शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी नेमकी हीच वेळ का निवडली?; राज ठाकरे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 5:37 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला फक्त टीव्हीवर दिसले. त्याचा कारभार दिसलाच नाही, अशी टीका राज यांनी केली. तर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनासाठी मोदी सरकारने निवडलेल्या मुहूर्तावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. राम मंदिराची उभारणी होत आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पण भूमिपूजनासाठीची ही वेळ नाही. वातावरण निवळल्यावर मुहूर्त घेतला असता तर सर्वांनाच त्याचा आनंद घेता आला असता. नेमकी हीच वेळ का निवडली हे कळत नाही, असे ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राम मंदिर भूमिपूजनावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला ई-भूमीपूजन करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर राज यांनी असहमती दाखवली. मोठ्या संघर्षानंतर राम मंदिर होत आहे. या मंदिरासाठी असंख्य लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे. हा ऐतिहासिक सोहळा धुमधडाक्यातच व्हायला हवा. ई-भूमीपूजन वगैरे होऊ शकत नाही. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे जल्लोषात भूमीपूजन व्हायला हवे, असे मत राज यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. दोन महिन्यानंतरही भूमिपूजन करता आले असते. जगण्याची हमी आली असती तर लोकांनीही या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेतला असता, असेही राज म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीकामुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला फक्त टीव्हीवर दिसले. त्याचा कारभार दिसलाच नाही, अशी टीका राज यांनी केली. तर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले. हे सरकार आले तेव्हाच मी म्हणालो होतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील सावळागोंधळ पाहता हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. सरकारमधील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी संवाद नाही. ताळमेळ नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRam Mandirराम मंदिर