शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

‘त्या’ लाडक्या बहिणींचा रोष अंगणवाडीताईंनी का घ्यावा, कमल परूळेकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:32 IST

पुढाऱ्यांनीच ‘दबाव’ टाकला.. !

गडहिंग्लज : गोरगरीब भगिनींना मदत व्हावी म्हणूनच अंगणवाडीसेविका, मदतनीसांनी दिवसरात्र राबून लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेतले. त्यातील अपात्र लाभार्थी वगळण्याची मोहीम सरकारने सुरू केली आहे, ते कामही अंगणवाडीताईंवरच सोपवले आहे. मात्र, त्यातून ‘रोष’ येणार असल्याने ते काम त्या करणार नाहीत. त्यामुळे ते काम सरकारने ग्रामविकास व महसूल विभागाकडे सोपवावे, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य सचिव कमल परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.पत्रकात म्हटले आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सरकारने ही योजना आणली. त्यासाठी अर्ज भरून घेण्याची जबाबदारी परिपत्रकाद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली. त्याबदल्यात अर्जामागे ५० रुपये देण्याचेही जाहीर केले. परंतु तेही ७-८ महिन्यांनी दिले. अजूनही काहींचे पैसे मिळालेले नाहीत. तरीही दुसऱ्याने केलेली चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी पुन्हा अंगणवाडीवरच सोपवली जात आहे.गावपातळीवरील अंगणवाडी कर्मचारी विविध उपक्रमांसाठी वर्गणी जमा करण्याचे काम करतात. गर्भश्रीमंत लोक वर्गणी देऊन सरकारला मदतही करतात. मात्र, लहरी सरकार सांगते म्हणून त्यांच्याच पत्नी किंवा अन्य महिला चुकीच्या पद्धतीने फायदा मिळवतात हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले तर त्याचा रोष येईल. लोकवर्गणीसाठी तिला कुणी दारातही उभे करून घेणार नाही, यासंदर्भात संबंधित मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनाही कळवले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुढाऱ्यांनीच ‘दबाव’ टाकला.. !एखाद्या बहिणीला नियमानुसार अर्ज करता येत नाही असे सांगणाऱ्या अंगणवाडीसेविकांवर पुढाऱ्यांनीच दबाव टाकला. अनेकांनी शिबिरे भरवून अर्ज भरून घेतले. गाडीवाले, इन्कम टॅक्स भरणारे, एकेका घरात ४/४ भगिनींचे फॉर्म भरले. त्यांना लाभही मिळवून दिले, त्यांची मतेही घेतली. मात्र, काम झाल्यावर सरकारला कर्जबाजारी झाल्याची जाणीव झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.‘कार्यकर्त्यां’चे कुटुंब वगळले तर..?अख्ख्या गावाचा सर्व्हे करून खोटी प्रकरणे शोधण्याचे काम अंगणवाडीताईंवर सोपवले जात आहे. त्यात आपल्या लाडक्या कार्यकर्त्यांचे कुटुंब वगळल्यास पुढारी त्याचा राग अंगणवाडीताईंवरच काढतील. म्हणूनच हे काम नाकारत असून, सरकारने त्यांच्यावर दबाव टाकू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.