शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

त्या नेत्यांची ईडी चौकशी का थांबविली? उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 08:01 IST

आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मविआ सरकारशी फारकत घेऊन शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यानंतर यामिनी जाधव, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ, भावना गवळी या नेत्यांची ईडी चौकशी कशी थांबली, अशी विचारणा करत, भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असून, ईडी पक्षपातीपणा करत आहे. त्यामुळे ईडीच्या तपासाचा तपशील मागवून घ्यावा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका हायकाेर्टात दाखल करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते नवीन लाडे यांनी ॲड.नितीन सातपुते यांच्याद्वारे ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेनुसार, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून, भाजपबरोबर हातमिळवणी करून, सरकार स्थापन केल्यानंतर आधीच्या शिवसेनेच्या नेत्यांची ईडी, सीबीआय, आयकर विभागाने चौकशी थांबविली. याचाच अर्थ, केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या म्हणण्यानुसार वागत आहेत. 

आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. ‘केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याचा विचार करून गुन्हेगारांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, काही ठरावीक लोकांनाच लक्ष्य करण्यात येत आहे. 

ज्यांच्याविरुद्ध ईडीने आधी कारवाईचा बडगा उगारला, त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांच्या विरोधातील कारवाई थंड होते. शिवसेनेचे आधीचे नेते सरनाईक, अडसूळ, जाधव, खोतकर, गवळी यांना ईडीने सातत्याने नोटीस बजावून चौकशीला बोलावून घेतले. त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला.  मात्र, त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यावर, त्यांच्याविरोधातील चौकशी अचानकपणे थांबली,’ असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHigh Courtउच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदे