शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती का नाही?

By admin | Updated: October 8, 2015 03:09 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सरकारने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केलेली नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. सरकारने एखाद्या ज्येष्ठ वकिलाची त्यासाठी

मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सरकारने विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केलेली नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. सरकारने एखाद्या ज्येष्ठ वकिलाची त्यासाठी नियुक्ती का केली नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी केली.एकीकडे समीर गायकवाडला वाचवण्यासाठी सनातनने वकिलांची फौज उभी केली असताना, दुसरीकडे सरकारने त्याच्याविरुद्ध केस लढण्यासाठी अद्याप एकाही विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केलेली नाही. समीरची कोठडी वाढवून घेण्यासाठी पोलिसांनाच कोल्हापूर दंडाधिकाऱ्यांसमोर युक्तिवाद करावा लागला, अशी माहिती याचिकाकर्त्या स्नेहा पानसरे यांचे वकील अभय नेवगी यांनी न्या. रणजित मोरे व न्या राजेश केतकर यांच्या खंडपीठाला दिली. हे खेदजनक असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले.डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या तपासाचा अहवाल सीबीआय आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात सादर केला. पानसरेंच्या हत्येप्रकरणी सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला समीर गायकवाड हा गोवा बॉम्बस्फोटाप्रकरणी २००९पासून फरार असलेल्या रुद्र पाटीलचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे या हत्येमागेही पाटीलचा हात असावा, असा संशय पोलिसांना असल्याचे अतिरिक्त सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी सांगितले, तर पाटीलच्या पत्नीने गायकवाडसाठी वकीलपत्र सादर केले आहे, अशी माहिती अ‍ॅड. नेवगी यांनी दिली, नव्याने तपास अहवाल सादर करा. तपास योग्य दिशेने सुरू आहे, याबद्दल आम्हाल स्वत:ला समाधान वाटले पाहिजे, असे म्हणत खंडपीठाने अहवाल सादर करण्यासाठी तपास यंत्रणेला २० आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली. खंडपीठाने सुनावलेपाटीलविषयी अहवालात काहीच नमूद नाही. गायकवाड आणि पाटील मित्र आहेत आणि पाटीलची पत्नी गायकवाडचे वकीलपत्र घेते, याचा संबंध आहे. तुम्ही (पोलीस) या दृष्टिकोनातून विचार करून तपास केला का? केवळ संशय व्यक्त करू नका. पाटीलपर्यंत पोहचण्यासाठी काय पावले उचललीत ते सांगा, असे खंडपीठाने सुनावले.