शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शिक्षक बदल्यांना विलंब का?, सचिवांनी मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 06:16 IST

सचिव संतप्त; सीईओ, शिक्षण अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला

मुंबई : राज्य शासनााच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दिलेल्या मुदतीत जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षक बदलीसाठी आवश्यक कार्यवाही न झाल्याने शिक्षक बदलीस विलंब होत आहे. यामुळे ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी नाराजी व्यक्त केली.

याच पार्श्वभूमीवर १० जून २०१९ रोजी मुंबईत मंत्रालयात होणाºया शिक्षक बदलीसंदर्भातील बैठकीत संबंधित जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी खुलासा सादर करण्याचे निर्देश राज्याच्या सीईओंना (मुख्य कार्यकारी अधिकाºयांना) देण्यात आले आहेत.शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करण्याबाबत ८ मार्च २०१९ रोजी शासनाकडून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र पाठविले होते. मात्र त्यास लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्थगिती मिळाली. त्यानंतर बदल्यांची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश पुन्हा राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना बजावण्यात आले.अवघड व सर्वसाधारण क्षेत्रांच्या याद्या घोषित करणे, बदलीपात्र शिक्षकांची शाळानिहाय गावांची यादी घोषित करणे आदी प्रक्रिया पूर्ण करायची होती. मात्र ही कार्यवाही त्यांच्याकडून पूर्ण न झाल्याने ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच ७ जून सायंकाळी ५ पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कार्यवाही पूर्ण न करणाºया जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ८ जूनला तर शिक्षणाधिकाºयांनी १० जूनला ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना यासंबंधित खुलासा सादर करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

फक्त ९ जिल्ह्यांतील शिक्षकांना बदल्यांचे अर्ज खुलेराज्यात ६ जून २०१९ च्या अहवालानुसार ९ जिल्ह्यांतील शिक्षक बदल्यांची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या जिल्ह्यातील शिक्षणासाठी बदलीचे अर्ज खुले करून देण्यात आले आहेत. तर तब्बल २० जिल्ह्यांतील शिक्षकी बदल्यांची कार्यवाही पेंडिंग आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर, पुणे, जळगाव, औरंगाबाद , नागपूर, अमरावती अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक