शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पत्नीचं वारंवार माहेरी जाणं ठरलं घटस्फोटाचं कारण; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 07:58 IST

पतीला मनस्ताप देणारी कृती; हायकोर्टाचे निरीक्षण

नागपूर : पतीला न सांगता, न विचारता पत्नीचे वारंवार माहेरी जाणे आणि तेथे महिनोंमहिने राहणे, पतीसोबत सतत या ना त्या कारणावरून भांडण करणे व पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवणे या गोष्टी घटस्फोटाचे कारण ठरल्या आहेत. ही कृती पतीला मनस्ताप देणारी आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून या कारणावरून पतीला मिळालेला घटस्फोट योग्य ठरवला आहे.न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला आहे. नागपुरातील लुर्दमेरी व जॉनी (बदललेली नावे) यांचे २४ ऑक्टोबर २००७ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर लुर्दमेरी संयुक्त कुटुंबात काही महिने राहिली, पण पुढे ती पतीला न सांगता वारंवार माहेरी जायला लागली. तिची संयुक्त कुटुंबात राहण्याची इच्छा नव्हती. जॉनी तिला प्रत्येकवेळी सासरी परत आणत होता. दरम्यान, तिने पोलीस ठाण्यात छळाची तक्रार नोंदवली. महिला सेलच्या मध्यस्थीमुळे तो वाद मिटला. मुलाचा जन्म झाल्यानंतर लुर्दमेरी सासरी येण्यास तयार नव्हती. जॉनीने कायदेशीर नोटीस बजावल्यामुळे ती परत आली. तिची संयुक्त कुटुंबात राहण्याची इच्छा नसल्यामुळे जॉनीने भाड्याचे घर घेतले होते. परंतु, तेथेही लुर्दमेरी समाधानाने राहिली नाही. ती सतत भांडण करून जॉनीला मानसिक व शारीरिक त्रास देत होती. परिणामी, जॉनीने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. २ मे २०१७ रोजी ती याचिका मंजूर झाली. त्या निर्णयाविरुद्ध लुर्दमेरीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. 

टॅग्स :Divorceघटस्फोट