शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

आम्हाला घेऊन कशाला दिल्लीला जाता?

By admin | Updated: March 16, 2017 00:14 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन दोन्ही काँग्रेसने सरकारची मोठी कोंडी केली आहे. अधिवेशनाचे कामकाज दुसऱ्या आठवड्यातही सुरू होऊ शकलेले नाही

अतुल कुलकर्णी , मुंबई शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन दोन्ही काँग्रेसने सरकारची मोठी कोंडी केली आहे. अधिवेशनाचे कामकाज दुसऱ्या आठवड्यातही सुरू होऊ शकलेले नाही. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन आपण दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊ, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव आपण फेटाळून लावल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.विरोधकांच्या या अनपेक्षित नकारघंटेमुळे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या विरोधाला बळ आले आहे. परिणामी मतदारसंघात जाऊन कर्जमाफीवरुन काय सांगायचे, असा प्रश्न भाजपा आमदारांपुढे निर्माण झाला आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा कर्जमाफीवरून दोन्ही सभागृहे बंद पडली. त्यानंतर पडद्याआड बैठकांचा सिलसिला सुरूझाला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या दालनात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक झाली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही बोलावण्यात आले. मुंडे यांचे कार्यालय बैठकांचे केंद्र ठरले होते. विधानसभेत गदारोळ सुरू असताना मुंडे यांच्या दालनात बैठका सुरू होत्या. अर्थसंकल्प शनिवारी १८ मार्च रोजी आहे. तोपर्यंत अधिवेशनाचे कामकाज रोखून धरायचे का?, अशीही चर्चा झाली. सरकारची कर्जमाफीवरुन जेवढी करता येईल तेवढी कोंडी करायची, अशी रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यात शिवसेना सोबत आल्याने भाजपा एकाकी पडल्याचे चित्र निर्माण करण्यात विरोधकांना यश आले आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला बोलावले होते. त्यांनी सर्वपक्षीय सदस्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला नेण्याचा प्रस्ताव दिला होता. पण तुम्ही कोणाकडे जायचे, कधी जायचे हा तुमचा प्रश्न आहे. आम्हाला जायचे तर आम्ही वेगळे जाऊन आमचे म्हणणे मांडू. पण सरकार म्हणून तुम्ही भूमिका घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. राष्ट्रवादीनेही त्यास होकार दिला. राज्याची आर्थिक परिस्थिती आणि कर्जमाफीची आकडेवारी याविषयीचे एक निवेदन सभागृहात सरकार करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पण तुम्ही कर्जमाफीला तत्वत: मान्यता द्या, असे चव्हाण यांनी त्यांना सांगितले.