शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

'महाराष्ट्रात मराठीसाठी मोर्चे का नाही?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 00:44 IST

ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. विजया वाड यांचा सवाल

ठाणे : विविध जातींचे मोर्चे नेहमीच निघतात. परंतु, महाराष्ट्रात राहून मराठी भाषेसाठी मोर्चे का निघत नाहीत, असा सवाल करत ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. विजया वाड यांनी केला. बारावीपर्यंत मराठीची सक्ती करण्याचा धोशा धरला तरच मराठी जगेल आणि टिकेलही, असे मत त्यांनी ठाण्यात व्यक्त केले.चारशेव्या अभिनय कट्ट्यावर डॉ. वाड यांच्या हस्ते आशा राजदेरकर लिखित ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या विनोदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी कट्ट्याचे संचालक किरण नाकती उपस्थित होते. डॉ. वाड म्हणाल्या की, विनोदी लिखाण हे अवघड आहे. लोकांना रडवणे सोपे असले, तरी हसवणे मात्र कठीण आहे, असेही त्या म्हणाल्या. ठाण्यात सुरू असलेल्या अभिनय कट्ट्याबद्दल त्यांनी ठाणेकरांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी पाहून ठाणेकरांचे आणि अभिनय कट्ट्याचे त्यांनी कौतुक केले. ‘आनंदाच्या वाटेवरती’ ही कविता त्यांनी यावेळी सादर केली. डॉ. वाड यांनी साहित्य जगायला शिकवले, असे सांगत नाकती यांनी साहित्य जगले आणि जपले पाहिजे, असा सल्ला सर्वांना दिला. माधुरी कोळी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.व्यासंगाचे रूपांतर व्यसनात होऊ नये : पुरुषोत्तम बेर्डेसोशल मीडिया ही काळाची गरज असली, तरी त्यात किती रमावे, हे आपल्या हातात आहे. व्यासंगाचे रूपांतर व्यसनात होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रागाच्या भरात एखाद्या गोष्टीपासून आपण तुटतो, तेव्हा नवीन गोष्टींना मुकतो, असे मत दिग्दर्शक, लेखक, निर्माते पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केले.‘हमाल दे धमाल’ या चित्रपटाविषयी सांगताना ते म्हणाले की, या चित्रपटात दाखवलेल्या दहीहंडी उत्सवात प्रामाणिकपणा आहे. या उत्सवाचा मुख्य उद्देश समोर ठेवून आम्ही लहानपणी तो उत्सव साजरा केला. परंतु गेल्या १० ते १५ वर्षांत या उत्सवाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे मूळ हेतू हरवला असून, हा उत्सव जीवघेणा झाला आहे, असे परखड मत पुरूषोत्तम बेर्डे यांनी यावेळी व्यक्त केले.सिनेमाचा खरा आनंद सिनेमागृहातच असतो. तो आनंद मी लहानपणापासून अनुभवत आहे. पहिला सिनेमा मी मला हवा तसा केला आणि तो प्रेक्षकांनी उचलून धरला. अभिनय कट्ट्याचे कलात्मक स्वरूप बघून मी भारावून गेलो. कट्टा ही ठाणेकरांसाठी पर्वणी आहे, अशा शब्दांत त्यांनी कट्ट्याचे कौतुक केले. पालकांनी मुलांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा सल्ला त्यांनी दिला. ही मुलाखत सुषमा रेगे यांनी घेतली.कट्ट्याने घेतली सर्वप्रथम दखल : जयंत सावरकरठाणे : ठाण्यात आल्यावर माझी पहिली दखल किरण नाकती आणि त्यांच्या अभिनय कट्ट्याने घेतली. इथे आल्यावर कळले की, आपला प्रेक्षकवर्ग ठाण्यातही आहे. अभिनय कट्टा आमच्या उमेदीच्या काळात असता, तर आणखी प्रगती झाली असती, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी व्यक्त केल्या.रविवारी सकाळी अभिनय कट्ट्याच्या चारशेव्या विक्रमी कट्ट्याचे उद्घाटन सावरकर यांच्या हस्ते व कट्ट्याचे संचालक, दिग्दर्शक किरण नाकती, कट्ट्याचे ज्येष्ठ कलाकार राजन मयेकर, फुलपाखरूफेम आशीष जोशी, विठू माऊली मालिकेतील बालकलाकार श्रेयस साळुंखे यांच्या उपस्थितीत झाले.माझ्या अभिनयाची सुरुवात एकांकिका पाहण्यापासून झाली. नाटकात काम करणे, हा व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग आहे. अभिनय कट्ट्यावर येऊन एकांकिका पाहायला आवडेल. अभिनय करून आनंद घेणे आणि त्या आनंदाची देवाणघेवाण करणे अभिनय कट्ट्यावर शक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :agitationआंदोलनthaneठाणेmarathiमराठी