शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विधानसभेला २८८ पाडणार की उभे करणार? मुदत संपण्याच्या दिवशी जरांगे पाटलांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 13:01 IST

शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई यांना वेळ दिलेली आहे, नंतर पुढचा दौरा ठरविला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले. 

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेल्या मुदतीचा आजचा अखेरचा दिवस आहे. यामुळे जालना येथे जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही सरकारला दिलेली मुदत संपत असून आज सायंकाळपर्यंत वाट पाहणार असल्याचे म्हटले आहे. शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई यांना वेळ दिलेली आहे, नंतर पुढचा दौरा ठरविला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले. 

आज दिवसभर आम्ही सरकारच्या भूमिकेवर व सरकार मराठा आरक्षण देणार का याची वाट पाहणार आहे. पुढील रूपरेषा लवकरच राज्यातील मराठा समाज बांधवांशी चर्चा करून मी ठरवणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातून माझा दौरा पुन्हा सुरू होणार आहे. आम्ही सगे सोयरेची अंमलबजावणी करणारच आहोत. शिंदे समितीने काम सुरू ठेवावे व कुणबी प्रमाणपत्र देणे सुद्धा चालू करावे, अशी मागणी जरांगे यांनी केला आहे. 

काही अधिकारी जाणून-बुजून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. हे सुद्धा चुकीचे आहे. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आंदोलनादरम्यान अंतरवाली सराटी येथे ज्या काही मराठा समाज बांधवांवर केसेस दाखल झाल्या आहेत त्या सुद्धा सरकारने मागे घ्याव्यात, अन्यथा सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये मी 288 उमेदवार पाडेन. आताच सरकारने आरक्षण द्यावे. भ्रमात राहू नये. राज्यातील कोट्यवधी मराठ्यांना न्याय द्यावा, असा इशारा जरांगे यांनी शिंदे सरकारला दिला आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण