शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

... म्हणून नरकचतुर्दशीला पायाखाली कारिटं फोडतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 11:27 IST

काही ठिकाणी अंघोळीआधी तर काही ठिकाणी अंघोळीनंतर पायानं कारिटं ठेचलं जातं. त्यालाही एक कारण आहे.

ठळक मुद्देया फळाला विविध नावं आहेत. काही ठिकाणी त्याला कर्टुले तर काही ठिकणी चिराटं म्हणतातकाकडीसारखेच हे फळ दिसत असले तरी याचा आकार अंड्यासारखा असतो.चिराटं फोडण्यामागे एक वैज्ञानिक कारणही दिलं जाते

श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून आपण आश्विन महिन्याच्या चौदाव्या दिवशी नरकचतुर्दशी साजरी करतो. यादिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे. असं म्हणतात की पहाटे आकाशात तारे दिसतात तोवर अंघोळ करणे गरजेचं असतं. याचदिवशी आपण अंघोळीनंतर पायाच्या अंगठ्याने कारीटं (हिरव्या रंगांचं कडू फळ) फोडतो. पण तुम्हाला माहितेय का आपण असे का करतो.

नरकासुर नावाच्या एका असूर राजाची भगवान श्रीकृष्णाच्या काळात मोठी दहशत होती. तो इतरांना फार त्रास देत असे. स्त्रियांशी वाईट वागत असे. त्यामुळे जनता त्याला फार त्रासली होती. ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णाला कळली तेव्हा त्याने सत्यभामेसह त्या असूरी राजावर आक्रमण केलं आणि त्याचा वध केला. त्याच्या वधाचं प्रतिक म्हणून आपण हे कडू फळ फोडतो. आणि त्याचा रस जिभेला लावतो. याबाबत असं सांगण्यात येतं की, ‘ते फळ फोडून आपण आजच्या काळातील प्रतिकात्मक नरकासूराचा वध करतो. शिवाय दुसरी वैज्ञानिक गोष्ट अशी सांगितली जाते की, अश्विन महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या काळात हिवाळा सुरू झालेला असतो. फार थंडी असतो. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी हे कडू फळ चाखलं जातं.'

कारीटे फोडण्याची ही प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात नाही. काहीच ठिकाणी या प्रथेचं पालन केलं जातं. शिवाय काही ठिकाणी हे कारिटे अंघोळीनंतर ठेचतात. तर काही ठिकाणी अंघोळीआधी कारिटे ठेचले जातात, कारण या फळाला एक उग्र वास असतो. त्यामुळे अंघोळीआधी कारिटे ठेचून त्यानंतर अंघोळ केली जाते.

त्याचप्रमाणे या कारिटेला विविध नावेही आहेत. काही ठिकाणी या फळाला कर्टुले म्हणतात. तर काही ठिकाणी चिराटे म्हणतात. कारिटे हे अनेकवचनी असून कारीट हे एकवचनी नाव आहे. कारीटं हे कोकणात आढळणारे रानवेलीवर येणारं फळ आहे. हे फळ वेलीला लागते जे एकदम काकडीच्या वेलीसारखे दिसते. काकडीच्या फुलांसारखीच याचीही फले पिवळ्या रंगाची असतात. अगदी काकडीसारखेच हे फळ दिसत असले तरी याचा आकार अंड्यासारखा असतो. आतल्या बिया काकडीच्या बियांसारख्या असतात पण थोड्या आखूड असतात.

टॅग्स :diwaliदिवाळीIndian Traditionsभारतीय परंपरा