शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

आम्हाला घेऊन कशाला दिल्लीला जाता?

By admin | Updated: March 16, 2017 00:14 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन दोन्ही काँग्रेसने सरकारची मोठी कोंडी केली आहे. अधिवेशनाचे कामकाज दुसऱ्या आठवड्यातही सुरू होऊ शकलेले नाही

अतुल कुलकर्णी , मुंबई शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन दोन्ही काँग्रेसने सरकारची मोठी कोंडी केली आहे. अधिवेशनाचे कामकाज दुसऱ्या आठवड्यातही सुरू होऊ शकलेले नाही. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन आपण दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊ, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव आपण फेटाळून लावल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.विरोधकांच्या या अनपेक्षित नकारघंटेमुळे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या विरोधाला बळ आले आहे. परिणामी मतदारसंघात जाऊन कर्जमाफीवरुन काय सांगायचे, असा प्रश्न भाजपा आमदारांपुढे निर्माण झाला आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा कर्जमाफीवरून दोन्ही सभागृहे बंद पडली. त्यानंतर पडद्याआड बैठकांचा सिलसिला सुरूझाला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या दालनात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक झाली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही बोलावण्यात आले. मुंडे यांचे कार्यालय बैठकांचे केंद्र ठरले होते. विधानसभेत गदारोळ सुरू असताना मुंडे यांच्या दालनात बैठका सुरू होत्या. अर्थसंकल्प शनिवारी १८ मार्च रोजी आहे. तोपर्यंत अधिवेशनाचे कामकाज रोखून धरायचे का?, अशीही चर्चा झाली. सरकारची कर्जमाफीवरुन जेवढी करता येईल तेवढी कोंडी करायची, अशी रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यात शिवसेना सोबत आल्याने भाजपा एकाकी पडल्याचे चित्र निर्माण करण्यात विरोधकांना यश आले आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला बोलावले होते. त्यांनी सर्वपक्षीय सदस्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला नेण्याचा प्रस्ताव दिला होता. पण तुम्ही कोणाकडे जायचे, कधी जायचे हा तुमचा प्रश्न आहे. आम्हाला जायचे तर आम्ही वेगळे जाऊन आमचे म्हणणे मांडू. पण सरकार म्हणून तुम्ही भूमिका घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. राष्ट्रवादीनेही त्यास होकार दिला. राज्याची आर्थिक परिस्थिती आणि कर्जमाफीची आकडेवारी याविषयीचे एक निवेदन सभागृहात सरकार करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पण तुम्ही कर्जमाफीला तत्वत: मान्यता द्या, असे चव्हाण यांनी त्यांना सांगितले.