शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Amol Mitkari Reaction on Bhagat Singh Koshyari : राष्ट्रपतींऐवजी पंतप्रधानांकडे का गेले? राज्यपाल कोश्यारींच्या इच्छेवर अमोल मिटकरींना वेगळ्या शंका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:10 IST

Amol Mitkari Reaction on Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याच्या महापुरुषांचा अपमान केला होता, यावरून विरोधकांनी महाराष्ट्रभर बंदची हाक देत राज्यपालांना हटविण्याची मागणी केली होती. आता महिनाभरानंतर राज्यपालांनी निवृत्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद मोदींकडे व्यक्त केली आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी वेगळेच संशय व्यक्त केले आहेत. 

महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती, यापूर्वीच त्यांनी पदमुक्त व्हायला हवे होते. आता महाराष्ट्राचा अपमान केला, महापुरुषांचा अपमान केला. त्यांना  आता उशिरा सुचलेले शहाणपण आहे. मोदी जेव्हा मुंबईला आले होते तेव्हाचे राज्यपालांचे जे वागणे होते ते सुद्धा लोकांना जाणवले आहे, अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली. 

याचबरोबर १७-१८ तारखेला हे सरकार कोसळले तर, खंडपीठाने निर्णय दिला, हे सरकार कोसळले तर त्यापूर्वीच आपला काढता पाय घ्यावा असे कोश्यारी यांना वाटत असावे. लवकर गेले पाहिजेत. आज अनेक महापुरुषांची जयंती आहे. त्यांनी लवकर महाराष्ट्र सोडावा आणि महाराष्ट्राला मोकळे करावे, असे मिटकरी म्हणाले. 

जर कायदेशीर प्रक्रिया पाहिली तर ज्यावेळी राज्यपालांना पदउतार व्हायचे असते तेव्हा त्यांनी राजीनामा राष्ट्रपतींना द्यावा लागतो. इथे त्यांनी पंतप्रधानांनाच तोंडी शिफारस केलीय. याचा अर्थ राष्ट्रपतींचा कारभार सुद्धा मोदी चालवतात का असा प्रश्न उरतो. इथे त्यांनी मोदींना बोलून संभ्रमात टाकले आहे. माझी तर जायची इच्छा आहे बुवा पण नरेंद्र मोदींच्या मनात आल्याशिवाय जाऊ शकत नाही, असेही त्यांनी महाराष्ट्राला दाखविल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीAmol Mitkariअमोल मिटकरीNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस