शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लाडक्या बहिणींचा रोष अंगणवाडीताईंनी का घ्यावा, कमल परूळेकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:32 IST

पुढाऱ्यांनीच ‘दबाव’ टाकला.. !

गडहिंग्लज : गोरगरीब भगिनींना मदत व्हावी म्हणूनच अंगणवाडीसेविका, मदतनीसांनी दिवसरात्र राबून लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेतले. त्यातील अपात्र लाभार्थी वगळण्याची मोहीम सरकारने सुरू केली आहे, ते कामही अंगणवाडीताईंवरच सोपवले आहे. मात्र, त्यातून ‘रोष’ येणार असल्याने ते काम त्या करणार नाहीत. त्यामुळे ते काम सरकारने ग्रामविकास व महसूल विभागाकडे सोपवावे, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य सचिव कमल परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.पत्रकात म्हटले आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सरकारने ही योजना आणली. त्यासाठी अर्ज भरून घेण्याची जबाबदारी परिपत्रकाद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली. त्याबदल्यात अर्जामागे ५० रुपये देण्याचेही जाहीर केले. परंतु तेही ७-८ महिन्यांनी दिले. अजूनही काहींचे पैसे मिळालेले नाहीत. तरीही दुसऱ्याने केलेली चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी पुन्हा अंगणवाडीवरच सोपवली जात आहे.गावपातळीवरील अंगणवाडी कर्मचारी विविध उपक्रमांसाठी वर्गणी जमा करण्याचे काम करतात. गर्भश्रीमंत लोक वर्गणी देऊन सरकारला मदतही करतात. मात्र, लहरी सरकार सांगते म्हणून त्यांच्याच पत्नी किंवा अन्य महिला चुकीच्या पद्धतीने फायदा मिळवतात हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले तर त्याचा रोष येईल. लोकवर्गणीसाठी तिला कुणी दारातही उभे करून घेणार नाही, यासंदर्भात संबंधित मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनाही कळवले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुढाऱ्यांनीच ‘दबाव’ टाकला.. !एखाद्या बहिणीला नियमानुसार अर्ज करता येत नाही असे सांगणाऱ्या अंगणवाडीसेविकांवर पुढाऱ्यांनीच दबाव टाकला. अनेकांनी शिबिरे भरवून अर्ज भरून घेतले. गाडीवाले, इन्कम टॅक्स भरणारे, एकेका घरात ४/४ भगिनींचे फॉर्म भरले. त्यांना लाभही मिळवून दिले, त्यांची मतेही घेतली. मात्र, काम झाल्यावर सरकारला कर्जबाजारी झाल्याची जाणीव झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.‘कार्यकर्त्यां’चे कुटुंब वगळले तर..?अख्ख्या गावाचा सर्व्हे करून खोटी प्रकरणे शोधण्याचे काम अंगणवाडीताईंवर सोपवले जात आहे. त्यात आपल्या लाडक्या कार्यकर्त्यांचे कुटुंब वगळल्यास पुढारी त्याचा राग अंगणवाडीताईंवरच काढतील. म्हणूनच हे काम नाकारत असून, सरकारने त्यांच्यावर दबाव टाकू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.