शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक कशासाठी बोलावली होती? उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 00:40 IST

बुधवारी मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारण पुरते ढवळून निघत आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी राज्यातील शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर, शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. यातच बुधवारी मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, ही बैठक कशासाठी बोलावण्यात आली होती? यासंदर्भात खुद्द मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे.  

वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना उदय सामंत म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक, आगामी लोकसभा अधिवेशन, राज्याचे विधानसभा अधिवेशन, आमदार आणि खासदारांनी भविष्यात कशा पद्धतीने काम करायला हवे, विकासाची कामे कशा पद्धतीने करावी, सघंटना वाढविण्यासाठी काय करायला हवे, यासंदर्भात झाली.  

याच वेळी, आमच्या आमदारांमध्ये कसल्याही प्रकारची नाराजी नाही (अजित पवार सरकारमध्ये आल्याने). आम्हा सर्वांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या राजीनाम्या संदर्भातील चर्चा म्हणजे केवळ अफवा आहे. सर्व खासदार आणि आमदारांची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच होईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना