शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्रात मराठीसाठी मोर्चे का नाही?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 00:44 IST

ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. विजया वाड यांचा सवाल

ठाणे : विविध जातींचे मोर्चे नेहमीच निघतात. परंतु, महाराष्ट्रात राहून मराठी भाषेसाठी मोर्चे का निघत नाहीत, असा सवाल करत ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. विजया वाड यांनी केला. बारावीपर्यंत मराठीची सक्ती करण्याचा धोशा धरला तरच मराठी जगेल आणि टिकेलही, असे मत त्यांनी ठाण्यात व्यक्त केले.चारशेव्या अभिनय कट्ट्यावर डॉ. वाड यांच्या हस्ते आशा राजदेरकर लिखित ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या विनोदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी कट्ट्याचे संचालक किरण नाकती उपस्थित होते. डॉ. वाड म्हणाल्या की, विनोदी लिखाण हे अवघड आहे. लोकांना रडवणे सोपे असले, तरी हसवणे मात्र कठीण आहे, असेही त्या म्हणाल्या. ठाण्यात सुरू असलेल्या अभिनय कट्ट्याबद्दल त्यांनी ठाणेकरांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी पाहून ठाणेकरांचे आणि अभिनय कट्ट्याचे त्यांनी कौतुक केले. ‘आनंदाच्या वाटेवरती’ ही कविता त्यांनी यावेळी सादर केली. डॉ. वाड यांनी साहित्य जगायला शिकवले, असे सांगत नाकती यांनी साहित्य जगले आणि जपले पाहिजे, असा सल्ला सर्वांना दिला. माधुरी कोळी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.व्यासंगाचे रूपांतर व्यसनात होऊ नये : पुरुषोत्तम बेर्डेसोशल मीडिया ही काळाची गरज असली, तरी त्यात किती रमावे, हे आपल्या हातात आहे. व्यासंगाचे रूपांतर व्यसनात होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रागाच्या भरात एखाद्या गोष्टीपासून आपण तुटतो, तेव्हा नवीन गोष्टींना मुकतो, असे मत दिग्दर्शक, लेखक, निर्माते पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केले.‘हमाल दे धमाल’ या चित्रपटाविषयी सांगताना ते म्हणाले की, या चित्रपटात दाखवलेल्या दहीहंडी उत्सवात प्रामाणिकपणा आहे. या उत्सवाचा मुख्य उद्देश समोर ठेवून आम्ही लहानपणी तो उत्सव साजरा केला. परंतु गेल्या १० ते १५ वर्षांत या उत्सवाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे मूळ हेतू हरवला असून, हा उत्सव जीवघेणा झाला आहे, असे परखड मत पुरूषोत्तम बेर्डे यांनी यावेळी व्यक्त केले.सिनेमाचा खरा आनंद सिनेमागृहातच असतो. तो आनंद मी लहानपणापासून अनुभवत आहे. पहिला सिनेमा मी मला हवा तसा केला आणि तो प्रेक्षकांनी उचलून धरला. अभिनय कट्ट्याचे कलात्मक स्वरूप बघून मी भारावून गेलो. कट्टा ही ठाणेकरांसाठी पर्वणी आहे, अशा शब्दांत त्यांनी कट्ट्याचे कौतुक केले. पालकांनी मुलांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा सल्ला त्यांनी दिला. ही मुलाखत सुषमा रेगे यांनी घेतली.कट्ट्याने घेतली सर्वप्रथम दखल : जयंत सावरकरठाणे : ठाण्यात आल्यावर माझी पहिली दखल किरण नाकती आणि त्यांच्या अभिनय कट्ट्याने घेतली. इथे आल्यावर कळले की, आपला प्रेक्षकवर्ग ठाण्यातही आहे. अभिनय कट्टा आमच्या उमेदीच्या काळात असता, तर आणखी प्रगती झाली असती, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी व्यक्त केल्या.रविवारी सकाळी अभिनय कट्ट्याच्या चारशेव्या विक्रमी कट्ट्याचे उद्घाटन सावरकर यांच्या हस्ते व कट्ट्याचे संचालक, दिग्दर्शक किरण नाकती, कट्ट्याचे ज्येष्ठ कलाकार राजन मयेकर, फुलपाखरूफेम आशीष जोशी, विठू माऊली मालिकेतील बालकलाकार श्रेयस साळुंखे यांच्या उपस्थितीत झाले.माझ्या अभिनयाची सुरुवात एकांकिका पाहण्यापासून झाली. नाटकात काम करणे, हा व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग आहे. अभिनय कट्ट्यावर येऊन एकांकिका पाहायला आवडेल. अभिनय करून आनंद घेणे आणि त्या आनंदाची देवाणघेवाण करणे अभिनय कट्ट्यावर शक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :agitationआंदोलनthaneठाणेmarathiमराठी