाही? की त्यांनाही उंटाच्या पाठीवर शेवटची काडी ठेवायचीच होती? राज्य बदलले म्हणून एअर इंडियाची हालत सुधारली नाही व ‘महाराजा’च्या ऐटीत भर पडली नाही. मुंबईतले एअर इंडियाचे मुख्यालय हलवून ते दिल्लीस नेले. तिथेच ‘महाराजा’च्या साम्राज्याचा पाया ढासळला. हे सर्व ठरवून केले व महाराजाला माती खायला लावून नोकरशहा व राज्यकर्त्यांनी आपले खिसे भरले. एअर इंडियाच्या कर्मचाऱयांत फूट पाडून फोडा-झोडा व राज्य करण्याची नीती एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने स्वीकारली. ५० हजार कोटींचे कर्ज झाले म्हणून आज एअर इंडिया विकायला काढली, उद्या कश्मीरची सुरक्षा करताना खर्च झेपत नाही म्हणून राज्यकर्ते कश्मीरचाही लिलाव करतील. त्याचा काही भरवसा नाही. एअर इंडिया म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक होते. ‘महाराजा’ हे आमच्या वैभवाचे व आदरातिथ्याचे प्रतीक होते. ‘महाराजा’चे आधीच कोसळलेले संस्थान सरकारने खालसा केले आहे.