शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
2
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
3
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
4
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
5
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
6
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
7
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
8
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
9
Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 
10
मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार
11
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
12
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
13
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
14
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
15
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
16
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
17
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
18
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
19
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
20
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?

६८ दिवस सीबीआयकडे तपास का दिला नाही?; सुशांत सिंह राजपूत प्रकरणी विधानसभेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:57 IST

पहिल्या दिवसापासून यांच्या मनात खोट नव्हती मग प्रकरण सीबीआयला का दिले नाही. बिहारचे पोलीस चौकशीला येतात त्यांना तपास करण्यास का अडवले?

मुंबई - दिशा सालियनच्या वडिलांना धाक दहशत दाखवून पुढे येऊ दिले नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही तेच घडले असेल. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी बिहार पोलिसांना चौकशी करण्यास विरोध केला गेला. त्या काळात दररोज उबाठा गटाचे नेते रिया चक्रवर्तीच्या बाजूने बोलत होते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी उद्धव ठाकरे सरकारने पुरावे नष्ट केले का याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी विधानसभेत केले. त्यावरून संबंधित प्रकाराची चौकशी करून राज्य सरकार त्यावर निर्णय घेईल असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं.

विधानसभेत राम कदम म्हणाले की, ज्यावेळी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला, तो कोविड काळ होता. त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती तिच्या बाजूने काही नेते बोलत होते. सुशांत सिंह राजपूतचा ज्या फ्लॅटमध्ये मृत्यू झाला, तो चौकशीसाठी ताब्यात ठेवला पाहिजे होता. मात्र तो फ्लॅट घाईगडबडीने उद्धव ठाकरे सरकारने मूळ मालकाला परत केला. त्या फ्लॅटमध्ये ६८ दिवसांत सर्व फर्निचर काढले गेले. रंगरंगोटी केली. पुरावे नष्ट करायचे होते? रिया चक्रवर्तीच्या बाजूने ठाकरे गटाचे नेते बोलत होते. पहिल्या दिवसापासून यांच्या मनात खोट नव्हती मग प्रकरण सीबीआयला का दिले नाही. बिहारचे पोलीस चौकशीला येतात त्यांना तपास करण्यास का अडवले? ६८ दिवसानंतर सीबीआयला चौकशीसाठी हे प्रकरण दिले, तोपर्यंत सगळे पुरावे नष्ट केले होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

त्यावर विधिमंडळाच्या काही प्रथा परंपरा नियम आहेत. हे सभागृह परंपरेने चालते, कुठल्याही सदस्याचं नाव घ्यायचे असते तेव्हा त्याला नोटीस द्यावी लागते असं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातला त्यात मला बोलू द्या, अशी मनमानी चालणार नाही. मनमानीप्रमाणे सभागृह चालवायचे असेल तर चालवा. हे काय चाललंय..? काही प्रथा, परंपरा, नियम आहेत. या ठिकाणी ज्या पद्धतीने ५ वर्षापूर्वीची घटना, आज तिचे वडील पोलीस मुख्यालयात जातात असं पटोले म्हणत असतानाच सभागृहात सत्ताधारी विरोधक आमनेसामने आले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. 

...तर कुणालाही पाठीशी घालणार नाही 

सभागृहातील या गोंधळात मंत्री शंभुराज देसाई यांनी भाष्य केले. तुम्हाला खरं ऐकून घ्यायचं नाही. विरोधी पक्षाने सभात्याग केला असेल त्यांना वस्तूस्थिती ऐकून घ्यायची नाही. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई पोलिसांकडे जो काही जबाब दिला, ते सगळे रेकॉर्डवर घेतले आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यूचे कनेक्शन असेल तर कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. ५ वर्षापूर्वी एखादी गोष्ट पुढे आली नसेल की आता पुढे आली असेल तर त्याची चौकशी होईल. आपल्या मुलीसाठी ते वडील न्याय मागतायेत. त्यांचे जे काही म्हणणं आहे ते ऐकून तपास केला जाईल. जे काही असेल ते समोर आणले जाईल असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयला चॅलेंज करायचा प्रश्न नाही. ज्या गोष्टी समोर आल्यात. दिशाच्या वडिलांनी ज्या गोष्टी मांडल्या, त्याचे काही कनेक्शन असेल तर चौकशी होईल असं आमचं म्हणणं आहे. दूध का दूध, पानी का पानी सगळं बाहेर येईल. जाणीवपूर्वक कुणालाही बदनाम करण्याचं काम हे सरकार करणार नाही असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, सीबीआयने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ३ वर्ष चौकशी केली, त्यानंतर क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यात कुठेही त्यात पुरावे नाहीत असं सीबीआयने म्हटलं. मग केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयवर राज्य सरकारचा विश्वास नाही का, सीबीआयवर प्रश्नचिन्ह सरकार उपस्थित करतंय. वारंवार उद्धव ठाकरे सरकार असं बोलून बदनामी करण्याचा प्रयत्न असेल तर ते कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी आमदार वरूण सरदेसाई यांनी केली. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRam Kadamराम कदमShambhuraj Desaiशंभूराज देसाईNana Patoleनाना पटोलेMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025