शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
2
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
3
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
4
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
5
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
6
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
7
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
8
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
9
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
10
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
11
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
12
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
13
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
14
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
15
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
16
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
17
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
18
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
19
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
20
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लाडक्या बहिणींचा रोष अंगणवाडीताईंनी का घ्यावा, कमल परूळेकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:32 IST

पुढाऱ्यांनीच ‘दबाव’ टाकला.. !

गडहिंग्लज : गोरगरीब भगिनींना मदत व्हावी म्हणूनच अंगणवाडीसेविका, मदतनीसांनी दिवसरात्र राबून लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेतले. त्यातील अपात्र लाभार्थी वगळण्याची मोहीम सरकारने सुरू केली आहे, ते कामही अंगणवाडीताईंवरच सोपवले आहे. मात्र, त्यातून ‘रोष’ येणार असल्याने ते काम त्या करणार नाहीत. त्यामुळे ते काम सरकारने ग्रामविकास व महसूल विभागाकडे सोपवावे, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य सचिव कमल परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.पत्रकात म्हटले आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सरकारने ही योजना आणली. त्यासाठी अर्ज भरून घेण्याची जबाबदारी परिपत्रकाद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली. त्याबदल्यात अर्जामागे ५० रुपये देण्याचेही जाहीर केले. परंतु तेही ७-८ महिन्यांनी दिले. अजूनही काहींचे पैसे मिळालेले नाहीत. तरीही दुसऱ्याने केलेली चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी पुन्हा अंगणवाडीवरच सोपवली जात आहे.गावपातळीवरील अंगणवाडी कर्मचारी विविध उपक्रमांसाठी वर्गणी जमा करण्याचे काम करतात. गर्भश्रीमंत लोक वर्गणी देऊन सरकारला मदतही करतात. मात्र, लहरी सरकार सांगते म्हणून त्यांच्याच पत्नी किंवा अन्य महिला चुकीच्या पद्धतीने फायदा मिळवतात हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले तर त्याचा रोष येईल. लोकवर्गणीसाठी तिला कुणी दारातही उभे करून घेणार नाही, यासंदर्भात संबंधित मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनाही कळवले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुढाऱ्यांनीच ‘दबाव’ टाकला.. !एखाद्या बहिणीला नियमानुसार अर्ज करता येत नाही असे सांगणाऱ्या अंगणवाडीसेविकांवर पुढाऱ्यांनीच दबाव टाकला. अनेकांनी शिबिरे भरवून अर्ज भरून घेतले. गाडीवाले, इन्कम टॅक्स भरणारे, एकेका घरात ४/४ भगिनींचे फॉर्म भरले. त्यांना लाभही मिळवून दिले, त्यांची मतेही घेतली. मात्र, काम झाल्यावर सरकारला कर्जबाजारी झाल्याची जाणीव झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.‘कार्यकर्त्यां’चे कुटुंब वगळले तर..?अख्ख्या गावाचा सर्व्हे करून खोटी प्रकरणे शोधण्याचे काम अंगणवाडीताईंवर सोपवले जात आहे. त्यात आपल्या लाडक्या कार्यकर्त्यांचे कुटुंब वगळल्यास पुढारी त्याचा राग अंगणवाडीताईंवरच काढतील. म्हणूनच हे काम नाकारत असून, सरकारने त्यांच्यावर दबाव टाकू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.