शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शिक्षक बदल्यांना विलंब का?, सचिवांनी मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 06:16 IST

सचिव संतप्त; सीईओ, शिक्षण अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला

मुंबई : राज्य शासनााच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दिलेल्या मुदतीत जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षक बदलीसाठी आवश्यक कार्यवाही न झाल्याने शिक्षक बदलीस विलंब होत आहे. यामुळे ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी नाराजी व्यक्त केली.

याच पार्श्वभूमीवर १० जून २०१९ रोजी मुंबईत मंत्रालयात होणाºया शिक्षक बदलीसंदर्भातील बैठकीत संबंधित जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी खुलासा सादर करण्याचे निर्देश राज्याच्या सीईओंना (मुख्य कार्यकारी अधिकाºयांना) देण्यात आले आहेत.शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करण्याबाबत ८ मार्च २०१९ रोजी शासनाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र पाठविले होते. मात्र त्यास लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्थगिती मिळाली. त्यानंतर बदल्यांची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश पुन्हा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना बजावण्यात आले.अवघड व सर्वसाधारण क्षेत्रांच्या याद्या घोषित करणे, बदलीपात्र शिक्षकांची शाळानिहाय गावांची यादी घोषित करणे आदी प्रक्रिया पूर्ण करायची होती. मात्र ही कार्यवाही त्यांच्याकडून पूर्ण न झाल्याने ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच ७ जून सायंकाळी ५ पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कार्यवाही पूर्ण न करणाºया जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ८ जूनला तर शिक्षणाधिकाºयांनी १० जूनला ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना यासंबंधित खुलासा सादर करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

फक्त ९ जिल्ह्यांतील शिक्षकांना बदल्यांचे अर्ज खुलेराज्यात ६ जून २०१९ च्या अहवालानुसार ९ जिल्ह्यांतील शिक्षक बदल्यांची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या जिल्ह्यातील शिक्षणासाठी बदलीचे अर्ज खुले करून देण्यात आले आहेत. तर तब्बल २० जिल्ह्यांतील शिक्षकी बदल्यांची कार्यवाही पेंडिंग आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर, पुणे, जळगाव, औरंगाबाद , नागपूर, अमरावती अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक