शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती का नाही?

By admin | Updated: October 8, 2015 03:09 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सरकारने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केलेली नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. सरकारने एखाद्या ज्येष्ठ वकिलाची त्यासाठी

मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सरकारने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केलेली नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. सरकारने एखाद्या ज्येष्ठ वकिलाची त्यासाठी नियुक्ती का केली नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी केली.एकीकडे समीर गायकवाडला वाचवण्यासाठी सनातनने वकिलांची फौज उभी केली असताना, दुसरीकडे सरकारने त्याच्याविरुद्ध केस लढण्यासाठी अद्याप एकाही विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केलेली नाही. समीरची कोठडी वाढवून घेण्यासाठी पोलिसांनाच कोल्हापूर दंडाधिकाऱ्यांसमोर युक्तिवाद करावा लागला, अशी माहिती याचिकाकर्त्या स्नेहा पानसरे यांचे वकील अभय नेवगी यांनी न्या. रणजित मोरे व न्या राजेश केतकर यांच्या खंडपीठाला दिली. हे खेदजनक असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले.डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या तपासाचा अहवाल सीबीआय आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात सादर केला. पानसरेंच्या हत्येप्रकरणी सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला समीर गायकवाड हा गोवा बॉम्बस्फोटाप्रकरणी २००९पासून फरार असलेल्या रुद्र पाटीलचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे या हत्येमागेही पाटीलचा हात असावा, असा संशय पोलिसांना असल्याचे अतिरिक्त सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी सांगितले, तर पाटीलच्या पत्नीने गायकवाडसाठी वकीलपत्र सादर केले आहे, अशी माहिती अ‍ॅड. नेवगी यांनी दिली, नव्याने तपास अहवाल सादर करा. तपास योग्य दिशेने सुरू आहे, याबद्दल आम्हाल स्वत:ला समाधान वाटले पाहिजे, असे म्हणत खंडपीठाने अहवाल सादर करण्यासाठी तपास यंत्रणेला २० आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली. खंडपीठाने सुनावलेपाटीलविषयी अहवालात काहीच नमूद नाही. गायकवाड आणि पाटील मित्र आहेत आणि पाटीलची पत्नी गायकवाडचे वकीलपत्र घेते, याचा संबंध आहे. तुम्ही (पोलीस) या दृष्टिकोनातून विचार करून तपास केला का? केवळ संशय व्यक्त करू नका. पाटीलपर्यंत पोहचण्यासाठी काय पावले उचललीत ते सांगा, असे खंडपीठाने सुनावले.